शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

श्रमिकांच्या हक्कांवर भाजपाकडून गदा :  अमरजित कौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 01:02 IST

येत्या जानेवारी महिन्यात श्रमिक कामगारांच्या राष्टÑव्यापी संपामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावे. या संपाला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक घटकाचे सहकार्य गरजेचे आहे. श्रमिकांना संविधानाने दिलेल्या न्यायहक्कांवर भाजपाकडून गदा आणली जात असून, सरकारला श्रमिकांची ताकद दाखविण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन कॉम्रेड अमरजित कौर यांनी केले.

नाशिक : येत्या जानेवारी महिन्यात श्रमिक कामगारांच्या राष्टÑव्यापी संपामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावे. या संपाला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक घटकाचे सहकार्य गरजेचे आहे. श्रमिकांना संविधानाने दिलेल्या न्यायहक्कांवर भाजपाकडून गदा आणली जात असून, सरकारला श्रमिकांची ताकद दाखविण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन कॉम्रेड अमरजित कौर यांनी केले.  अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी रविवारी (दि.२५) आयोजित संविधान जागर सभेत कौर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होत्या.  यावेळी व्यासपीठावर राज्य सरचिटणीस श्याम काळे, सुकुमार दामले, मोहन शर्मा, कृष्णा भोईर, दिली उताणे, सुमन पुजारी, जिल्हाध्यक्ष व्ही. डी. धनवटे, रावसाहेब ढेमसे, सुवर्णा मेतकर, विजय दराडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कौर म्हणाल्या, भाजपाचे सरकार देशात व महाराष्टÑात असून या सरकारकडून बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर हल्ला चढविला जात आहे. त्यामुळे संविधानाचा जागर करण्याची वेळ आली आहे. संविधानाच्या संरक्षणासाठी येत्या दि.९ जानेवारीला रस्त्यावर सर्व कामगार कष्टकरी उतरून सरकारवर हल्लाबोल करणार आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे, असे कौर यावेळी म्हणाल्या. दरम्यान, आयटकची राज्य कार्यकारिणीची घोषणा यावेळी करण्यात आली. सी. एन. देशमुख यांची राज्य अध्यक्षपदी, तर दिलीप पवार यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.हाताल लाल बावटा घेत घोषणाबाजीअधिवेशनाच्या समारोपाच्या निमित्ताने दुपारी द्वारका ते बोधलेनगरपर्यंत पुणे महामार्गावरून आयटकच्या वतीने ‘संविधान बचाव फेरी’ काढण्यात आली. आयटकचा झेंडा हातात घेत शेकडो शेतकरी श्रमिक वर्ग या फेरीमध्ये सहभागी झाले होते. आशा सेविकांची संख्या यामध्ये लक्षणीय होती. ‘कामगारांना किमान वेतन, सामाजिक सुरक्षा द्या, कंत्राटी कामागारांना कायम करा, बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवा आदी मागण्यांचे फलक यावेळी कामगारांनी झळकाविले.मोदी केवळ खोटी आश्वासने देऊ शकतातसार्वजनिक क्षेत्र संपुष्टात आणून कंत्राटी व खासगीकरणावर भाजपाचे सरकार भर देत आहेत. बहुतांश क ष्टकऱ्यांना कामागारांचा दर्जा दिला गेला नाही, त्यामुळे त्यांना सगळ्या सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. शेतकरी व शेतमुजरांची मागील चार वर्षांपासून मोदी सरकारकडून दिशाभूल केली जात असल्याची टीका कौर यांनी यावेळी बोलताना केली. खोटी आश्वासने देण्यापलीकडे भाजपा सरकारला काहीही करता आले नाही. नोटाबंदीच्या निर्णयामुळे कामगारांना देशोधडीला लावले. हजारो ते लाखो कामगारांना नोकºयांवर पाणी सोडावे लागल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकEmployeeकर्मचारी