शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

उद्धव ठाकरे मानसिक आजारी आहेत; चंद्रशेखर बावनकुळे यांचा नाशकात ठाकरे यांना टोला

By संकेत शुक्ला | Updated: May 18, 2024 16:39 IST

नाशिक येथे आयोजित पदाधिकारी मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

संकेत शुक्ल, नाशिक :उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले आहेत. त्यामुळे ते काहीही बडबड करीत आहेत. अन्यथा भगव्या ध्वजाबाबत त्यांनी असे उद्गार काढले नसते, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे यांना लगावला. नाशिक येथे आयोजित पदाधिकारी मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, चोरांचे सरदार कोण आहेत हे संपूर्ण राज्याने पाहिले आहे. 

राज्यासह मुंबई मनपा लुटण्याचा प्रकार ठाकरे यांनी केल्याचे सगळ्यांना ज्ञात आहे. शिंदे-फडणवीस सरकारमुळे विकास झाला. मात्र, ठाकरे यांना तो दिसत नाही. उद्धव यांनी हिंदुत्व सोडले नसते, काँग्रेस सोबत गेले नसते तर ते फस्ट्रेट झाले नसते. भगव्या ध्वजाबाबत त्यांनी काढलेले उद्गार त्यांच्या पराभूत मानसिकतेचे द्योतक असल्याचेही ते म्हणाले. ठाकरे आडनावाला वलय आहे. परंतु राज ठाकरे यांना बाहेर काढण्यात आले. उद्धव यांनीच त्यांना बाजूला केले. राज ठाकरे यांनी भाजपला समर्थन देण्याचा निर्णय योग्य आहे. पंतप्रधान मोदी राज यांच्या मागण्या नक्कीच पूर्ण करतील, असा आम्हाला विश्वास आहे. शरद पवार यांच्याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, पवारांचा पक्ष बारामतीतही हरतो आहे. त्यामुळे त्यांना उतारवयात गल्लोगल्ली फिरावे लागते आहे, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.

टॅग्स :NashikनाशिकChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेUddhav Thackerayउद्धव ठाकरे