शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाणी तलावात टाकण्यात अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:17 IST

हरणबारी उजव्या कालव्याचे पाणी ढोलबारे (ता. बागलाण) येथील पाझर तलावात टाकण्याच्या कामाला गत चार वर्षांपूर्वी शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. या तलावासाठी धरणातून पाण्याचे आरक्षणही मंजूर करण्यात आले आहे. या कामासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हरणबारी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गाकडून प्रांतवादाच्या मुद्द्यावर या कामास विरोध होण्याची शक्यता गृहीत धरून लोकप्रतिनिधीही राजकीय अडसर ठरणाºया या मुद्द्यालाच बगल देण्याचे काम करत असल्याने ढोलबारे धरण पाणीप्रश्न दिवसेंदिवस लांबताना दिसून येतो आहे.

वीरगाव : हरणबारी उजव्या कालव्याचे पाणी ढोलबारे (ता. बागलाण) येथील पाझर तलावात टाकण्याच्या कामाला गत चार वर्षांपूर्वी शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. या तलावासाठी धरणातून पाण्याचे आरक्षणही मंजूर करण्यात आले आहे. या कामासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हरणबारी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गाकडून प्रांतवादाच्या मुद्द्यावर या कामास विरोध होण्याची शक्यता गृहीत धरून लोकप्रतिनिधीही राजकीय अडसर ठरणाºया या मुद्द्यालाच बगल देण्याचे काम करत असल्याने ढोलबारे धरण पाणीप्रश्न दिवसेंदिवस लांबताना दिसून येतो आहे.  आरम व मोसम या दोन्हीही प्रमुख नद्यांमध्ये असलेल्या व अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाºया वीरगाव परिसरातील आठ ते दहा गावांतील शेती सिंचनासाठी कोणत्याही प्रभावी उपाययोजना शासन स्तरावरून नसल्याने येथील शेतीला वर्षानुवर्ष पावसाच्या पाण्यावरच विसंबून राहावे लागत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी गत दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत येथील शेतकरीवर्गाने एकत्र येत पाणी अडवा, पाणी जिरवा यासारखी अनेक कामे लोकसहभागाच्या जोरावर पूर्ण करून शेती सिंचनावर मात करण्यात काही अंशी यश मिळविले आहे. लोकसहभागाच्या जोरावर अनेक नाल्यांवर बांध घालून जमिनीत पाणी जिरविण्याचे काम शेतकरी वर्ग करीत असताना या नाल्यांना कायमस्वरूपी पाण्याचा प्रवाह उपलब्ध होणे ही काळाची गरज असून, हरणबारीच्या पाण्यातूनच हे साध्य होणार आहे.वीरगाव या गावापासून चार किमी अंतरावर ढोलबारे पाझर तलाव आहे. तलावाची साठवण क्षमता सुमारे १५ दलघफू एवढी आहे. या तलावाच्या उत्तरेस अवघ्या १.५ किमी अंतरावर हरणबारी धरणाचा उजवा कालवा वाहतो. या कालव्याद्वारे दरवर्षी हजारो क्यूसेस पूरपाणी वाहून जात असते. या पूरपाण्यातून लाभक्षेत्रातील बंधारे भरून अनेक नाल्यांमध्ये हे पाणी सोडले जात असल्याने कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतीला सोन्याचे दिवस आले आहेत.  एकीकडे ही परिस्थिती असताना अवघ्या दोन ते तीन किमी अंतरावरील वीरगाव परिसरातील शेतीला मात्र लहरी पावसाच्या पाण्यावरच वर्षानुवर्ष अवलंबून राहावे लागत आहे. याचमुळे हरणबारी धरणाचे पूरपाणी तसेच आरक्षित पाण्याचा फायदा वीरगाव परिसरातील शेतीसाठीही व्हावा यासाठी येथील शेतकरीवर्ग गत सात ते आठ वर्षांपासून याप्रश्नी आवाज उठविताना दिसून येत आहे.  या कामातील अनेक तांत्रिक त्रुटी दूर सारत कामास प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यात दिवंगत आमदार ए. टी. पवार यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. ११६० दलघफू क्षमता असलेल्या हरणबारी धरणातील पाण्याचा प्रत्येक थेंब अन् थेंब शेती व पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे.  गत आठ ते दहा वर्षांपासून मोसम नदीवर बंधारे बांधण्यासाठी शेतकरी वर्गाकडून आग्रही मागणी झाल्यानंतर या बंधाºयांसाठी साल्हेर वळण योजना १ व २ अंतर्गत पाण्याची उपलब्धता करण्यात आली आहे. याच उपलब्ध पाण्यातून ढोलबारे येथील पाझर तलावासाठीही पाणी आरक्षित करण्यात आले आहे.  कालवा खोदकाम मार्गातील शेतकरी वर्गाच्या हरकती दूर करण्यातही या भागातील जनतेला यश आले आहे; मात्र यानंतरही या कामास निधी उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी