शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

‘भारत बंद’चा नाशिकच्या बाजारपेठेला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 1:25 AM

देशभरात सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल- डिझेलच्या किमतीच्या निषेधार्थ काँग्रेससह देशभरातील सुमारे २० राजकीय पक्ष व संघटनांनी सोमवारी (दि.१०) केलेल्या ‘भारत बंद’चा फटका नाशिकच्या बाजारपेठेलाही मोठ्या प्रमाणात बसला.

नाशिक : देशभरात सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल- डिझेलच्या किमतीच्या निषेधार्थ काँग्रेससह देशभरातील सुमारे २० राजकीय पक्ष व संघटनांनी सोमवारी (दि.१०) केलेल्या ‘भारत बंद’चा फटका नाशिकच्या बाजारपेठेलाही मोठ्या प्रमाणात बसला. नाशिक शहरासह उपनगरांमध्येही दुपारपर्यंत कडकडीट बंद पाळण्यात आल्याने जवळपास ५० टक्के उलाढाल ढप्प झाली.  नाशिकमधील मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड, सराफ बाजार, रविवार कारंजा, शालिमार परिसरात बाजारपेठेला काँग्रेसच्या बंदचा फटका बसला. त्याचप्रमाणे उपनगरांमध्येही अनेक दुकाने बंद राहिल्याने शहरातील जवळपास अडीचशे ते तीनशे कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचा अंदाज आर्थिक विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला असताना नागरिकांनी मखर सजावटीसह पूजेच्या साहित्याची खरेदी सुरू केलेली आहे. परंतु, सकाळपासूनच दळवणळाची साधने उपलब्ध नसल्याने बाजारपेठेत ग्राहकांचा ओघही ओसरल्याचे दिसून आले. त्यामुळे काही दुकानदारांनी सकाळपासून दुकाने उघडी ठेवूनही त्यांना ग्राहकच नसल्याने बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसून आला. परंतु दुपारनंतर व्यवहार सुरू झाल्याने नाशिककरांनी सायंकाळी गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढल्याने बाजारपेठेत व्यवहार सुरळीत झाले. मात्र अनेक ग्राहकांनी बंदमध्ये बाहेर पडण्याऐवजी आजची खरेदी उद्यावर ढकलल्याने अनेक व्यावसायिकांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागली.सराफ बाजाराला ३० टक्के फटकाभारत बंदचा सराफ बाजाराला जवळपास २५ ते ३० टक्के फटका बसल्याचे दिसून आले. सराफ बाजारातील अनेक व्यावसायिकांनी दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवली. त्यानंतरही ग्राहकांचा ओघ नेहमीसारखा नसल्याने सराफ बाजारातही नेहमीच्या तुलनेत शांतता दिसून आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक जण गणपतीसाठी सोने-चांदीचे मोदक, दुर्वाहार यांससह पूजेचे साहित्य खरेदी करीत असतात. परंतु, भारत बंदमुळे ग्राहकच नसल्याने नेहमीच्या तुलनेत ३० टक्के उलाढाल ठप्प झाल्याचे दिसून आले.किरकोळ  बाजारही प्रभावित‘भारत बंद’चा सर्वाधिक प्रभाव किरकोळ बाजारावर दिसून आला. बंददरम्यान मालवाहतूक आणि व्यावसायिक गोदामे खुली होती. त्यामुळे घाऊक व्यापारावर बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही. परंतु, किरकोळ विक्रेत्यांना बंदमुळे दुपारपर्यंत दुकाने बंद करावी लागली, दुपारनंतर दुकाने उघडूनही नेहमीच्या  तुलनेत ग्राहकांचा ओघ  नसल्याने किरकोळ बाजारावर बंदमुळे सर्वाधिक झाल्याचे दिसून आले.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदMNSमनसे