शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

नीतिमान वकिलांवर विश्वास ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 12:57 AM

सध्या भारत एका वेगळ्याच स्थितीतून वाटचाल करत आहे. या स्थितीचा परिणाम देशातील सर्वच क्षेत्रात व समाजातील विविध घटकांवर झालेला दिसून येतो. वकिली व्यवसायदेखील याला अपवाद राहिलेला नाही. त्यामुळे ७० टक्के वकिलांनी जरी नीतिमत्ता, व्यावसायिक मूल्ये सोडली असली तरी ३० टक्के वकील निश्चितपणे या मूल्यांची जोपासना करत आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक आहेत, त्यामुळे लोकांनी त्यांच्यावरील विश्वास नक्कीच वृद्धिंगत करायला हवा, असे मत ज्येष्ठ वकील दौलतराव घुमरे यांनी मुलाखतीतून व्यक्त केले.

ठळक मुद्देदौलतराव घुमरे ‘संवाद’च्या प्रकट मुलाखतीत व्यक्त केले मत

नाशिक : सध्या भारत एका वेगळ्याच स्थितीतून वाटचाल करत आहे. या स्थितीचा परिणाम देशातील सर्वच क्षेत्रात व समाजातील विविध घटकांवर झालेला दिसून येतो. वकिली व्यवसायदेखील याला अपवाद राहिलेला नाही. त्यामुळे ७० टक्के वकिलांनी जरी नीतिमत्ता, व्यावसायिक मूल्ये सोडली असली तरी ३० टक्के वकील निश्चितपणे या मूल्यांची जोपासना करत आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक आहेत, त्यामुळे लोकांनी त्यांच्यावरील विश्वास नक्कीच वृद्धिंगत करायला हवा, असे मत ज्येष्ठ वकील दौलतराव घुमरे यांनी मुलाखतीतून व्यक्त केले.संवाद संस्थेच्या वतीने घुमरे यांच्या मुलाखतीचे कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर संवादचे अध्यक्ष अभिमन्यू सूर्यवंशी, उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब गुंजाळ, अ‍ॅड. नितीन ठाकरे, अ‍ॅड. क. का. घुगे हे उपस्थित होते. यावेळी घुमरे यांनी अ‍ॅड. मिलिंद चिंधडे, डॉ. शंकर बोºहाडे यांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरे देत बालपणाच्या आठवणी, शिक्षणाच्या वाटचालीपासून देशात झालेले राजकीय-सामाजिक बदल, विविध राष्टÑीय नेत्यांचे विचार अशा चौफेर पद्धतीने आपले विचार मांडले.यावेळी घुमरे म्हणाले, व्यापारीवृत्तीमुळे देशातील सर्वच क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात नीतिमत्तेची मूल्ये पायदळी तुडविली जात आहेत. व्यापारी दृष्टिकोनचा पगडा सर्वच क्षेत्रात वाढत असताना वकिली क्षेत्रही त्यापासून सुरक्षित राहू शकले नाही; मात्र या देशातील लोक वेडे नाहीत की ते दररोज न्यायालयाचा उंबरा ओलांडतात. त्यांना खात्री असते वकील आपल्याला न्याय मिळवून देईल. गरिबीमुळे बालपणात अन्यायाविरुद्ध चीड येत होती. गांधीजी देशाची उभारणी करत असताना त्यांच्याविषयी काढल्या जाणाऱ्या वाईट उद्गारामुळे चीड निर्माण होत होती. त्यावेळी तरुणांना सोबत घेत मोर्चा काढला असता उदोजी वसतिगृहातून बाहेरचा रस्ता दाखविला गेला.सावरकर कोणालाही समजले नाहीसावरकर यांची विचारधारा, देशप्रेम, राष्टÑभक्ती भाजप, राष्टÑीय स्वयंसेवक संघासह कोणालाही समजलेली नाही, अशी खंतही घुमरे यांनी यावेळी बोलून दाखविली. सावरकरांच्या सभेला दोन तास उपस्थित राहिल्यानंतर त्यांच्या विचारांनी माझ्यावर पडलेल्या प्रभावातून मी आजही बाहेर येऊ शकलेलो नाही.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक