शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
6
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
7
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
8
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
9
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
10
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
11
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
12
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
13
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
14
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
15
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
16
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
17
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
18
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
19
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
20
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

नाशिकमधील आयटी पार्क इमारत पंधरा वर्षांपासून धुळखात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 16:32 IST

नाशिक : राज्यात लवकरच आयटी पार्क धोरण आखण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली असली तरी नाशिकमध्ये मात्र सुमारे पंधरा वर्षांपासून आयटी पार्कची इमारत केवळ अधिका-यांच्या अव्यवहार्य प्रस्तावांमुळे रखडली आहे. दरवेळी चढ्या दराने लिलावाची रक्कम ठेवणाºया प्रशासकीय अधिका-यांच्या हेतुविषयीच आता उद्योग क्षेत्रात शंका घेतली जाऊ लागली आहे.

ठळक मुद्दे प्रशासनाच्या उदासिन भूमिकेच्या चौकशीची गरज आयटी पार्क कधी कार्यान्वित होणार?

नाशिक : राज्यात लवकरच आयटी पार्क धोरण आखण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली असली तरी नाशिकमध्ये मात्र सुमारे पंधरा वर्षांपासून आयटी पार्कची इमारत केवळ अधिका-यांच्या अव्यवहार्य प्रस्तावांमुळे रखडली आहे. दरवेळी चढ्या दराने लिलावाची रक्कम ठेवणा-या प्रशासकीय अधिका-यांच्या हेतुविषयीच आता उद्योग क्षेत्रात शंका घेतली जाऊ लागली आहे.सध्या आयटी क्षेत्राचे वारे असून, अशाप्रकारचे उद्योग नाशिकमध्ये अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्याला अद्याप पुरेसे यश आलेले नाही. केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकार असताना अंबड येथे आयटी इमारत बांधण्यात आली आणि तत्कालीन केंद्रीय दूरसंचारमंत्री प्रमोद महाजन यांच्या हस्ते त्याचे उद््घाटन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर अद्यापही इमारत धुळखात पडून आहे. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात राज्यात लवकरच आयटी पार्क धोरण आखण्याची घोषणा केली आहे. परंतु दुसरीकडे नाशिकसारख्या ठिकाणी आयटी पार्क धुळखात पडून असून, ते कधी कार्यान्वित होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिकमध्ये येणारे उद्योगमंत्री आणि एमआयडीसी अधिका-यांनी वारंवार आश्वासने देऊन या प्रश्नाचे उत्तर गुळगुळीत दिले जाते, परंतु अद्यापही हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने हे पार्क चालविण्यास देण्यापेक्षा धुळखात पडून ठेवण्यातच कोणाचे स्वारस्य आहे, याबाबतच चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.या पार्कचे पंधरा वर्षांत केवळ तीन ते चार वेळाच लिलाव काढण्यात आले. मात्र असे करताना इमारतीच्या घसा-यानुसार दर कमी करण्याऐवजी प्रत्येकवेळी किंमत वाढविली जात आहे. मुळातच इमारतीची अवकळा बघता इमारतीला डागडुजी तसेच वायरिंगसह अनेक बाबतीत खर्च करावा लागणार आहे. परंतु त्याऐवजी इमारतीचा दिवसेंदिवस दर वाढवून लिलाव काढला जात असल्याने नाशिकमधील अनेक अग्रणी कंपन्यांनी पार्कसाठी स्वारस्य दाखवूनही हे दर परवडत नसल्याने आता अशाप्रकारचे दर ठेवण्यामध्ये आणि लवचिक धोरण नसण्यामध्ये कोणाचे हित संबंध आहेत काय? अशी शंका उद्योजक घेऊ लागले असून, आयटी पार्क धोरण ठरविण्याआधी अशाप्रकाराची चौकशी करण्याची गरज असल्याचे उद्योजकांनी सांगितले. 

 

टॅग्स :NashikनाशिकITमाहिती तंत्रज्ञान