शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नाशकात आयआयटी, एनआयटीसारख्या संस्था आणा ; विद्यार्थ्यांची उमेदवारांकडे मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 21:31 IST

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांचा समावेश असलेले सुमारे १४  मागण्यांचा समावेश असलेला छात्रनामा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा छात्रनामा म्हणजे एकप्रकारचे मागणीपत्र असून, याद्वारे नाशिक शहरात आयआटी, एनआयटीसारख्या संस्था सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देअभाविपने प्रसिद्ध केला मागण्यांचा छात्रनामा नाशिक उपकेंद्राचा प्रश्न सोडविण्याची मागणी

नाशिक : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांचा समावेश असलेले सुमारे १४  मागण्यांचा समावेश असलेला छात्रनामा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा छात्रनामा म्हणजे एकप्रकारचे मागणीपत्र असून, याद्वारे नाशिक शहरात आयआटी, एनआयटीसारख्या संस्था सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात वेगवेगळ्या पक्षांसह अपक्ष म्हणून उतरलेल्या उमेदवारांना हे मागणीपत्र देण्यात येणार आहे.अखिल भारतीय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील विभागीय उपकें द्राचे सक्षमीकरण करण्यासह त्यासाठी नाशिक येथील प्रस्तावित विद्यापीठ सबकॅम्पसचे प्रलंबित काम लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यासोबतच नाशिकमध्ये आयआयटी, एनआयटीसारख्या केंद्रीय संस्था शहरात उपलब्ध कराव्यात, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील प्रस्तावित आयुर्वेद, होमिओपॅथी व फिजिओथेरपी अभ्यासक्रम तत्काळ सुरू करावे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील बंद झालेले सर्व अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्यात यावे, नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, आदिवासी वसतिगृह शहरातील मध्यवर्ती शासकीय जागेत स्थलांतरित करावे, नवीन विद्यापीठ कायद्यानुसार महाविद्यालयीन निवडणुकांसाठी पाठपुरावा करावा, शहरात ‘बिझनेस इनक्युबेशन सेंटर’ सुरू करावे आदी विविध १४ मागण्यांचा या मागणी पत्रात समावेश करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संयोजक सागर शेलार, महानगरमंत्री अथर्व कुळकर्णी, महानगरसहमंत्री सिद्धेश खैरनार, राकेश साळुंके, रूपेश पाटील, अश्रुबा वाघमारे, नितीन पाटील, वैभव पाटील, अशोक सैनी, रोहित ताराबादकर आदींनी दिली आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NashikनाशिकStudentविद्यार्थीuniversityविद्यापीठ