शहरं
Join us  
Trending Stories
1
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
2
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
3
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
4
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
5
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
6
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
7
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
8
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
9
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
11
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
12
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
13
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
14
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
15
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
16
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
17
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
18
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
19
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
20
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर

शॉर्टसर्किटने चारा जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 18:26 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील शेतकरी संतोष भाबड यांच्या शेतातील मक्याच्या चाऱ्याला शर्टसर्किटमुळे अचानक आग लागली, त्यात संपूर्ण चारा जळून खाक झाला आहे.

ठळक मुद्देराजापूर येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील शेतकरी संतोष भाबड यांच्या शेतातील मक्याच्या चाऱ्याला शर्टसर्किटमुळे अचानक आग लागली, त्यात संपूर्ण चारा जळून खाक झाला आहे.सात एकर क्षेत्रात असलेला मकाचा चारा १४ ट्रॉली चारा आगीत भस्मसात झाला आहे. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर संकटात सापडला आहे. जनावरांना खाण्यासाठी चाऱ्याचा प्रश्न बिकट झाला आहे. भाबड यांनी येवला येथील येथील अग्निशामक दलास कळविताच घटनास्थळी बंब येईपर्यंत संपूर्ण चारा जळून खाक झाला होता. जवळपास असलेल्या गावातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी जळणाऱ्या चाऱ्याशेजारी असलेली मक्याची कणसे, बिट्या दूर केल्या. व आग विझविण्याचा प्रयत्न केला.शेतातील शेततळ्याच्या पाण्यामुळे मक्याच्या बिट्या आगीपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी मेहनत घेतली. मात्र चारा संपूर्ण जळुन खाक झाला आहे. आगीचे तांडव जास्त प्रमाणात असल्याने चारा हा ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.दरम्यान शॉर्टसर्किट झाल्यामुळे विजेचा पुरवठा खंडित झाला होता व शेततळ्यावर असलेले इंजिनच्या साहाय्याने पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, पोलवर असलेल्या वीज वाहिनीवरील झेम तुटल्याने तेथील आगीचा लोळ खाली चाऱ्यावर पडल्याने आगीने मोठ्या प्रमाणावर पेट घेतला. अग्निशामक बंब येण्यास थोडा उशीर झाला व टँकरमधील पाणी संपून गेल्यानंतर शेततळ्याचे पाणी हे पिटर इंजिनच्या साहाय्याने पाणी अग्निशामक बंबात टाकून कमीत कमी दोन तासाच्या अथक परिश्रमाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे शेजारी असलेल्या मक्याचे काही प्रमाणात नुकसान टळले आहे.राजापूरचे तलाठी ज्ञानेश्वर रोखले, कोतवाल अरुण जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्ष्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राजापूर व परिसरात अनेक ठिकाणी विजेच्या तारा या लोंबकळत दिसत आहे. राजापूर येथे जागेवर वायरमेन राहत नसल्याने व वायरमन हे बाहेरगावी राहत असल्याने जागेवर कोणी नाही राहत नाही . बराच वेळा वायरमन अभावी विजची कामे खोळंबली जातात.(१७ राजापूर, १)

टॅग्स :AccidentअपघातFairजत्रा