शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

नाशिकमधील रक्तपेढ्या बनल्या जीवनदायिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 01:38 IST

‘रक्तदान महादान’, ‘रक्तदान जीवनदान’ अशा घोषवाक्यांद्वारे जनप्रबोधन केले जाते. नाशिक शहरात शासकीय व खासगी मिळून सुमारे दहा ते बारा रक्तपेढ्या कार्यान्वित असून, प्रत्येक रक्तपेढीमध्ये मागील वर्षभरात हजारो रक्तदात्यांकडून रक्तदान करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात शहरात एकूण सुमारे ६२ हजार १३४ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

ठळक मुद्देरक्तदात्यांची पंढरी : वर्षभरात एकूण ६२ हजार दात्यांकडून रक्तदान

अझहर शेख । लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘रक्तदान महादान’, ‘रक्तदान जीवनदान’ अशा घोषवाक्यांद्वारे जनप्रबोधन केले जाते. नाशिक शहरात शासकीय व खासगी मिळून सुमारे दहा ते बारा रक्तपेढ्या कार्यान्वित असून, प्रत्येक रक्तपेढीमध्ये मागील वर्षभरात हजारो रक्तदात्यांकडून रक्तदान करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात शहरात एकूण सुमारे ६२ हजार १३४ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. त्यामुळे नाशिकची महिमा ही खरी रक्तदात्यांची पंढरी असे म्हणणे वावगे ठरू नये. तरुणाईने पुढाकार घेत ऐच्छिक रक्तदाता होण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन शहरातील रक्तपेढ्यांकडून करण्यात आले आहे.रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले गेले आहे. कारण एखाद्या व्यक्तीचा जेव्हा मृत्यूशी संघर्ष सुरू असतो तेव्हा मिळालेल्या रक्तामुळे त्याला जीवदान मिळू शकते. त्यामुळे रक्तदानाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. सामाजिक संवेदनांची जाणीव ठेवून स्वयंस्फूर्तीने रक्तदान करत माणुसकी धर्म जोपासणे ही काळाची गरज आहे. शहरात रक्तदानाचे प्रमाण समाधानकारक जरी असले तरी उन्हाळ्यात काही रक्तगटांच्या रक्तपिशव्यांचा तुटवडा भासतो, असे रक्तपेढीचालक ांचे म्हणणे आहे. तसेच रक्तदानाचे प्रमाण जसे वाढत आहे, त्याचबरोबर शहरात रक्ताच्या गरजूंचीही संख्या वाढत आहे.शहराजवळून मुंबई, पुणे, औरंगाबाद यांसारखे महामार्ग जातात तसेच जिल्हा आदिवासी तालुक्यांचा आहे. त्यामुळे नाशिकची रक्ताची निकड नक्कीच जास्त आहे. काही वर्षांमध्ये नाशिक शहरात ‘मेडिकल टुरिझम’देखील विकसित होऊ पाहत आहे. कर्करोग, हृदयरोग यांसारख्या आजारांवरही दर्जेदार उपचार करणारी रुग्णालये शहरात सुरू झाली आहेत. त्यामुळे रक्ताची गरज अधिकाधिक भासणे हे स्वाभाविक आहे. संकलित केलेले रक्त ४२ दिवसांपेक्षा जास्त काळ टिकवून ठेवता येत नाही.जिल्हा रुग्णालयात मोफत रक्तपुरवठाजिल्हा शासकीय रुग्णालयात येणाऱ्या गर्भवती महिला, अपघातातील जखमींसह विविध आजारांच्या रुग्णांना येथील शासकीय मेट्रो रक्तपेढीतून मोफत रक्तपुरवठा केला जातो. चालू वर्षात अद्याप २ हजार ७४४ रक्तपिशव्यांचे संकलन झाले असून, ३ हजार ३८० रक्तपिशव्या गरजूंना दिल्या गेल्या आहेत. तसेच मागील वर्षात एकूण ६ हजार ६३४ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले होते. वर्षभरात ९ हजार ६७८ गरजूंना मोफत रक्तपुरवठा करण्यात आल्याची माहिती रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी गौरव शितोळे यांनी दिली.रक्तदान कोणाला करता येते?४ वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली प्रत्येक निरोगी व्यक्ती तीन महिन्यांमधून एकदा रक्तदान करू शकते.४ ज्या व्यक्तीचे वजन ४५ किलोपेक्षा अधिक आहे ती व्यक्ती.४ रक्तदानासाठी रक्तामधील हिमोग्लोबिनचे प्रमाण महत्त्वाचे मानले जाते.४ ज्या व्यक्तीचे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण १२ टक्के इतके आहे.४ प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातून केवळ ३०० मिलिपर्यंत रक्त संकलित केले जाते.

टॅग्स :NashikनाशिकBlood Bankरक्तपेढीHealthआरोग्य