शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
5
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
7
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
8
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
9
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
10
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
11
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
12
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
13
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
14
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
15
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
16
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
17
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
18
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
19
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांच्या कामाचे पितळ उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 01:03 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामामुळे गाव शिवार, गावांना जोडणारे अंतर्गत तसेच नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाची वाट लागली असून, या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्देवाहनधारक त्रस्त : महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघातात वाढ

पाथरे : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामामुळे गाव शिवार, गावांना जोडणारे अंतर्गत तसेच नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाची वाट लागली असून, या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.ग्रामस्थांनी अनेक वेळा समृद्धी महामार्गाचे काम घेतलेल्या ठेकेदारांना समज दिली आहे. यासंदर्भात राज्य रस्ते विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही तक्रार केली आहे. एकीकडे समृद्धी महामार्गामुळे राज्याचा विकास साधला जाणार आहे असे बोललं जातं आहे. त्यावर हजारो कोटी रुपये खर्च होत आहे, तर दुसरीकडे गावांना जोडणारे रस्ते खराब होत आहेत. त्याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात गावांना जोडणाºया रस्त्यांची दुरदशा चर्चेचा विषय बनली आहे. ग्रामीण भागातील जनतेचा प्रवास हा खेडे गावाला जोडणाºया रस्त्यांमुळे होत असतो; परंतु सध्या या रस्त्यांचे हाल झाले आहे. शहरांना समृद्धीमुळे विकास होणार आहे तर खेडे मात्र विकासापासून दूर जात आहे असं तरी सध्या चित्र आहे. शेतकरी, ग्रामस्थ यांना पावसाळ्यात या रस्त्यांमुळे खूप त्रास सहन करावा लागला. उन्हाळ्यात अवजड वाहनांमुळे ुधुळीचा त्रास सहन करावा लागला. आता तर रस्ते अति खराब झाल्याने वाहने चालवणे अवघड होऊन बसले आहे. समृद्धी महामार्ग या रस्त्याची रुंदी चारशे फूट असून, त्यावर मातीचा भराव टाकण्यासाठी समृद्धी महामार्गाचे ठेकेदारांकडून शिवारअंतर्गत रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. २० ते २५ टनी डंपर वाहतुकीसाठी या रस्त्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे रस्त्यांची खडी उघडी पडून मोठमोठे खड्डे पडले आहे. नुकताच नव्याने डांबरीकरण करण्यात आलेल्या पाथरे ते शहा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. साधारण पणे तीन किलोमीटरच्या रस्त्याची सततच्या जड वाहनांमुळे खडी, डांबर, साईडपट्ट्या उखडून गेल्या आहे. ज्यादा क्षमतेच्या वाहतुकीमुळे शिवाररस्त्यांसह अन्य इतर जिल्हा मार्ग रस्त्यांची देखील वाट लागली आहे. त्यात पाथरे ते बहादरवाडी, जवळके, सायाळे या रस्त्यांची पुरती वाताहत झाली आहे. या रस्त्यावर दुचाकी, अथवा चार चाकी वाहन चालविणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे ठेकेदारांनी या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक