शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

नाशिकमधील आयटी पार्क इमारत पंधरा वर्षांपासून धुळखात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 16:32 IST

नाशिक : राज्यात लवकरच आयटी पार्क धोरण आखण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली असली तरी नाशिकमध्ये मात्र सुमारे पंधरा वर्षांपासून आयटी पार्कची इमारत केवळ अधिका-यांच्या अव्यवहार्य प्रस्तावांमुळे रखडली आहे. दरवेळी चढ्या दराने लिलावाची रक्कम ठेवणाºया प्रशासकीय अधिका-यांच्या हेतुविषयीच आता उद्योग क्षेत्रात शंका घेतली जाऊ लागली आहे.

ठळक मुद्दे प्रशासनाच्या उदासिन भूमिकेच्या चौकशीची गरज आयटी पार्क कधी कार्यान्वित होणार?

नाशिक : राज्यात लवकरच आयटी पार्क धोरण आखण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली असली तरी नाशिकमध्ये मात्र सुमारे पंधरा वर्षांपासून आयटी पार्कची इमारत केवळ अधिका-यांच्या अव्यवहार्य प्रस्तावांमुळे रखडली आहे. दरवेळी चढ्या दराने लिलावाची रक्कम ठेवणा-या प्रशासकीय अधिका-यांच्या हेतुविषयीच आता उद्योग क्षेत्रात शंका घेतली जाऊ लागली आहे.सध्या आयटी क्षेत्राचे वारे असून, अशाप्रकारचे उद्योग नाशिकमध्ये अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्याला अद्याप पुरेसे यश आलेले नाही. केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकार असताना अंबड येथे आयटी इमारत बांधण्यात आली आणि तत्कालीन केंद्रीय दूरसंचारमंत्री प्रमोद महाजन यांच्या हस्ते त्याचे उद््घाटन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर अद्यापही इमारत धुळखात पडून आहे. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात राज्यात लवकरच आयटी पार्क धोरण आखण्याची घोषणा केली आहे. परंतु दुसरीकडे नाशिकसारख्या ठिकाणी आयटी पार्क धुळखात पडून असून, ते कधी कार्यान्वित होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिकमध्ये येणारे उद्योगमंत्री आणि एमआयडीसी अधिका-यांनी वारंवार आश्वासने देऊन या प्रश्नाचे उत्तर गुळगुळीत दिले जाते, परंतु अद्यापही हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने हे पार्क चालविण्यास देण्यापेक्षा धुळखात पडून ठेवण्यातच कोणाचे स्वारस्य आहे, याबाबतच चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.या पार्कचे पंधरा वर्षांत केवळ तीन ते चार वेळाच लिलाव काढण्यात आले. मात्र असे करताना इमारतीच्या घसा-यानुसार दर कमी करण्याऐवजी प्रत्येकवेळी किंमत वाढविली जात आहे. मुळातच इमारतीची अवकळा बघता इमारतीला डागडुजी तसेच वायरिंगसह अनेक बाबतीत खर्च करावा लागणार आहे. परंतु त्याऐवजी इमारतीचा दिवसेंदिवस दर वाढवून लिलाव काढला जात असल्याने नाशिकमधील अनेक अग्रणी कंपन्यांनी पार्कसाठी स्वारस्य दाखवूनही हे दर परवडत नसल्याने आता अशाप्रकारचे दर ठेवण्यामध्ये आणि लवचिक धोरण नसण्यामध्ये कोणाचे हित संबंध आहेत काय? अशी शंका उद्योजक घेऊ लागले असून, आयटी पार्क धोरण ठरविण्याआधी अशाप्रकाराची चौकशी करण्याची गरज असल्याचे उद्योजकांनी सांगितले. 

 

टॅग्स :NashikनाशिकITमाहिती तंत्रज्ञान