शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ-राऊतांकडून भाजपला टोले

By श्याम बागुल | Updated: December 26, 2019 18:52 IST

‘मुंबईसह संयुक्त महाराष्टÑ झालाच पाहिजे ही लढाई लढणारे जे पाचरत्ने होती, त्यातील आचार्य अत्रे व त्यांचे वृत्तपत्र ‘मराठा’ या दोघांची भूमिका ‘संयुक्त महाराष्टÑ झालाच पाहिजे’ अशी आवर्जून मागणी होती. तशीच मागणी किंबहुना घोषणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या

ठळक मुद्देशिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यात संजय राऊत यांनी मोठी हिंमत दिलीविरोधी पक्षात असताना कशी मजा असते ते छगन भुजबळ यांनी चांगलेच अनुभवले

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनानिमित्त पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर राष्टÑवादीचे नेते, ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणात भारतीय जनता पक्ष व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. भुजबळ यांनी संजय राऊत यांना उद्देशून ‘यांनी सरकार घालविलेच’ असे गौरवोद्गार काढले, तर राऊत यांनी आपल्या भाषणात, भुजबळ यांनी विरोधी पक्षनेता म्हणून चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या कामकाजाची पद्धती विद्यमान विरोधी पक्ष नेत्यांनी अवलंबली तर महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चांगले काम करेल व त्यांचे विरोधी पक्ष नेतेपदही शाबूत राहील, असा टोला देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच संयुक्त महाराष्टÑाच्या लढ्यापासून केली. ‘मुंबईसह संयुक्त महाराष्टÑ झालाच पाहिजे ही लढाई लढणारे जे पाचरत्ने होती, त्यातील आचार्य अत्रे व त्यांचे वृत्तपत्र ‘मराठा’ या दोघांची भूमिका ‘संयुक्त महाराष्टÑ झालाच पाहिजे’ अशी आवर्जून मागणी होती. तशीच मागणी किंबहुना घोषणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊत यांची होती. ‘शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच, झालाच पाहिजे’ असा त्यांनी जो काही धोशा लावला होता, ते पाहून मला आज ‘मराठा’ची आठवण तर झालीच, परंतु शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यात संजय राऊत यांनी मोठी हिंमत दिली व त्यामुळेच भारतीय जनता पक्षाचे सरकार घालविण्याची मोठी लढाई आपण जिंकलो’ अशा शब्दात भुजबळ यांनी राऊत यांचे कौतुक केले. तर संजय राऊत यांनीदेखील आपल्यातील पत्रकार अद्याप कायम असल्याचे सांगत, ‘सरकार एकीकडे तर आम्ही दुसरीकडे कायम असतो. कारण विरोधी पक्षात असताना कशी मजा असते ते छगन भुजबळ यांनी चांगलेच अनुभवले आहे. त्यांची कामकाजाची पद्धती सध्याच्या विरोधी पक्ष नेत्यांना समजावून सांगितली तर राज्यात चांगले वातावरण निर्माण होईल. सरकारही पाच वर्षे चांगले काम करेल व विरोधी पक्ष नेतेपदही कायम राहील’ असा टोला देवेंद्र फडणवीस यांना लगावला. भुजबळ यांनी दिल्लीत महाराष्टÑ सदनाची देखणी व भव्य वास्तू बांधली आहे, त्यावेळी भुजबळ यांच्यावर टीका होत असताना मी एकटाच त्यांच्या बाजूने बोलत होतो. राज्य सरकारचा एक रुपयाही खर्च न होता भव्य वास्तू त्यांनी बांधली, तशीच वास्तू आता जिल्हा परिषदेने उभारावी. पुढच्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन होणार असल्याने सरकार सहा महिनेच चालेल असे जे काही म्हटले जाते, त्यात कोणतेही तथ्य नाही. उलट ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार पाच वर्षे तर चालेलच, परंतु आगामी पंचवीस वर्षेदेखील उत्तम कामगिरी करून देशात महाराष्टÑाचा नावलौकिक वाढवेल, असे राऊत म्हणाले.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळNashikनाशिकSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारण