शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
2
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
3
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
4
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
6
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
7
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
8
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
9
गवार, मटारचा भाव २०० रुपयांवर; पालक ६०, तर मेथी ५० रुपये जुडी, दसऱ्याला भाजीपाल्याला महागाईची फोडणी
10
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
11
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
12
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
13
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
14
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
15
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
16
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
17
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
18
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
19
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
20
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात

रस्त्यांच्या कामाचे पितळ उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 01:03 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामामुळे गाव शिवार, गावांना जोडणारे अंतर्गत तसेच नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाची वाट लागली असून, या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्देवाहनधारक त्रस्त : महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघातात वाढ

पाथरे : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामामुळे गाव शिवार, गावांना जोडणारे अंतर्गत तसेच नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाची वाट लागली असून, या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.ग्रामस्थांनी अनेक वेळा समृद्धी महामार्गाचे काम घेतलेल्या ठेकेदारांना समज दिली आहे. यासंदर्भात राज्य रस्ते विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही तक्रार केली आहे. एकीकडे समृद्धी महामार्गामुळे राज्याचा विकास साधला जाणार आहे असे बोललं जातं आहे. त्यावर हजारो कोटी रुपये खर्च होत आहे, तर दुसरीकडे गावांना जोडणारे रस्ते खराब होत आहेत. त्याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात गावांना जोडणाºया रस्त्यांची दुरदशा चर्चेचा विषय बनली आहे. ग्रामीण भागातील जनतेचा प्रवास हा खेडे गावाला जोडणाºया रस्त्यांमुळे होत असतो; परंतु सध्या या रस्त्यांचे हाल झाले आहे. शहरांना समृद्धीमुळे विकास होणार आहे तर खेडे मात्र विकासापासून दूर जात आहे असं तरी सध्या चित्र आहे. शेतकरी, ग्रामस्थ यांना पावसाळ्यात या रस्त्यांमुळे खूप त्रास सहन करावा लागला. उन्हाळ्यात अवजड वाहनांमुळे ुधुळीचा त्रास सहन करावा लागला. आता तर रस्ते अति खराब झाल्याने वाहने चालवणे अवघड होऊन बसले आहे. समृद्धी महामार्ग या रस्त्याची रुंदी चारशे फूट असून, त्यावर मातीचा भराव टाकण्यासाठी समृद्धी महामार्गाचे ठेकेदारांकडून शिवारअंतर्गत रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. २० ते २५ टनी डंपर वाहतुकीसाठी या रस्त्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे रस्त्यांची खडी उघडी पडून मोठमोठे खड्डे पडले आहे. नुकताच नव्याने डांबरीकरण करण्यात आलेल्या पाथरे ते शहा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. साधारण पणे तीन किलोमीटरच्या रस्त्याची सततच्या जड वाहनांमुळे खडी, डांबर, साईडपट्ट्या उखडून गेल्या आहे. ज्यादा क्षमतेच्या वाहतुकीमुळे शिवाररस्त्यांसह अन्य इतर जिल्हा मार्ग रस्त्यांची देखील वाट लागली आहे. त्यात पाथरे ते बहादरवाडी, जवळके, सायाळे या रस्त्यांची पुरती वाताहत झाली आहे. या रस्त्यावर दुचाकी, अथवा चार चाकी वाहन चालविणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे ठेकेदारांनी या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक