शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

श्रमिकांच्या हक्कांवर भाजपाकडून गदा :  अमरजित कौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 01:02 IST

येत्या जानेवारी महिन्यात श्रमिक कामगारांच्या राष्टÑव्यापी संपामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावे. या संपाला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक घटकाचे सहकार्य गरजेचे आहे. श्रमिकांना संविधानाने दिलेल्या न्यायहक्कांवर भाजपाकडून गदा आणली जात असून, सरकारला श्रमिकांची ताकद दाखविण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन कॉम्रेड अमरजित कौर यांनी केले.

नाशिक : येत्या जानेवारी महिन्यात श्रमिक कामगारांच्या राष्टÑव्यापी संपामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हावे. या संपाला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक घटकाचे सहकार्य गरजेचे आहे. श्रमिकांना संविधानाने दिलेल्या न्यायहक्कांवर भाजपाकडून गदा आणली जात असून, सरकारला श्रमिकांची ताकद दाखविण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन कॉम्रेड अमरजित कौर यांनी केले.  अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी रविवारी (दि.२५) आयोजित संविधान जागर सभेत कौर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होत्या.  यावेळी व्यासपीठावर राज्य सरचिटणीस श्याम काळे, सुकुमार दामले, मोहन शर्मा, कृष्णा भोईर, दिली उताणे, सुमन पुजारी, जिल्हाध्यक्ष व्ही. डी. धनवटे, रावसाहेब ढेमसे, सुवर्णा मेतकर, विजय दराडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कौर म्हणाल्या, भाजपाचे सरकार देशात व महाराष्टÑात असून या सरकारकडून बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर हल्ला चढविला जात आहे. त्यामुळे संविधानाचा जागर करण्याची वेळ आली आहे. संविधानाच्या संरक्षणासाठी येत्या दि.९ जानेवारीला रस्त्यावर सर्व कामगार कष्टकरी उतरून सरकारवर हल्लाबोल करणार आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे, असे कौर यावेळी म्हणाल्या. दरम्यान, आयटकची राज्य कार्यकारिणीची घोषणा यावेळी करण्यात आली. सी. एन. देशमुख यांची राज्य अध्यक्षपदी, तर दिलीप पवार यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.हाताल लाल बावटा घेत घोषणाबाजीअधिवेशनाच्या समारोपाच्या निमित्ताने दुपारी द्वारका ते बोधलेनगरपर्यंत पुणे महामार्गावरून आयटकच्या वतीने ‘संविधान बचाव फेरी’ काढण्यात आली. आयटकचा झेंडा हातात घेत शेकडो शेतकरी श्रमिक वर्ग या फेरीमध्ये सहभागी झाले होते. आशा सेविकांची संख्या यामध्ये लक्षणीय होती. ‘कामगारांना किमान वेतन, सामाजिक सुरक्षा द्या, कंत्राटी कामागारांना कायम करा, बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवा आदी मागण्यांचे फलक यावेळी कामगारांनी झळकाविले.मोदी केवळ खोटी आश्वासने देऊ शकतातसार्वजनिक क्षेत्र संपुष्टात आणून कंत्राटी व खासगीकरणावर भाजपाचे सरकार भर देत आहेत. बहुतांश क ष्टकऱ्यांना कामागारांचा दर्जा दिला गेला नाही, त्यामुळे त्यांना सगळ्या सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. शेतकरी व शेतमुजरांची मागील चार वर्षांपासून मोदी सरकारकडून दिशाभूल केली जात असल्याची टीका कौर यांनी यावेळी बोलताना केली. खोटी आश्वासने देण्यापलीकडे भाजपा सरकारला काहीही करता आले नाही. नोटाबंदीच्या निर्णयामुळे कामगारांना देशोधडीला लावले. हजारो ते लाखो कामगारांना नोकºयांवर पाणी सोडावे लागल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकEmployeeकर्मचारी