शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

बड्या नेत्यांनी उदासिनता दाखवल्यानेच भाजपचा पोटनिवडणूकीत पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 00:28 IST

तीन वर्षांपूर्वी शहरात भाजपची इतकी लाट होती की तीन आमदारांबरोबरच भाजपने महापालिकेत विक्रमी बहुमत मिळवले होते. मात्र, विधानसभा निवडणूकीतील राज्यातील अपयशाचा फटका सर्वत्र बसु लागला आहे. नाशिक महापालिकेच्या पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीने एकसंघपणे काम केल्याने त्यांना यश मिळाले असले तरी भाजपचा नाकर्तेपणाही तितकाच कारणीभूत आहे. या निवडणूकीला स्थानिक आणि वरीष्ठ पातळीवर फार महत्व दिले गेले नाही. त्यातूनच हा पराभव झाल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देपोटनिवडणूकीचा कौलमहाविकास आघाडीची सरशी

संजय पाठक, नाशिक- तीन वर्षांपूर्वी शहरात भाजपची इतकी लाट होती की तीन आमदारांबरोबरच भाजपने महापालिकेत विक्रमी बहुमत मिळवले होते. मात्र, विधानसभा निवडणूकीतील राज्यातील अपयशाचा फटका सर्वत्र बसु लागला आहे. नाशिक महापालिकेच्या पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीने एकसंघपणे काम केल्याने त्यांना यश मिळाले असले तरी भाजपचा नाकर्तेपणाही तितकाच कारणीभूत आहे. या निवडणूकीला स्थानिक आणि वरीष्ठ पातळीवर फार महत्व दिले गेले नाही. त्यातूनच हा पराभव झाल्याचे दिसत आहे.

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ आणि २६ मध्ये झालेल्या पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचे जगदीश पवार आणि मधूकर जाधव निवडून आले आहेत. जगदीश पवार हे राष्टÑवादीचे तर मधूकर जाधव हे शिवसेनेचे आहेत. प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपच्या सरोज आहिरे यापूर्वी नगरसेविका होत्या. विधानसभा निवडणूक भाजपकडून इच्छुक होत्या. परंतु शिवसेना- भाजप युती झाल्याने त्यांची अडचण झाली. राष्टÑवादीकडून त्या निवडणूक लढल्या आणि विजयी झाल्या. सहाजिकच त्यांच्या जागी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणणे हे त्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेचे होते. जगदीश पवार निवडून आल्याने ही प्रतिष्ठा राखली गेली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत प्रभाग क्रमांक २६ मधील शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी राजीनामा दिला आणि मनसेकडून विधान सभा निवडणूक लढविली होती. त्यात पराभव झाल्याने पुन्हा त्यांनी नगरसेवकपदाकडे लक्ष दिले परंतु यंदा त्यांना मतदारांनी साथ नाकरल्याने बाबा गेल्या आणि दशम्याही अशी त्यांची अवस्था झाली.

मधूकर जाधव तसे राष्ट्रवादीचे ! ते शिवसेनेकडून निवडणूक लढले तर जगदीश पवार यांना भाजपातील बंडखोरीची साथ लाभली. रामदास सदाफुले या बंडखोराचा विजय झाला तर नाहीच परंतु भाजपच्या डॉ. विशाखा शिरसाट यांना पराभूत करण्यात मात्र ते यशस्वी ठरले. हा सर्व खेळ सुरू असताना भाजपकडून अत्यंत निराशाजनक वातावरण होते. राज्यात सत्ता असताना येणारे कोणी नेते नाशिककडे फिरकले नाही. यापूर्वीच्या महापालिका निवडणूकीत तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष घातले होते. मात्र, त्यावेळी आपल्या मुळेच पक्षाची सत्ता आली असा भ्रम असणारे अन्य स्थानिक नेते होते. यंदा महाजन यांनी लक्ष काढून घेतल्यानंतर त्यांना देखील आपली किंमत कळाली. मुळातच विधान सभा निवडणूकीपासून भाजपतील गटबाजी अंतिम टप्प्यात पोहोचू लागली आहे. महापौरपद हुकल्यानंतर अनेक आयाराम आता परतीच्या मार्गावर लागले आहेत. ते पक्षात असल्याने बाजुल्या पडलेल्या मुळ भाजप नेत्यांनी यानिवडणूकीत लक्ष घातले नाही आणि आयाराम असलेल्यांनी तर आता सर्वच गोष्टीतून अंग काढून घेतले आहे. त्याचा साराच परीणाम या निवडणुकीवर जाणवला.

पक्षीय बळ घटल्याने आता महापालिकेच्या हातातून स्थायी समिती जाईल अशी चर्चा आहे. ते खरे होईल किंवा नाही हे दिसेलच परंतु पडझड झालीच तर ते सावरणे कठीण होईल. त्यासाठी आताच तटबंदी केली नाही तर दोन वर्षांनी होणारी महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक कठीण जाणार आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक