शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

वीजबिल दुरुस्तीपोटी कोट्यवधींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 01:33 IST

महावितरणकडून वीजबिल वसुलीसाठी विविध प्रकारच्या सवलत योजना तसेच विशेष मोहीम राबवून महसूल वाढीचे प्रयत्न केले जातात. याशिवाय ग्राहकांना अचूक वीज बिल देण्यात यावे यासाठीदेखील वेळोवेळी वीजमीटर रीडिंगप्रणालीत बदलही करण्यात आले आहेत; मात्र अजूनही रीडिंगमधील दोष समोर येतच असून हे दोष सुधारण्यासाठी महावितरणला तब्बल ३७३ कोटींचा भुर्दंड सोसावा लागला आहे.

ठळक मुद्देमहावितरण : चुकीच्या रीडिंगमुळे ३७३ कोटींचा भुर्दंड

नाशिक : महावितरणकडून वीजबिल वसुलीसाठी विविध प्रकारच्या सवलत योजना तसेच विशेष मोहीम राबवून महसूल वाढीचे प्रयत्न केले जातात. याशिवाय ग्राहकांना अचूक वीज बिल देण्यात यावे यासाठीदेखील वेळोवेळी वीजमीटर रीडिंगप्रणालीत बदलही करण्यात आले आहेत; मात्र अजूनही रीडिंगमधील दोष समोर येतच असून हे दोष सुधारण्यासाठी महावितरणला तब्बल ३७३ कोटींचा भुर्दंड सोसावा लागला आहे.वीजबिलांच्या माध्यमातून महसूल मिळविणाऱ्या महवितरण कंपनीने अलीकडच्या काळात अचूक वीजबिलांसाठी अनेकवेळा दुरुस्त्या केलेल्या आहेत. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्या माध्यमातून जास्तीत जास्त महसूल कसा गोळा करता येऊ शकेल यासाठीचे त्यांचे प्रयत्न कायम सुरू आहेतच. मात्र अजूनही यात अपेक्षित बदल समोर येऊ शकलेला नसल्याचे समोर आले आहे. चुकीचे वीजबिल दुरुस्त करून देताना महावितरणला तब्बल ३७३ कोटींचा भुर्दंड सहन करावा लागलेला आहे. यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे आर्थिक नुकसान सोसावे लागल्याने अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. ग्राहकांमध्ये महावितरणची प्रतिमा कायम राखण्यासाठीचदेखील प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहिसीनुसार चुकीचे मीटर रिडिंग घेण्यात आलेल्या ग्राहकांच्या बिलांची दुरुस्ती करण्याबाबतही काही ठिकाणी गंभीर चुका झाल्याचे महावितरण प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात घरगुती, वाणिज्यक व औद्योगिक लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांकडून वीजबिलापोटी २७ हजार २४७ कोटी रुपये महसूल येणे अपेक्षित असताना केवळ ग्राहकांचे चुकीचे वीजबिल दुरुस्त करून देताना महावितरणला ३७३ कोटींचा नाहक भुर्दंड सहन करावा लागला आहे. शाखा कार्यालयापासून ते विभागीय कार्यालयांची थकबाकी कमी व्हावी यासाठी ग्राहकांच्या वीजबिलांचे पुनर्वलोकन (रिव्हीजन) करून कमी केले जाते. तसेच निष्काळजीने चुकीचे बिलिंग झाल्याने ग्राहकांचाही दोष ओढवून घेण्यात येत असल्याने त्याचा परिणामदेखील होत असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे.सध्या केंद्रीय पद्धतीने बिलिंग सुरू केले असल्याने पुनर्वलोकन करण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी ते फारसे समाधानकारक नसल्याची बाबदेखील अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनीदेखील अधोरेखीत केली आहे.वीजबिलांवर नियंत्रणवीजबिलांवर नियंत्रण राखण्याबरोबरच महसुलात वाढ करण्याच्या दृष्टीने पुढील काळात केंद्रीय पद्धतीने वीजबिलांच्या दुरुस्तीवर नियंत्रण ठेवले जाणार असून, त्याची कटाक्षाने पडताळणी करण्यात येणार आहे. त्यावर प्रत्येक उपविभागनिहाय नियंत्रण ठेवले जाणार आहे. उपविभागीय स्तरावर वीजबिलांच्या पुनर्वलोकनाचे (रिव्हिजन) प्रमाण वाढले असल्यास संबंधित उपविभागीय अधिकारी व त्यांच्या बिलिंगशी संबंधित कर्मचाºयांना जबाबदार धरले जाणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज