शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

किसान सभेच्या वतीने २१ डिसेंबरला चलो दिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 01:22 IST

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मोर्चाला पाठिंबा दर्शविण्यासाठी २१ डिसेंबरला नाशिकमधून भव्य वाहन मोर्चा दिल्लीकडे कूच करणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी हजारोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी होणार असून पुढील गावांमधील शेतकरी तसेच अन्य राज्यांतील शेतकरीदेखील त्यात सहभागी होणार असल्याचे सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. .

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मोर्चाला पाठिंबा दर्शविण्यासाठी २१ डिसेंबरला नाशिकमधून भव्य वाहन मोर्चा दिल्लीकडे कूच करणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी हजारोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी होणार असून पुढील गावांमधील शेतकरी तसेच अन्य राज्यांतील शेतकरीदेखील त्यात सहभागी होणार असल्याचे सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. . शेकडो वाहनांमधून हजारो शेतकरी २४ डिसेंबर रोजी दिल्ली येथील बॉर्डरवर पोहोचतील. नाशिकमधून हा वाहनज‌थ्था सर्व शेतकऱ्यांना घेऊन चांदवड, देवळा, मालेगावमार्गे शिरपूरला पोहोचणार असून तिथून मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. या मार्गातील अन्य राज्यांतील शेतकरीदेखील या मोर्चात सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा आपले रेशन, पाणी, स्वयंपाक व निवासाची व्यवस्था सोबत घेऊन बेमुदत मुक्कामाच्या तयारीने दिल्लीला जातील, असेही डॉ. ढवळे यांनी सांगितले. माजी राज्य अध्यक्ष व माजी आमदार जे. पी. गावित यांनी वाहन जत्थासह हजारोंच्या संख्येने दिल्ली गाठणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार असून आदिवासींच्या लँग मार्चप्रमाणेच हा मोर्चा यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या या लढाऊ कृतीनंतर इतर राज्यातील शेतकरीही वाहन जथ्थे काढत दिल्लीच्या दिशेने कूच करतील असेही गावित यांनी नमूद केले. महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांमधील शेतकरी नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथे २१ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता जमतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दुपारी १ वाजता दिल्लीच्या दिशेने निघतील. मोदी सरकार कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्यासाठी कृषी कायदे आणत असल्याने ही लढाई केंद्र सरकार व त्यांचे कॉर्पोरेट भागीदार यांच्या विरोधात असल्याने वाहन ज‌थ्था दिल्लीला प्रस्थान करेल, असेही त्यांनी नमूद केले. २२ डिसेंबरला दुपारी वाहन ज‌थ्था धुळे येथे पोहोचल्यावर राज्यभरातील सर्व समविचारी शेतकरी, कामगार व श्रमिक संघटनांच्या वतीने धुळे येथे पाठिंबा सभा घेण्यात येईल. तसेच ओझर, पिंपळगाव बसवंत, चांदवड, उमराणे, मालेगाव आणि शिरपूर येथेही जनतेच्या वतीने ज‌थ्थ्याचे जंगी स्वागत केले जाईल, असे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी सांगितले. या किसानांना साथ देण्यासाठी तसेच कामगारविरोधी कायद्यांचा निषेध करण्यासाठी सीटूचे कामगारदेखील मोर्चात सहभागी होणार असल्याचे सीटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी.एल. कराड यांनी सांगितले. यावेळी राज्य अध्यक्ष किसन गुजर, राज्य सहसचिव सुनील मालुसरे, इरफान शेख आदी उपस्थित होते. इन्फो दीडपट आधारभावाचे संरक्षण हवे केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत, शेतकरी विरोधी प्रस्तावित वीज बिल विधेयक मागे घ्यावे व शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट आधार भावाचे संरक्षण मिळावे यासाठी केंद्रीय कायदा करावा अशी मागणी किसान सभा करत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी