शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

किसान सभेच्या वतीने २१ डिसेंबरला चलो दिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 01:22 IST

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मोर्चाला पाठिंबा दर्शविण्यासाठी २१ डिसेंबरला नाशिकमधून भव्य वाहन मोर्चा दिल्लीकडे कूच करणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी हजारोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी होणार असून पुढील गावांमधील शेतकरी तसेच अन्य राज्यांतील शेतकरीदेखील त्यात सहभागी होणार असल्याचे सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. .

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मोर्चाला पाठिंबा दर्शविण्यासाठी २१ डिसेंबरला नाशिकमधून भव्य वाहन मोर्चा दिल्लीकडे कूच करणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी हजारोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी होणार असून पुढील गावांमधील शेतकरी तसेच अन्य राज्यांतील शेतकरीदेखील त्यात सहभागी होणार असल्याचे सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. . शेकडो वाहनांमधून हजारो शेतकरी २४ डिसेंबर रोजी दिल्ली येथील बॉर्डरवर पोहोचतील. नाशिकमधून हा वाहनज‌थ्था सर्व शेतकऱ्यांना घेऊन चांदवड, देवळा, मालेगावमार्गे शिरपूरला पोहोचणार असून तिथून मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. या मार्गातील अन्य राज्यांतील शेतकरीदेखील या मोर्चात सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा आपले रेशन, पाणी, स्वयंपाक व निवासाची व्यवस्था सोबत घेऊन बेमुदत मुक्कामाच्या तयारीने दिल्लीला जातील, असेही डॉ. ढवळे यांनी सांगितले. माजी राज्य अध्यक्ष व माजी आमदार जे. पी. गावित यांनी वाहन जत्थासह हजारोंच्या संख्येने दिल्ली गाठणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार असून आदिवासींच्या लँग मार्चप्रमाणेच हा मोर्चा यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या या लढाऊ कृतीनंतर इतर राज्यातील शेतकरीही वाहन जथ्थे काढत दिल्लीच्या दिशेने कूच करतील असेही गावित यांनी नमूद केले. महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांमधील शेतकरी नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथे २१ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता जमतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दुपारी १ वाजता दिल्लीच्या दिशेने निघतील. मोदी सरकार कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्यासाठी कृषी कायदे आणत असल्याने ही लढाई केंद्र सरकार व त्यांचे कॉर्पोरेट भागीदार यांच्या विरोधात असल्याने वाहन ज‌थ्था दिल्लीला प्रस्थान करेल, असेही त्यांनी नमूद केले. २२ डिसेंबरला दुपारी वाहन ज‌थ्था धुळे येथे पोहोचल्यावर राज्यभरातील सर्व समविचारी शेतकरी, कामगार व श्रमिक संघटनांच्या वतीने धुळे येथे पाठिंबा सभा घेण्यात येईल. तसेच ओझर, पिंपळगाव बसवंत, चांदवड, उमराणे, मालेगाव आणि शिरपूर येथेही जनतेच्या वतीने ज‌थ्थ्याचे जंगी स्वागत केले जाईल, असे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी सांगितले. या किसानांना साथ देण्यासाठी तसेच कामगारविरोधी कायद्यांचा निषेध करण्यासाठी सीटूचे कामगारदेखील मोर्चात सहभागी होणार असल्याचे सीटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी.एल. कराड यांनी सांगितले. यावेळी राज्य अध्यक्ष किसन गुजर, राज्य सहसचिव सुनील मालुसरे, इरफान शेख आदी उपस्थित होते. इन्फो दीडपट आधारभावाचे संरक्षण हवे केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत, शेतकरी विरोधी प्रस्तावित वीज बिल विधेयक मागे घ्यावे व शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट आधार भावाचे संरक्षण मिळावे यासाठी केंद्रीय कायदा करावा अशी मागणी किसान सभा करत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी