शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

जैविक खते व पिके ही काळाची गरज : श्रीधर देसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 13:10 IST

उत्पादनवाढीसाठी जैविक खते आणि पिके ही काळाची गरज असल्याचे मत धुळे येथील कृषि शास्त्रज्ञ डॉ.श्रीधर देसले यांनी व्यक्त केले आहे.कृषि विभाग आणि कृषि व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने नाशिक कृषी महोत्सवात कांदा व भाजीपाला या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.

ठळक मुद्देउत्पादन वाढीसाठी जैविक खते आणि पिके काळाची गरज सुपिकता वाढविण्यासाठी अभ्यासपूर्ण खतांचा वापर करावा‘कांदा व भाजीपाला’ परिसंवादात डॉ.श्रीधर देसले यांचे मत

नाशिक : उत्पादनवाढीसाठी जैविक खते आणि पिके ही काळाची गरज असल्याचे मत धुळे येथील कृषि शास्त्रज्ञ डॉ.श्रीधर देसले यांनी व्यक्त केले आहे.कृषि विभाग आणि कृषि व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने नाशिक कृषी महोत्सवात कांदा व भाजीपाला या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. यावेळी प्रकल्प संचालक अशोक कांबळे, उपविभागीय कृषि अधिकारी दिलीप देवरे, गोकुळ वाघ, गणेश वाकळे, तुषार आमले, संजय पारडे आदी उपस्थित हेते.डॉ. देसले म्हणाले, जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी मुख्य, दुय्यम आणि सुक्ष्म अन्नद्रव्याचा अभ्यास करून खतांचा वापर करावा. त्यानंतरच उत्पादक क्षेत्रचा विचार करायला हवा. जमिनीनुसार योग्य पीक निवडल्यास उत्पादनात यश मिळते. सध्या सुक्ष्म अन्नपदार्थ, गंधक, पालाश कमी झाल्यामुळे जमिनीची उत्पादकता कमी झाली आहे. म्हणून माती परिक्षणानंतर खतांचा वापर करावा तसेच हवामानाच्या बदलानुसार करावयाच्या उपययोजनांचादेखील विचार शेतकऱ्यांनी करावा, अशी सुचना त्यांनी केली. कांद्याचे पीक हंगामानुसार बदलणारे असल्याने शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे. कांदा पिकाच्या आजूबाजूस मक्याची लागवड करावी. बुरशीमुळे बियाण्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी गंधक, सुक्ष्म पदार्थ, पालाश यांची मात्र योग्य प्रमाणात द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकFarmerशेतकरी