शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

भाजीमंडईत भिकाऱ्यांचा आश्रय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:41 AM

महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून गंगाघाटावरील भाजीपाला विक्रेत्यांसाठी गणेशवाडी आयुर्वेद महाविद्यालयासमोर बांधलेल्या भाजीमंडईत पुन्हा एकदा भिकाºयांनी वास्तव्य केले आहे.

पंचवटी: महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून गंगाघाटावरील भाजीपाला विक्रेत्यांसाठी गणेशवाडी आयुर्वेद महाविद्यालयासमोर बांधलेल्या भाजीमंडईत पुन्हा एकदा भिकाºयांनी वास्तव्य केले आहे. एकीकडे महापालिका सदर गाळ्यांचे लिलाव करणार असल्याचे जाहीर करीत असताना दुसरीकडे याच जागेचा भिका-यांनी ताबा घेतल्याने भाजीमंडईची जागा नेमकी कोणासाठी? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. काही दिवसांपूर्वीच महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी गंगाघाट परिसराला भेट देताना गणेशवाडी आयुर्वेद महाविद्यालयासमोर असलेल्या भाजीमंडईचीदेखील पाहणी केली होती. या पाहणी दरम्यान भाजीमंडईत भाजीविक्रेत्यांऐवजी चक्क भिकारी तसेच बेघर नागरिकांनी  आपले  बस्तान मांडल्याचे चित्र पालिका आयुक्तांना दिसल्याने त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाºयांना सूचना देऊन भाजीमंडई स्वच्छ करून तेथील बेघर नागरिकांना हटविण्याची मोहीम राबविली होती. त्यानंतर पालिकेने भाजीमंडईच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षारक्षक तैनात केले होते.  मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरक्षारक्षक गायब झाल्याने गंगाघाट परिसरात फिरणाºया बेघर, भिकाºयांनी पुन्हा भाजीमंडईचा ताबा घेतल्याने परिसराला अवकळा आली आहे. पालिका प्रशासनानेही त्याकडे दुर्लक्ष केल्याने भाजीमंडईला झोपडपट्टीचे स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  पालिकेने भाजीविक्रेत्यांसाठी उभारलेल्या भाजीमंडईत कोणत्याही प्रकारे अतिक्रमण होणार नाही याची दक्षता मनपा अधिकाºयांनी घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.पूरामुळे बेघरांनी आश्रय घेतलापावसाने गोदावरी नदीला पूर आल्याने नदीकाठ परिसरात झोपड्या व राहुट्या उभारून राहणाºया नागरिकांच्या झोपड्या पाण्याखाली गेल्याने अनेकांनी जीव वाचवण्यासाठी महापालिकेच्या गणेशवाडी भाजीमंडईचा ताबा घेऊन तेथेच संसार थाटला.  पावसाची संततधार सुरू असल्याने अनेक बेघरांना दिवसा व रात्री पावसापासून बचाव करण्यासाठी लपंडावाचा खेळ खेळावा लागत आहे. गंगाघाट परिसरात वास्तव्य करणाºया अनेक बेघरांनी भाजीमंडईचा ताबा घेत तेथेच चूल मांडल्याने सध्या भाजीमंडई बेघरांचे आश्रयस्थान बनली आहे.गोदावरी नदीला पूर येणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आल्यानंतर नदीकाठच्या परिसरात झोपड्या व पाल उभारून राहणाºया बेघर नागरिकांनी आपल्या कपड्यांची गाठोडी करून लहान मुलांना खांद्यावर घेत महापालिकेच्या भाजीमंडईचा रस्ता धरला.  मनपाने भाजीमंडईत भाजीविक्रेत्यांसाठी तयार केलेल्या ओट्यांवर सध्या बेघरांनी सहारा घेतला असून, भाजीमंडईलाच त्यांनी आपले निवासस्थान समजून तेथे चूल पेटवून दाटीवाटीने संसार थाटलेले आहेत. भाजीमंडई सध्या भाजीविक्रेत्यांविना ओस पडून असल्याने गंगाघाट परिसरातील बेघर नागरिकांनी पावसाच्या निमित्ताने का होईना पुन्हा एकदा भाजीमंडईचा ताबा घेतल्याचे चित्र होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका