शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

बिबट हल्ले : राज्याच्या अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी पिंजला दारणाकाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 18:08 IST

रविवारी घडलेल्या घटनास्थळी पोलीस पाटील मळ्यात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत बिबट्यापासून सुरक्षिततेबाबत घ्यावयाची खबरदारीविषयी लोकांना माहिती दिली.

ठळक मुद्देबिबट हल्ल्यात झालेली मनुष्यहानी दुर्दैवीबिबट रेस्क्यूबाबत पथकाला मार्गदर्शन

नाशिक : तालुक्याचा पुर्व भाग असलेला दारणाकाठ बिबट्याच्या दहशतीने भयभीत झाला आहे. या भागातील बिबट्यांचा संचार रोखण्यासाठी वनविभागाचे बोरिवलीचे पथक पुन्हा माघारी बोलविण्यात आले आहे. तसेच सोमवारी (दि.२९) राज्याचे पश्चिम वनविभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी दारणाकाठाला भेट देत बोरिवली,  नाशिकच्या वन्यजीव बचाव पथकाला विविध उपाययोजनांबाबत सुचना दिल्या.रविवारी (दि.२८) सामनगावमध्ये एका चार वर्षीय मुलावर बिबट्याने झडप घालून जखमी केल्याची घटना घडली. दारणाकाठालगतच्या आठ ते दहा गावांमध्ये मागील तीन महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. या भागात एप्रिलपासून अद्याप तीन मुले, एक वृध्द असे चार बळी गेले आहेत तर दोघा चिमुकल्यांचे दैव बलवत्तर म्हणून ते बचावले. ऊसशेतीचा विस्तर्ण परिसर असल्यामुळे या भागात बिबट्यांचा सुळसुळाट होऊ लागला आहे. या भागातील बिबटे जेरबंद करण्यासाठी सातत्याने नाशिक पश्चिम वनविभाग प्रयत्न करत असून अद्याप यश आलेले नाही. आठवडाभरापुर्वी बोरिवली येथील संजय गांधी राष्टÑीय उद्यानाच्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर हे पथक तीन दिवस दारणाभागात तळ ठोकून राहिले; मात्र तेव्हा बिबट्याने कोठेही दर्शन दिले नाही किंवा पिंज-यातसुध्दा आला नाही. बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करून बिबट्याला जेरबंद करण्याचे आदेश दस्तुरखुद्द वनमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत. त्यानंतर राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक अनिल काकोडकर यांनीही स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना या भागातील बिबट्याला थेट बेशुध्द करण्याचेही आदेश देण्यात आले आहे.लिमये यांनी मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर, उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांच्यासह दुुपारी चार वाजता सामनगावातून दारणाकाठाचा परिसर पिंजण्यास सुरूवात केली. येथील शेतक-यांशीसुध्दा त्यांनी यावेळी संवाद साधला. रविवारी घडलेल्या घटनास्थळी पोलीस पाटील मळ्यात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत बिबट्यापासून सुरक्षिततेबाबत घ्यावयाची खबरदारीविषयी लोकांना माहिती दिली. तसेच वनविभागाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांबाबतही सांगितले.ऊसशेतीचे बिबट ‘रेस्क्यू’पुढील मोठे आव्हानदारणानदीकाठालगतचे सामनगाव, बाभळेश्वर, मोहगाव, चाडेगाव या भागात लिमये यांनी पथकासह पाहणी दौरा केला. येथे असलेली ऊसशेती हे बिबट जेरबंद करण्यापुढील मोठे आव्हान ठरत आहे. तसेच बिबट्यांच्या वाढत्या संख्येलासुध्दा हेच कारण असल्याचे त्यांनी सांगितले.बारा दिवसांत दुसरा हल्लाबारा दिवसांपुर्वी ११ जून रोजी संध्याकाळी गुंजन नेहरे या तीन वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला करून ठार मारले होते. ही घटना सामनगावापासून जवळच असलेल्या बाभळेश्वर गावात घडली होती. या घटनेला बारा दिवस पुर्ण होत नाही, तोच पुन्हा बिबट्याने चार वर्षाच्या ओमवर हल्ला चढविला. यामुळे पसिरात बिबट्याची कमालीची दहशत पसरली आहे.

 

टॅग्स :forest departmentवनविभागNashikनाशिकleopardबिबट्याwildlifeवन्यजीव