शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

काळ्या मातीत मातीत.. तिफन चालती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 00:58 IST

नांदूरवैद्य : पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात खरीप पीक लागवडीची लगबग सुरू झाली असून, शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीची अंतिम तयारी करीत आहेत. येथील कृषी विभागाच्या वतीने ३३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

नांदूरवैद्य : पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी तालुक्यात खरीप पीक लागवडीची लगबग सुरू झाली असून, शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीची अंतिम तयारी करीत आहेत. येथील कृषी विभागाच्या वतीने ३३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. इगतपुरी तालुक्यात रोहिणी नक्षत्राने जोरदार सलामी दिल्यानंतर यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याचा अंदाज शेतकऱ्यांना आला आहे. गेल्या आठवड्यात निसर्ग वादळाचा थोडाफार तडाखा बसला असला तरी तालुक्यात सुमारे ४९० मिमी पावसाची नोंद झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.इगतपुरी तालुका कृषी विभागाने तालुक्यातील घोटी आणि वैतरणा या तिन्ही मंडळ विभागात एकूण जवळपास सुमारे ३३ हजार ५०० हेक्टरवर यंदा खरिपाचे नियोजन केले आहे. यंदा प्रथमच इगतपुरी तालुक्यात मानवचलित भात लागवड यंत्राचा प्रयोग केला जाणार आहे. उत्पन्नवाढीसाठी शेतकºयांनी जमिनीचा पोत व पाण्याचा समतोल साधून योग्य पिकांची पेरणी करावी व चढ्या दराने बी-बियाणे, खते विक्र ी करणाºयांवर धडक कारवाईचा इशारा तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर यांनी केले आहे.मका १९ आणि वरई १ हजार २९७ हेक्टरवर पेरली जाणार आहे, तर उर्वरित हेक्टर क्षेत्रावर तूर, मूग, भुईमूग, उडीद, खुरसणी, सोयाबीन, वाल आदी तृणधान्य, कडधान्य व अन्नधान्य, वेलवर्गीय पिकांची पेरणी केली. यासाठी लागणारे बियाणे, औषधे, खतांचा साठा विविध कृषी केंद्रात उपलब्ध झालेला असून, दोन आठवड्यांपासून अनेक शेतकºयांना त्यांच्या बांधावर, गावात, घरी जाऊन निविष्ठा उपलब्ध करून दिली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोयाबीन या तेलवर्गीय पिकांच्या लागवडीसाठी शेतकºयांनी घरगुती पद्धतीचे बियाणे वापरावे यासाठी तालुक्यात जनजागृती केली जात आहे. कृषी विभागाच्या अंदाज पत्रकानुसार तालुक्यातील मुख्य भात पिकांचे क्षेत्र कमी करून, सोयाबीनला शेतकरी अधिक पसंती देतील, असे दिसून येत आहे.कांदा, सोयाबीन, मक्याला पसंतीयेवला : तालुक्यात खरीपपूर्व मशागतीत शेतकरी व्यस्त असून, यंदा तालुक्यातील पीक पॅटर्नमध्ये बदल होत असल्याचे दिसून येत आहे. कांदा, सोयाबीन, मका या पिकांकडे शेतकºयांचा कल वाढल्याने या पिकांचे तालुक्यातील क्षेत्र वाढणार असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, तर कपाशीचे क्षेत्र घटले आहे.तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण ५४ हजार २३३ हेक्टर क्षेत्र आहे. प्रत्यक्षात मात्र सुमारे ६० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात खरीप पेरणी होते. तालुक्यातील शेती पडणाºया पावसावर अवलंबून आहे. गेल्या काही वर्षात तालुक्यात कांदा लागवडीत वाढ झाली असून, त्यापाठोपाठ मका, सोयाबीन पीक घेण्यास शेतकरीवर्गाची पसंती आहे. पीक पॅटर्न बदलामुळे तालुक्यातील कपाशीचे क्षेत्र घटले असून, तूर, उडीद, भुईमूग क्षेत्रातदेखील यंदा वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.तालुका परिसरात उत्तर-पूर्व भागात निसर्ग वादळाने आलेल्या पावसाने शेतजमिनीत ओल झाली. या ओलीवर अनेकांनी खरीप हंगामातील मका, बाजरी, मूग आदींच्या पेरण्या केल्या, तर काही भागात अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने पेरणीसाठी शेतकºयांना प्रतीक्षा करावी लागत आहे. कृषी विभाग तालुक्यात गावोगावी शेतकरी मेळावे घेऊन जनजागृती करत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक