शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

श्रमिकांच्या हक्कांवर भाजपाकडून गदा :  अमरजित कौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 01:02 IST

येत्या जानेवारी महिन्यात श्रमिक कामगारांच्या राष्टÑव्यापी संपामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावे. या संपाला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक घटकाचे सहकार्य गरजेचे आहे. श्रमिकांना संविधानाने दिलेल्या न्यायहक्कांवर भाजपाकडून गदा आणली जात असून, सरकारला श्रमिकांची ताकद दाखविण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन कॉम्रेड अमरजित कौर यांनी केले.

नाशिक : येत्या जानेवारी महिन्यात श्रमिक कामगारांच्या राष्टÑव्यापी संपामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावे. या संपाला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक घटकाचे सहकार्य गरजेचे आहे. श्रमिकांना संविधानाने दिलेल्या न्यायहक्कांवर भाजपाकडून गदा आणली जात असून, सरकारला श्रमिकांची ताकद दाखविण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन कॉम्रेड अमरजित कौर यांनी केले.  अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी रविवारी (दि.२५) आयोजित संविधान जागर सभेत कौर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होत्या.  यावेळी व्यासपीठावर राज्य सरचिटणीस श्याम काळे, सुकुमार दामले, मोहन शर्मा, कृष्णा भोईर, दिली उताणे, सुमन पुजारी, जिल्हाध्यक्ष व्ही. डी. धनवटे, रावसाहेब ढेमसे, सुवर्णा मेतकर, विजय दराडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कौर म्हणाल्या, भाजपाचे सरकार देशात व महाराष्टÑात असून या सरकारकडून बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर हल्ला चढविला जात आहे. त्यामुळे संविधानाचा जागर करण्याची वेळ आली आहे. संविधानाच्या संरक्षणासाठी येत्या दि.९ जानेवारीला रस्त्यावर सर्व कामगार कष्टकरी उतरून सरकारवर हल्लाबोल करणार आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे, असे कौर यावेळी म्हणाल्या. दरम्यान, आयटकची राज्य कार्यकारिणीची घोषणा यावेळी करण्यात आली. सी. एन. देशमुख यांची राज्य अध्यक्षपदी, तर दिलीप पवार यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.हाताल लाल बावटा घेत घोषणाबाजीअधिवेशनाच्या समारोपाच्या निमित्ताने दुपारी द्वारका ते बोधलेनगरपर्यंत पुणे महामार्गावरून आयटकच्या वतीने ‘संविधान बचाव फेरी’ काढण्यात आली. आयटकचा झेंडा हातात घेत शेकडो शेतकरी श्रमिक वर्ग या फेरीमध्ये सहभागी झाले होते. आशा सेविकांची संख्या यामध्ये लक्षणीय होती. ‘कामगारांना किमान वेतन, सामाजिक सुरक्षा द्या, कंत्राटी कामागारांना कायम करा, बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवा आदी मागण्यांचे फलक यावेळी कामगारांनी झळकाविले.मोदी केवळ खोटी आश्वासने देऊ शकतातसार्वजनिक क्षेत्र संपुष्टात आणून कंत्राटी व खासगीकरणावर भाजपाचे सरकार भर देत आहेत. बहुतांश क ष्टकऱ्यांना कामागारांचा दर्जा दिला गेला नाही, त्यामुळे त्यांना सगळ्या सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. शेतकरी व शेतमुजरांची मागील चार वर्षांपासून मोदी सरकारकडून दिशाभूल केली जात असल्याची टीका कौर यांनी यावेळी बोलताना केली. खोटी आश्वासने देण्यापलीकडे भाजपा सरकारला काहीही करता आले नाही. नोटाबंदीच्या निर्णयामुळे कामगारांना देशोधडीला लावले. हजारो ते लाखो कामगारांना नोकºयांवर पाणी सोडावे लागल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकEmployeeकर्मचारी