शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

सत्तेसाठी भाजपकडून ईडीचा गैरवापर : छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 01:24 IST

कोणत्याही प्रकारे सत्ता मिळावी, यासाठी भाजपकडून तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. सत्ता नसल्याने भाजपची अवस्था ‘जल बिन मछली’सारखी झाली असल्याची टीकादेखील भुजबळ यांनी यावेळी केली.

नाशिक : कोणत्याही प्रकारे सत्ता मिळावी, यासाठी भाजपकडून तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. सत्ता नसल्याने भाजपची अवस्था ‘जल बिन मछली’सारखी झाली असल्याची टीकादेखील भुजबळ यांनी यावेळी केली. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांविरोधात ईडीची कारवाई होत असल्याबाबत पालकमंत्री भुजबळ यांनी नाशिकमध्ये प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपवर निशाणा साधला. ईडीची कारवाई करून मंत्र्यांविरोधात चौकशीचा फास आवळला जात असून हे सर्व काही सत्तेसाठी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. सत्ता कशी मिळेल, यासाठी कुणावरही आरोप करणे, तपास यंत्रणांची नोटीस पाठविणे असे प्रकार सुरू झाले आहेत. हे सर्व कशासाठी चालले आहे, हे लोकांना माहीत असून तेच त्यांना उत्तर देतील, असेही ते म्हणाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर येथील साखर कारखान्यावर ईडीने केलेल्या कारवाईविषयीदेखील त्यांनी शंका उपस्थित केली. पवारांच्या आधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच अन्य काही मंत्र्यांविरोधात कारवाई केली जात असून हे सर्वकाही सत्तेसाठीच सुरू असल्याचे भुजबळ यांनी म्हटले.

नाशिकमध्ये सुरू असलेल्या स्मार्ट रोडच्या कामाबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त करताना शहरात स्मार्ट सिटीची अपेक्षित कामे होऊ शकली नसल्याचेही ते म्हणाले. महापालिकेची बससेवा सुरू होत असून ही सेवा महापालिकेला परवडणार आहे का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. मुंबईची बेस्ट बससेवा वगळता इतर कुठेही प्रवासी बससेवा फायद्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिका बससेवा सुरू करीत असली तरी तिची उपयुक्तताही पाहिली जाईल, असे भुजबळ यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकChhagan Bhujbalछगन भुजबळBJPभाजपा