शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

काळ्या मातीत मातीत.. तिफन चालती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:58 IST

नांदूरवैद्य : पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात खरीप पीक लागवडीची लगबग सुरू झाली असून, शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीची अंतिम तयारी करीत आहेत. येथील कृषी विभागाच्या वतीने ३३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

नांदूरवैद्य : पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात खरीप पीक लागवडीची लगबग सुरू झाली असून, शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीची अंतिम तयारी करीत आहेत. येथील कृषी विभागाच्या वतीने ३३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. इगतपुरी तालुक्यात रोहिणी नक्षत्राने जोरदार सलामी दिल्यानंतर यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याचा अंदाज शेतकऱ्यांना आला आहे. गेल्या आठवड्यात निसर्ग वादळाचा थोडाफार तडाखा बसला असला तरी तालुक्यात सुमारे ४९० मिमी पावसाची नोंद झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.इगतपुरी तालुका कृषी विभागाने तालुक्यातील घोटी आणि वैतरणा या तिन्ही मंडळ विभागात एकूण जवळपास सुमारे ३३ हजार ५०० हेक्टरवर यंदा खरिपाचे नियोजन केले आहे. यंदा प्रथमच इगतपुरी तालुक्यात मानवचलित भात लागवड यंत्राचा प्रयोग केला जाणार आहे. उत्पन्नवाढीसाठी शेतकºयांनी जमिनीचा पोत व पाण्याचा समतोल साधून योग्य पिकांची पेरणी करावी व चढ्या दराने बी-बियाणे, खते विक्र ी करणाºयांवर धडक कारवाईचा इशारा तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर यांनी केले आहे.मका १९ आणि वरई १ हजार २९७ हेक्टरवर पेरली जाणार आहे, तर उर्वरित हेक्टर क्षेत्रावर तूर, मूग, भुईमूग, उडीद, खुरसणी, सोयाबीन, वाल आदी तृणधान्य, कडधान्य व अन्नधान्य, वेलवर्गीय पिकांची पेरणी केली. यासाठी लागणारे बियाणे, औषधे, खतांचा साठा विविध कृषी केंद्रात उपलब्ध झालेला असून, दोन आठवड्यांपासून अनेक शेतकºयांना त्यांच्या बांधावर, गावात, घरी जाऊन निविष्ठा उपलब्ध करून दिली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन या तेलवर्गीय पिकांच्या लागवडीसाठी शेतकºयांनी घरगुती पद्धतीचे बियाणे वापरावे यासाठी तालुक्यात जनजागृती केली जात आहे. कृषी विभागाच्या अंदाज पत्रकानुसार तालुक्यातील मुख्य भात पिकांचे क्षेत्र कमी करून, सोयाबीनला शेतकरी अधिक पसंती देतील, असे दिसून येत आहे.कांदा, सोयाबीन, मक्याला पसंतीयेवला : तालुक्यात खरीपपूर्व मशागतीत शेतकरी व्यस्त असून, यंदा तालुक्यातील पीक पॅटर्नमध्ये बदल होत असल्याचे दिसून येत आहे. कांदा, सोयाबीन, मका या पिकांकडे शेतकºयांचा कल वाढल्याने या पिकांचे तालुक्यातील क्षेत्र वाढणार असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, तर कपाशीचे क्षेत्र घटले आहे.तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण ५४ हजार २३३ हेक्टर क्षेत्र आहे. प्रत्यक्षात मात्र सुमारे ६० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात खरीप पेरणी होते. तालुक्यातील शेती पडणाºया पावसावर अवलंबून आहे. गेल्या काही वर्षात तालुक्यात कांदा लागवडीत वाढ झाली असून, त्यापाठोपाठ मका, सोयाबीन पीक घेण्यास शेतकरीवर्गाची पसंती आहे. पीक पॅटर्न बदलामुळे तालुक्यातील कपाशीचे क्षेत्र घटले असून, तूर, उडीद, भुईमूग क्षेत्रातदेखील यंदा वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.तालुका परिसरात उत्तर-पूर्व भागात निसर्ग वादळाने आलेल्या पावसाने शेतजमिनीत ओल झाली. या ओलीवर अनेकांनी खरीप हंगामातील मका, बाजरी, मूग आदींच्या पेरण्या केल्या, तर काही भागात अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने पेरणीसाठी शेतकºयांना प्रतीक्षा करावी लागत आहे. कृषी विभाग तालुक्यात गावोगावी शेतकरी मेळावे घेऊन जनजागृती करत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक