शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

पाणी तलावात टाकण्यात अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:17 IST

हरणबारी उजव्या कालव्याचे पाणी ढोलबारे (ता. बागलाण) येथील पाझर तलावात टाकण्याच्या कामाला गत चार वर्षांपूर्वी शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. या तलावासाठी धरणातून पाण्याचे आरक्षणही मंजूर करण्यात आले आहे. या कामासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हरणबारी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गाकडून प्रांतवादाच्या मुद्द्यावर या कामास विरोध होण्याची शक्यता गृहीत धरून लोकप्रतिनिधीही राजकीय अडसर ठरणाºया या मुद्द्यालाच बगल देण्याचे काम करत असल्याने ढोलबारे धरण पाणीप्रश्न दिवसेंदिवस लांबताना दिसून येतो आहे.

वीरगाव : हरणबारी उजव्या कालव्याचे पाणी ढोलबारे (ता. बागलाण) येथील पाझर तलावात टाकण्याच्या कामाला गत चार वर्षांपूर्वी शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. या तलावासाठी धरणातून पाण्याचे आरक्षणही मंजूर करण्यात आले आहे. या कामासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हरणबारी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गाकडून प्रांतवादाच्या मुद्द्यावर या कामास विरोध होण्याची शक्यता गृहीत धरून लोकप्रतिनिधीही राजकीय अडसर ठरणाºया या मुद्द्यालाच बगल देण्याचे काम करत असल्याने ढोलबारे धरण पाणीप्रश्न दिवसेंदिवस लांबताना दिसून येतो आहे.  आरम व मोसम या दोन्हीही प्रमुख नद्यांमध्ये असलेल्या व अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाºया वीरगाव परिसरातील आठ ते दहा गावांतील शेती सिंचनासाठी कोणत्याही प्रभावी उपाययोजना शासन स्तरावरून नसल्याने येथील शेतीला वर्षानुवर्ष पावसाच्या पाण्यावरच विसंबून राहावे लागत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी गत दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत येथील शेतकरीवर्गाने एकत्र येत पाणी अडवा, पाणी जिरवा यासारखी अनेक कामे लोकसहभागाच्या जोरावर पूर्ण करून शेती सिंचनावर मात करण्यात काही अंशी यश मिळविले आहे. लोकसहभागाच्या जोरावर अनेक नाल्यांवर बांध घालून जमिनीत पाणी जिरविण्याचे काम शेतकरी वर्ग करीत असताना या नाल्यांना कायमस्वरूपी पाण्याचा प्रवाह उपलब्ध होणे ही काळाची गरज असून, हरणबारीच्या पाण्यातूनच हे साध्य होणार आहे.वीरगाव या गावापासून चार किमी अंतरावर ढोलबारे पाझर तलाव आहे. तलावाची साठवण क्षमता सुमारे १५ दलघफू एवढी आहे. या तलावाच्या उत्तरेस अवघ्या १.५ किमी अंतरावर हरणबारी धरणाचा उजवा कालवा वाहतो. या कालव्याद्वारे दरवर्षी हजारो क्यूसेस पूरपाणी वाहून जात असते. या पूरपाण्यातून लाभक्षेत्रातील बंधारे भरून अनेक नाल्यांमध्ये हे पाणी सोडले जात असल्याने कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतीला सोन्याचे दिवस आले आहेत.  एकीकडे ही परिस्थिती असताना अवघ्या दोन ते तीन किमी अंतरावरील वीरगाव परिसरातील शेतीला मात्र लहरी पावसाच्या पाण्यावरच वर्षानुवर्ष अवलंबून राहावे लागत आहे. याचमुळे हरणबारी धरणाचे पूरपाणी तसेच आरक्षित पाण्याचा फायदा वीरगाव परिसरातील शेतीसाठीही व्हावा यासाठी येथील शेतकरीवर्ग गत सात ते आठ वर्षांपासून याप्रश्नी आवाज उठविताना दिसून येत आहे.  या कामातील अनेक तांत्रिक त्रुटी दूर सारत कामास प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यात दिवंगत आमदार ए. टी. पवार यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. ११६० दलघफू क्षमता असलेल्या हरणबारी धरणातील पाण्याचा प्रत्येक थेंब अन् थेंब शेती व पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे.  गत आठ ते दहा वर्षांपासून मोसम नदीवर बंधारे बांधण्यासाठी शेतकरी वर्गाकडून आग्रही मागणी झाल्यानंतर या बंधाºयांसाठी साल्हेर वळण योजना १ व २ अंतर्गत पाण्याची उपलब्धता करण्यात आली आहे. याच उपलब्ध पाण्यातून ढोलबारे येथील पाझर तलावासाठीही पाणी आरक्षित करण्यात आले आहे.  कालवा खोदकाम मार्गातील शेतकरी वर्गाच्या हरकती दूर करण्यातही या भागातील जनतेला यश आले आहे; मात्र यानंतरही या कामास निधी उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी