शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

भुजबळ-राऊतांकडून भाजपला टोले

By श्याम बागुल | Updated: December 26, 2019 18:52 IST

‘मुंबईसह संयुक्त महाराष्टÑ झालाच पाहिजे ही लढाई लढणारे जे पाचरत्ने होती, त्यातील आचार्य अत्रे व त्यांचे वृत्तपत्र ‘मराठा’ या दोघांची भूमिका ‘संयुक्त महाराष्टÑ झालाच पाहिजे’ अशी आवर्जून मागणी होती. तशीच मागणी किंबहुना घोषणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या

ठळक मुद्देशिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यात संजय राऊत यांनी मोठी हिंमत दिलीविरोधी पक्षात असताना कशी मजा असते ते छगन भुजबळ यांनी चांगलेच अनुभवले

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनानिमित्त पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर राष्टÑवादीचे नेते, ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या भाषणात भारतीय जनता पक्ष व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. भुजबळ यांनी संजय राऊत यांना उद्देशून ‘यांनी सरकार घालविलेच’ असे गौरवोद्गार काढले, तर राऊत यांनी आपल्या भाषणात, भुजबळ यांनी विरोधी पक्षनेता म्हणून चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या कामकाजाची पद्धती विद्यमान विरोधी पक्ष नेत्यांनी अवलंबली तर महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चांगले काम करेल व त्यांचे विरोधी पक्ष नेतेपदही शाबूत राहील, असा टोला देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच संयुक्त महाराष्टÑाच्या लढ्यापासून केली. ‘मुंबईसह संयुक्त महाराष्टÑ झालाच पाहिजे ही लढाई लढणारे जे पाचरत्ने होती, त्यातील आचार्य अत्रे व त्यांचे वृत्तपत्र ‘मराठा’ या दोघांची भूमिका ‘संयुक्त महाराष्टÑ झालाच पाहिजे’ अशी आवर्जून मागणी होती. तशीच मागणी किंबहुना घोषणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊत यांची होती. ‘शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच, झालाच पाहिजे’ असा त्यांनी जो काही धोशा लावला होता, ते पाहून मला आज ‘मराठा’ची आठवण तर झालीच, परंतु शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यात संजय राऊत यांनी मोठी हिंमत दिली व त्यामुळेच भारतीय जनता पक्षाचे सरकार घालविण्याची मोठी लढाई आपण जिंकलो’ अशा शब्दात भुजबळ यांनी राऊत यांचे कौतुक केले. तर संजय राऊत यांनीदेखील आपल्यातील पत्रकार अद्याप कायम असल्याचे सांगत, ‘सरकार एकीकडे तर आम्ही दुसरीकडे कायम असतो. कारण विरोधी पक्षात असताना कशी मजा असते ते छगन भुजबळ यांनी चांगलेच अनुभवले आहे. त्यांची कामकाजाची पद्धती सध्याच्या विरोधी पक्ष नेत्यांना समजावून सांगितली तर राज्यात चांगले वातावरण निर्माण होईल. सरकारही पाच वर्षे चांगले काम करेल व विरोधी पक्ष नेतेपदही कायम राहील’ असा टोला देवेंद्र फडणवीस यांना लगावला. भुजबळ यांनी दिल्लीत महाराष्टÑ सदनाची देखणी व भव्य वास्तू बांधली आहे, त्यावेळी भुजबळ यांच्यावर टीका होत असताना मी एकटाच त्यांच्या बाजूने बोलत होतो. राज्य सरकारचा एक रुपयाही खर्च न होता भव्य वास्तू त्यांनी बांधली, तशीच वास्तू आता जिल्हा परिषदेने उभारावी. पुढच्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन होणार असल्याने सरकार सहा महिनेच चालेल असे जे काही म्हटले जाते, त्यात कोणतेही तथ्य नाही. उलट ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार पाच वर्षे तर चालेलच, परंतु आगामी पंचवीस वर्षेदेखील उत्तम कामगिरी करून देशात महाराष्टÑाचा नावलौकिक वाढवेल, असे राऊत म्हणाले.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळNashikनाशिकSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारण