शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

हंगामाच्या सुरवातीलाच द्राक्ष भाव गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 16:38 IST

सायखेडा : नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक म्हणून घेतल्या जाणारे द्राक्ष पिकाचे हंगामाच्या सुरवातीलाच भाव गडगडल्याने वर्षातील एकदाच घेतल्या जाणाऱ्या पिकाचा खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालिदल झाले आहे.

ठळक मुद्देसायखेडा : निर्यातक्षम द्राक्ष अवघे ५५ रुपये ; शेतकरी हवालदिल

सायखेडा : नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक म्हणून घेतल्या जाणारे द्राक्ष पिकाचे हंगामाच्या सुरवातीलाच भाव गडगडल्याने वर्षातील एकदाच घेतल्या जाणाऱ्या पिकाचा खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालिदल झाले आहे.निर्यातक्षम द्राक्ष अवघे 55ते 60 रु तर लोकल 30ते 35 रु किलो दराने विक्र ी होत असल्याने कांद्यासारखाच द्राक्षाने वांदा केला आहे.काळी कसदार जमीन, मुबलक पाणी, अनुकूल वातावरण, भांडवलदार शेतकरी, व्यापारीकरणाच्या दृष्टीने अनुकूल असलेल्या सुखसोयी, रस्त्यांचे जाळे, जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे जंक्शन, विमानसेवा यामुळे नाशिकची द्राक्षे देशासह आंतरराष्ट्रीय बाजारात विक्र ीसाठी प्रसिद्ध आहेत. युरोपीय देशातही सर्वाधिक मागणी होत असते शिवाय पाकिस्तान ,बांगलादेश, नेपाळ, भूतान, चीन या देशात निर्यात होतात उत्तर भारतात अनेक राज्यात नाशिकच्या द्राक्षांना मागणी असते नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी अर्थकारण कांदा आणि द्राक्ष पिकावर अवलंबुन आहे.जिल्ह्यातील निफाड, नाशिक, दिंडोरी, चांदवड, सटाणा, काही प्रमाणात सिन्नर तालुक्यात द्राक्ष पीक घेतले जाते, द्राक्ष लागवडीचा खर्च हा किमान एकरी चार ते पाच लाख रु पये असल्याने प्रथम मोठे भांडवल खर्च करून पीक उभे करावे लागते.नैसर्गिक आपत्ती आणि रासायनिक खतांच्या वाढलेल्या भरमसाठ किंमती, बाजारात विक्र ीसाठी उपलब्ध असलेले अनेक फसवे औषधे, मजुरांचा वाढता भाव यामुळे बाग पिकवणे आणि टिकवणे जिकीरीचे झाले आहे. अशा परिस्थितीत निर्यातक्षम द्राक्षाला किमान ८० ते ९० व लोकल द्राक्षाला ४५ ते ५० रुपये भाव मिळाला तर शेतकºयांच्या पदरात काहीतरी पडते. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक शेतकºयांनी पाणी विकत घेऊन द्राक्ष बागा टिकवून ठेवल्या आहेत, त्यामुळे खर्च वाढला आहे.हंगामाच्या सुरवातीलाच ३० ते ३५ रु लोकल आणि ५५ ते ६० रुपये निर्यातक्षम द्राक्ष विक्र ी होत असल्याने खर्च वसूल होत नाही. शिवाय वर्षातून एकदा घेतले जाणारे पीक असल्याने पुढील वर्षी फळ येण्यासाठी वर्षभर खर्च करावा लागतो अशा अनेक समस्या असल्याने यंदाचा द्राक्ष हंगाम शेतकºयांना कांद्यासारखाच रडविणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.चौकट....शेतकºयांचे वर्षाचे आर्थिक गणित द्राक्ष पिकावर अवलंबुन असते, आज हंगाम सुरू होऊन महिना झाला नाही तरी लगेच भाव गडगडले आहे. खरा हंगाम मार्च महिन्यात असतो, तेव्हा काय परिस्थिती निर्माण होईल हे सांगता येत नाही. असेच दर राहिल्यास शेतकरी आर्थिक दृष्टीने पुरता भुईसपाट होईल, त्यासाठी भाव वाढीसाठी निर्यातक्षम द्राक्षांना सरकारने विशेष कर सवलत दिली पाहिजे.शहाजी राजोळे, द्राक्ष उत्पादक शेतकरी.चौकट....नैसर्गिक आपत्ती आणि रासायनिक खतांच्या भरमसाठ वाढलेल्या किंमती, बाजारात विक्र ीसाठी उपलब्ध असलेले अनेक फसवी औषधे, मजुरांचा वाढता भाव यामुळे बाग पिकवणे आणि टिकवणे जिकिरीचे झाले आहे. अशा परिस्थितीत निर्यातक्षम द्राक्षाला किमान चांगला भाव मिळाला तर शषतकºयांच्या पदरी चार पैसे शिल्लक रहातील.भाऊसाहेब कमानकर, द्राक्ष उत्पादक शेतकरी.चौकट....आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी मोठ्या प्रमाणावर द्राक्षाचे उत्पादन घेऊ लागला आहे. निर्यातक्षम द्राक्षे अधिक प्रमाणात झाली तर स्थानिक द्राक्षांना भाव मिळतो, मात्र सरकारचे निर्बन्ध व विविध प्रकारची कर आकारणी यामुळे अनेक व्यापाºयांनी काढता पाय घेतला आहे. त्यामुळे बाजार भावात घसरण झाली आहे. याकरीता शेतकºयांना सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे.योगेश रायते, संचालक, द्राक्ष बागायतदार संघ.