शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

...तर मराठा समाजाला मुंबईतही आणू शकतो - मनोज जरांगे पाटील

By धनंजय वाखारे | Updated: November 22, 2023 17:38 IST

सकल मराठा समाजाला मुंबईतही आणू शकतो, परंतु तशी वेळ येऊ देऊ नका, असे आवाहन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी इगतपुरी तालुक्यातील शेणित येथील जाहीर सभेत केले.

विक्रम पासलकर

गोंदे दुमाला (नाशिक) : मराठा आरक्षणाला सत्तेतील काही मंत्री व त्यांच्या अवतीभवती असणाऱ्या दहा पंधरा जणांच्या टोळीचा विरोध आहे. मराठा समाज व ओबीसी बांधव यांच्यातील वातावरण दूषित केले जात आहे. परंतु तुम्ही कितीही मांड्या ठोका, मराठा समाज दंड थोपटल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी २४ डिसेंबरपूर्वी दिलेला शब्द पाळल्यास कुठल्याही आंदोलनाची गरज भासणार नाही. सकल मराठा समाजाला मुंबईतही आणू शकतो, परंतु तशी वेळ येऊ देऊ नका, असे आवाहन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी (दि.२२) इगतपुरी तालुक्यातील शेणित येथील जाहीर सभेत केले.

इगतपुरी, सिन्नर, नाशिक व त्र्यंबकेश्वर या तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे शेणित येथे आयोजित सभेला मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते. यावेळी जरांगे पाटील यांनी घणाघाती भाषण करत सांगितले, राज्यभरातील अखंड मराठा समाज जर ओबीसी प्रवर्गात आलाच तर आपली दुकाने बंद होतील आणि मराठा समाज डोइजड होईल या भीतीने अनेकांचा पोटशूळ उठला आहे. त्यासाठीच त्यांनी एका साहेबाला पुढे केले आहे. ऊठसूठ आमच्यावर खालची पातळी सोडून दूषित वातावरण निर्माण केले जात आहे. पण आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता दिला. आजपर्यंत राज्यभरात सुमारे ३२ लाख मराठ्यांच्या ओबीसी नोंदी शासकीय पातळीवर आढळून आल्या आहेत. शासनाचे हे काम प्रगतिपथावर सुरु आहे. ज्यांच्या नोंदी आढळत नाहीत त्यांनी बिथरुन जाऊ नये. आपल्यात खुळपाट घालायचा कार्यक्रम सुरु आहे. मात्र आपली एकजुट अशीच अभेद्य ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले. सभेच्या पूर्वी स्वाती कदम व अन्य महिलांनी मनोगत व्यक्त केले.

जरांगेंकडून शांततेची शपथ 

या जनसभेसाठी तालुक्यातील गावांनी मोढा जाहीर केला होता. शेतकऱ्यांनी शेतीकामे बंद ठेवून सभेला हजेरी लावली. सभास्थळी शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला होता. जरांगे पाटील यांचे पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत करण्यात आले. दि. १ डिसेंबरपासून राज्यभर गावोगावी साखळी उपोषण सुरु होणार आहे.

शांततेच्या माध्यमातून नागरिकांना त्रास होणार नाही व तेढ निर्माण होणार नाही अशी शपथ जरांगे पाटील यांनी यावेळी जनसभेला दिली.इगतपुरी तालुका समाज विकास फाउंडेशन तर्फे सभास्थळी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. ठिकठिकाणी दानशूरांनी जेवण, नाश्ता, पाणी व वैद्यकीय व्यवस्था केली होती.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण