शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

भाजपाने नाशिककरांच्या पाठीत खंजीर खुपसला : समीर भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:31 IST

नाशिक जिल्हा दुष्काळात होरपळत असताना शासनाकडून नाशिक जिल्ह्यातील धरणांचे पाणी जायकवाडीला सोडण्याचा निर्णय घेणे हे अत्यंत दुर्दैवी असून, सत्ताधारी भाजपाकडून पाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध असल्याचे दाखविण्याचा खोटा प्रयत्न करणे  हा नाशिककरांच्या भावनांशी चालविलेला खेळ आहे, असे नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी म्हटले आहे.

नाशिक : नाशिक जिल्हा दुष्काळात होरपळत असताना शासनाकडून नाशिक जिल्ह्यातील धरणांचे पाणी जायकवाडीला सोडण्याचा निर्णय घेणे हे अत्यंत दुर्दैवी असून, सत्ताधारी भाजपाकडूनपाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध असल्याचे दाखविण्याचा खोटा प्रयत्न करणे  हा नाशिककरांच्या भावनांशी चालविलेला खेळ आहे, असे नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी म्हटले आहे.  यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात समीर भुजबळ यांनी म्हटले आहे की, नाशिककरांनी भाजपाकडे एकहाती सत्ता दिली आहे. नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता, शहरातील तिन्ही आमदार त्याचप्रमाणे पालकमंत्री आणि सरकारसुद्धा भाजपाचे असूनही वेळोवेळी सत्ताधारी भाजपाकडून नाशिककरांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले जात आहे. नाशिक शहरातील करवाढ करतानाही नाशिककरांनी सत्ताधाऱ्यांच्या नौटंकीचा अनुभव घेतला आहे.  नाशिककरांना पिण्याच्या पाण्याची चिंता असताना नाशिकचे पाणी डोळ्यादेखत जाणे हे अतिशय दुर्दैवी आहे. एकीकडे जलसंपदा विभागाचे मंत्री हे नाशिकचे पालकमंत्री असताना नाशिकचे पाणी पळविले जाणे ही सत्ताधारी भाजपाकडून नाशिककरांची दिशाभूल आहे. नाशिक महानगरपालिकेच्या महासभेमध्ये सत्ताधाºयांकडून गंगापूरमधील पाण्यासाठी विषय घेतला जातो, हा नाशिककरांच्या भावनांशी खेळ आहे. नाशिक शहरातील सत्ताधाºयांनी नाशिकचे दत्तक पिता मुख्यमंत्री व नाशिकचे पालकमंत्री असलेले जलसंपदामंत्री यांच्याकडे जाऊन नाशिकमधील तीव्र दुष्काळाची वस्तुस्थिती लक्षात आणून देण्याची आवश्यकता होती. जायकवाडीला सोडल्या जाणाºया पाण्याबाबत न्यायालयाचा निर्णय म्हणून सरकारकडून सांगितले जाते.अन्याय न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावाकोर्टाने निर्णय दिला असे सांगून हात झटकायचे; मात्र नाशिककरांवर होणारा अन्याय सरकारी पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणे ही सरकारची जबाबदारी नाही काय? असा सवालही समीर भुजबळ यांनी केला आहे. नाशिककरांच्या हक्काचे पाणी राजकीय लाभाकरिता इतरत्र देणे हे सत्ताधाºयांना शोभनीय नसल्याचे समीर भुजबळ यांनी म्हटले आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणीBJPभाजपा