शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

शॉर्टसर्किटने चारा जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 18:26 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील शेतकरी संतोष भाबड यांच्या शेतातील मक्याच्या चाऱ्याला शर्टसर्किटमुळे अचानक आग लागली, त्यात संपूर्ण चारा जळून खाक झाला आहे.

ठळक मुद्देराजापूर येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील शेतकरी संतोष भाबड यांच्या शेतातील मक्याच्या चाऱ्याला शर्टसर्किटमुळे अचानक आग लागली, त्यात संपूर्ण चारा जळून खाक झाला आहे.सात एकर क्षेत्रात असलेला मकाचा चारा १४ ट्रॉली चारा आगीत भस्मसात झाला आहे. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर संकटात सापडला आहे. जनावरांना खाण्यासाठी चाऱ्याचा प्रश्न बिकट झाला आहे. भाबड यांनी येवला येथील येथील अग्निशामक दलास कळविताच घटनास्थळी बंब येईपर्यंत संपूर्ण चारा जळून खाक झाला होता. जवळपास असलेल्या गावातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी जळणाऱ्या चाऱ्याशेजारी असलेली मक्याची कणसे, बिट्या दूर केल्या. व आग विझविण्याचा प्रयत्न केला.शेतातील शेततळ्याच्या पाण्यामुळे मक्याच्या बिट्या आगीपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी मेहनत घेतली. मात्र चारा संपूर्ण जळुन खाक झाला आहे. आगीचे तांडव जास्त प्रमाणात असल्याने चारा हा ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.दरम्यान शॉर्टसर्किट झाल्यामुळे विजेचा पुरवठा खंडित झाला होता व शेततळ्यावर असलेले इंजिनच्या साहाय्याने पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, पोलवर असलेल्या वीज वाहिनीवरील झेम तुटल्याने तेथील आगीचा लोळ खाली चाऱ्यावर पडल्याने आगीने मोठ्या प्रमाणावर पेट घेतला. अग्निशामक बंब येण्यास थोडा उशीर झाला व टँकरमधील पाणी संपून गेल्यानंतर शेततळ्याचे पाणी हे पिटर इंजिनच्या साहाय्याने पाणी अग्निशामक बंबात टाकून कमीत कमी दोन तासाच्या अथक परिश्रमाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे शेजारी असलेल्या मक्याचे काही प्रमाणात नुकसान टळले आहे.राजापूरचे तलाठी ज्ञानेश्वर रोखले, कोतवाल अरुण जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्ष्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राजापूर व परिसरात अनेक ठिकाणी विजेच्या तारा या लोंबकळत दिसत आहे. राजापूर येथे जागेवर वायरमेन राहत नसल्याने व वायरमन हे बाहेरगावी राहत असल्याने जागेवर कोणी नाही राहत नाही . बराच वेळा वायरमन अभावी विजची कामे खोळंबली जातात.(१७ राजापूर, १)

टॅग्स :AccidentअपघातFairजत्रा