शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाणी तलावात टाकण्यात अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:17 IST

हरणबारी उजव्या कालव्याचे पाणी ढोलबारे (ता. बागलाण) येथील पाझर तलावात टाकण्याच्या कामाला गत चार वर्षांपूर्वी शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. या तलावासाठी धरणातून पाण्याचे आरक्षणही मंजूर करण्यात आले आहे. या कामासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हरणबारी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गाकडून प्रांतवादाच्या मुद्द्यावर या कामास विरोध होण्याची शक्यता गृहीत धरून लोकप्रतिनिधीही राजकीय अडसर ठरणाºया या मुद्द्यालाच बगल देण्याचे काम करत असल्याने ढोलबारे धरण पाणीप्रश्न दिवसेंदिवस लांबताना दिसून येतो आहे.

वीरगाव : हरणबारी उजव्या कालव्याचे पाणी ढोलबारे (ता. बागलाण) येथील पाझर तलावात टाकण्याच्या कामाला गत चार वर्षांपूर्वी शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. या तलावासाठी धरणातून पाण्याचे आरक्षणही मंजूर करण्यात आले आहे. या कामासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हरणबारी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गाकडून प्रांतवादाच्या मुद्द्यावर या कामास विरोध होण्याची शक्यता गृहीत धरून लोकप्रतिनिधीही राजकीय अडसर ठरणाºया या मुद्द्यालाच बगल देण्याचे काम करत असल्याने ढोलबारे धरण पाणीप्रश्न दिवसेंदिवस लांबताना दिसून येतो आहे.  आरम व मोसम या दोन्हीही प्रमुख नद्यांमध्ये असलेल्या व अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाºया वीरगाव परिसरातील आठ ते दहा गावांतील शेती सिंचनासाठी कोणत्याही प्रभावी उपाययोजना शासन स्तरावरून नसल्याने येथील शेतीला वर्षानुवर्ष पावसाच्या पाण्यावरच विसंबून राहावे लागत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी गत दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत येथील शेतकरीवर्गाने एकत्र येत पाणी अडवा, पाणी जिरवा यासारखी अनेक कामे लोकसहभागाच्या जोरावर पूर्ण करून शेती सिंचनावर मात करण्यात काही अंशी यश मिळविले आहे. लोकसहभागाच्या जोरावर अनेक नाल्यांवर बांध घालून जमिनीत पाणी जिरविण्याचे काम शेतकरी वर्ग करीत असताना या नाल्यांना कायमस्वरूपी पाण्याचा प्रवाह उपलब्ध होणे ही काळाची गरज असून, हरणबारीच्या पाण्यातूनच हे साध्य होणार आहे.वीरगाव या गावापासून चार किमी अंतरावर ढोलबारे पाझर तलाव आहे. तलावाची साठवण क्षमता सुमारे १५ दलघफू एवढी आहे. या तलावाच्या उत्तरेस अवघ्या १.५ किमी अंतरावर हरणबारी धरणाचा उजवा कालवा वाहतो. या कालव्याद्वारे दरवर्षी हजारो क्यूसेस पूरपाणी वाहून जात असते. या पूरपाण्यातून लाभक्षेत्रातील बंधारे भरून अनेक नाल्यांमध्ये हे पाणी सोडले जात असल्याने कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतीला सोन्याचे दिवस आले आहेत.  एकीकडे ही परिस्थिती असताना अवघ्या दोन ते तीन किमी अंतरावरील वीरगाव परिसरातील शेतीला मात्र लहरी पावसाच्या पाण्यावरच वर्षानुवर्ष अवलंबून राहावे लागत आहे. याचमुळे हरणबारी धरणाचे पूरपाणी तसेच आरक्षित पाण्याचा फायदा वीरगाव परिसरातील शेतीसाठीही व्हावा यासाठी येथील शेतकरीवर्ग गत सात ते आठ वर्षांपासून याप्रश्नी आवाज उठविताना दिसून येत आहे.  या कामातील अनेक तांत्रिक त्रुटी दूर सारत कामास प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यात दिवंगत आमदार ए. टी. पवार यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. ११६० दलघफू क्षमता असलेल्या हरणबारी धरणातील पाण्याचा प्रत्येक थेंब अन् थेंब शेती व पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे.  गत आठ ते दहा वर्षांपासून मोसम नदीवर बंधारे बांधण्यासाठी शेतकरी वर्गाकडून आग्रही मागणी झाल्यानंतर या बंधाºयांसाठी साल्हेर वळण योजना १ व २ अंतर्गत पाण्याची उपलब्धता करण्यात आली आहे. याच उपलब्ध पाण्यातून ढोलबारे येथील पाझर तलावासाठीही पाणी आरक्षित करण्यात आले आहे.  कालवा खोदकाम मार्गातील शेतकरी वर्गाच्या हरकती दूर करण्यातही या भागातील जनतेला यश आले आहे; मात्र यानंतरही या कामास निधी उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी