शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

यंदा होणार भाम धरणाची घळभरणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 15:05 IST

सुमारे साडेतीनशे कोटी रूपये खर्चुन बांधण्यात येणा-या भाम धरणासाठी भरवद, तिरफण, काळुस्ते, बोरवाडी, दरेवाडी आदी गावातील जमीन त्यासाठी संपादीत करण्यात आली होती. साधारणत: बारा वर्षापुर्वी म्हणजेच २००६ मध्ये पाटबंधारे विभागाने धरणाचे काम हाती घेतले परंतु आदिवासींनी जागा

ठळक मुद्दे४३० कुटूंबाचे स्थलांतर : महिनाअखेर ताबा जलसंपदेकडे बारा वर्षापुर्वी म्हणजेच २००६ मध्ये पाटबंधारे विभागाने धरणाचे काम हाती घेतले

नाशिक : नाशिकपेक्षाही मराठवाडा, नगरला वरदान ठरू पाहणा-या इगतपुरी तालुक्यातील भाम धरणात यंदाच्या पावसाळ्यात घळ भरणीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे दिसू लागली असून, पुनर्वसनाच्या नावाखाली धरणातून उठण्यास नकार देणाºया ४३० कुटुंबाचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यश आले असून, महिनाभरात जागेचा ताबा जलसंपदा विभागाकडे सोपविण्यात येणार आहे.सुमारे साडेतीनशे कोटी रूपये खर्चुन बांधण्यात येणा-या भाम धरणासाठी भरवद, तिरफण, काळुस्ते, बोरवाडी, दरेवाडी आदी गावातील जमीन त्यासाठी संपादीत करण्यात आली होती. साधारणत: बारा वर्षापुर्वी म्हणजेच २००६ मध्ये पाटबंधारे विभागाने धरणाचे काम हाती घेतले परंतु आदिवासींनी जागा देण्यास केलेल्या विरोधामुळे सात ते आठ वर्षे काहीच हालचाल होऊ शकली नाही. अखेर जागा मालकांचे मन वळविण्यात यश आल्याने प्रत्येकी सुमारे आठ लाख रूपये प्रमाणे जमिनीचा मोबदला तसेच जमीनीवर असलेले पीके, घर, गोठयांचेही मुल्यांकन करून पैसे देण्यात आले व सुमारे पाचशे हेक्टर जागा धरणासाठी संपादीत करण्यात आली. परंतु पुनवर्सनाच्या प्रश्नी काम धिम्या गतीने सुरू असल्याने जागा मालकांनी पुर्ण पुनवर्सन झाल्याशिवाय स्थलांतर होण्यास नकार दिला. पुनवर्सनासाठी धरणाच्या बाजुलाच भरवद, काळुस्ते शिवारात जमीन संपादीत करून प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला प्लॉटचे वाटप करण्यात आले.गेल्या काही महिन्यांपासून पुर्नवसनाच्या ठिकाणी रस्ते, पाणी, शाळा, आरोग्य केंद्रांची व्यवस्था करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असतानाही प्रकल्पग्रस्तांनी स्थलांतर करण्यास नकार दिला. दरम्यान, धरणाचे काम लांबणीवर पडत असल्याने प्रकल्पावर होणा-या खर्चातही दरवर्षी वाढ होत असल्याचे पाहून जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी भाम धरणग्रस्तांना घरांची बांधणी करण्यासाठी प्रत्येकी पावणे दोन लाख रूपये विशेष प्रोत्साहन अनुदान दिल्यामुळे एकूण ४६७ प्रकल्पग्रस्तांपैकी डिसेंबर अखेर ४३० प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर झाले असून, ३० प्रकल्पग्रस्त चालू महिना अखेरीस स्थलांतरीत होतील असा अंदाज आहे.

टॅग्स :DamधरणNashikनाशिक