शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

रस्त्यांच्या कामाचे पितळ उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 01:03 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामामुळे गाव शिवार, गावांना जोडणारे अंतर्गत तसेच नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाची वाट लागली असून, या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्देवाहनधारक त्रस्त : महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघातात वाढ

पाथरे : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामामुळे गाव शिवार, गावांना जोडणारे अंतर्गत तसेच नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाची वाट लागली असून, या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.ग्रामस्थांनी अनेक वेळा समृद्धी महामार्गाचे काम घेतलेल्या ठेकेदारांना समज दिली आहे. यासंदर्भात राज्य रस्ते विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही तक्रार केली आहे. एकीकडे समृद्धी महामार्गामुळे राज्याचा विकास साधला जाणार आहे असे बोललं जातं आहे. त्यावर हजारो कोटी रुपये खर्च होत आहे, तर दुसरीकडे गावांना जोडणारे रस्ते खराब होत आहेत. त्याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात गावांना जोडणाºया रस्त्यांची दुरदशा चर्चेचा विषय बनली आहे. ग्रामीण भागातील जनतेचा प्रवास हा खेडे गावाला जोडणाºया रस्त्यांमुळे होत असतो; परंतु सध्या या रस्त्यांचे हाल झाले आहे. शहरांना समृद्धीमुळे विकास होणार आहे तर खेडे मात्र विकासापासून दूर जात आहे असं तरी सध्या चित्र आहे. शेतकरी, ग्रामस्थ यांना पावसाळ्यात या रस्त्यांमुळे खूप त्रास सहन करावा लागला. उन्हाळ्यात अवजड वाहनांमुळे ुधुळीचा त्रास सहन करावा लागला. आता तर रस्ते अति खराब झाल्याने वाहने चालवणे अवघड होऊन बसले आहे. समृद्धी महामार्ग या रस्त्याची रुंदी चारशे फूट असून, त्यावर मातीचा भराव टाकण्यासाठी समृद्धी महामार्गाचे ठेकेदारांकडून शिवारअंतर्गत रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. २० ते २५ टनी डंपर वाहतुकीसाठी या रस्त्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे रस्त्यांची खडी उघडी पडून मोठमोठे खड्डे पडले आहे. नुकताच नव्याने डांबरीकरण करण्यात आलेल्या पाथरे ते शहा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. साधारण पणे तीन किलोमीटरच्या रस्त्याची सततच्या जड वाहनांमुळे खडी, डांबर, साईडपट्ट्या उखडून गेल्या आहे. ज्यादा क्षमतेच्या वाहतुकीमुळे शिवाररस्त्यांसह अन्य इतर जिल्हा मार्ग रस्त्यांची देखील वाट लागली आहे. त्यात पाथरे ते बहादरवाडी, जवळके, सायाळे या रस्त्यांची पुरती वाताहत झाली आहे. या रस्त्यावर दुचाकी, अथवा चार चाकी वाहन चालविणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे ठेकेदारांनी या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक