शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

काळविटाची शिकार करणाऱ्यास कोठडी

By admin | Updated: June 12, 2017 00:47 IST

ममदापूर संवर्धन : उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक

लोकमत न्यूज नेटवर्कममदापूर : काळविटाची शिकार करणाऱ्या मालेगाव येथील दस्तगीर मोहम्मद हारून याला १६ जूनपर्यंत वनविभागाची कोठडी सुनावण्यात आली आहे. चार आरोपींना अटक करण्यासाठी तसेच पुढील तपास करण्यासाठी पोलीस आणि वन अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाने सांगितले.शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास मालेगावच्या पाच शिकाऱ्यांनी ममदापूर संवर्धन राखीव अंतर्गत येणाऱ्या कोळम येथील जंगलात एका काळविटाची गोळ्या झाडून हत्या केली. नंतर हरीण गाडीमध्ये टाकण्यासाठी उचलताना राजापूर येथील संतोष चव्हाण, कोळम येथील राजेंद्र आवारे व नाना चव्हाण यांनी पाहिले व स्वत: जिवाची पर्वा न करता बंदुकधारी शिकाऱ्याशी दोन हात करत दस्तगीर मोहम्मद या एका शिकाऱ्याला गाडीच्या खाली ओढले. दरम्यान, उर्वरित चौघे शिकारी पळून गेले. यापूर्वी २७ जुलै २००९ रोजी मालेगाव येथील चार शिकाऱ्यांनी दोन हरिणांची रेंडाळा भागात शिकार करून पलायन करतानाच खरवंडी येथील लोकांनी पकडून यथेच्छ चोप दिला होता. तसेच शिकाऱ्यांची गाडीदेखील पेटवून दिली होती, तेव्हाची अर्धवट जळालेली गाडी अद्यापही राजापूर येथील फॉरेस्ट कॉलनीत आहे. बाकी स्थानिक लोकांनी जीव धोक्यात घालून पकडलेल्या आरोपींचे काय झाले? या आरोपींना शिक्षा झाली की ताबडतोब सुटका केली. याविषयी कोणतीही माहिती वनविभागाने दिली नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे. या भागात वनविभागाचे पगारी कर्मचारी असतानाही राजापूर, ममदापूर, खरवंडी, देवदरी, रहाडी, कोळम, भारम या भागातील शेतकरी हरिणांची जिवापाड देखभाल करतात. उभ्या पिकांची नासाडी केली तरी शेतकरी या हरिणांचे रक्षण करतात, सन २००९ मधील काळविटाची शिकार झालेल्या घटनेतील आरोपी व त्यांच्यावरील कारवाई गुलदस्त्यात आहे. मध्यंतरी हरिणांची शिकार करण्याकरिता मालेगाव परिसरातून टोळकी रात्रीच्या वेळेला येत असल्याची चर्चा या वनविभागाच्या परिसरात होती. अनेकदा गोळीबारीचे आवाजही ऐकल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. तब्बल आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून शिकाऱ्याशी दोन हात केले; मात्र वनविभागाचे पगारी अधिकारी व कर्मचारी हे नेमके करतात तरी काय ? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. दिवसा जर हरिणांची शिकार होते आहे तर रात्री काय घडत असेल अशा चर्चांना उधाण आले आहे. आता या चार आरोपींना किती दिवसात पकडण्यात पोलिसांना यश येते आणि आरोपपत्र दाखल होऊन आरोपींना कधी शिक्षा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.