शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
2
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
3
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
4
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
5
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
6
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
7
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
8
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
9
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
10
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
11
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
12
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
13
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
14
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
15
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
16
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
17
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
18
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
19
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
20
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

हंगामाच्या सुरवातीलाच द्राक्ष भाव गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 16:38 IST

सायखेडा : नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक म्हणून घेतल्या जाणारे द्राक्ष पिकाचे हंगामाच्या सुरवातीलाच भाव गडगडल्याने वर्षातील एकदाच घेतल्या जाणाऱ्या पिकाचा खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालिदल झाले आहे.

ठळक मुद्देसायखेडा : निर्यातक्षम द्राक्ष अवघे ५५ रुपये ; शेतकरी हवालदिल

सायखेडा : नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक म्हणून घेतल्या जाणारे द्राक्ष पिकाचे हंगामाच्या सुरवातीलाच भाव गडगडल्याने वर्षातील एकदाच घेतल्या जाणाऱ्या पिकाचा खर्च वसूल होत नसल्याने शेतकरी हवालिदल झाले आहे.निर्यातक्षम द्राक्ष अवघे 55ते 60 रु तर लोकल 30ते 35 रु किलो दराने विक्र ी होत असल्याने कांद्यासारखाच द्राक्षाने वांदा केला आहे.काळी कसदार जमीन, मुबलक पाणी, अनुकूल वातावरण, भांडवलदार शेतकरी, व्यापारीकरणाच्या दृष्टीने अनुकूल असलेल्या सुखसोयी, रस्त्यांचे जाळे, जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे जंक्शन, विमानसेवा यामुळे नाशिकची द्राक्षे देशासह आंतरराष्ट्रीय बाजारात विक्र ीसाठी प्रसिद्ध आहेत. युरोपीय देशातही सर्वाधिक मागणी होत असते शिवाय पाकिस्तान ,बांगलादेश, नेपाळ, भूतान, चीन या देशात निर्यात होतात उत्तर भारतात अनेक राज्यात नाशिकच्या द्राक्षांना मागणी असते नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी अर्थकारण कांदा आणि द्राक्ष पिकावर अवलंबुन आहे.जिल्ह्यातील निफाड, नाशिक, दिंडोरी, चांदवड, सटाणा, काही प्रमाणात सिन्नर तालुक्यात द्राक्ष पीक घेतले जाते, द्राक्ष लागवडीचा खर्च हा किमान एकरी चार ते पाच लाख रु पये असल्याने प्रथम मोठे भांडवल खर्च करून पीक उभे करावे लागते.नैसर्गिक आपत्ती आणि रासायनिक खतांच्या वाढलेल्या भरमसाठ किंमती, बाजारात विक्र ीसाठी उपलब्ध असलेले अनेक फसवे औषधे, मजुरांचा वाढता भाव यामुळे बाग पिकवणे आणि टिकवणे जिकीरीचे झाले आहे. अशा परिस्थितीत निर्यातक्षम द्राक्षाला किमान ८० ते ९० व लोकल द्राक्षाला ४५ ते ५० रुपये भाव मिळाला तर शेतकºयांच्या पदरात काहीतरी पडते. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक शेतकºयांनी पाणी विकत घेऊन द्राक्ष बागा टिकवून ठेवल्या आहेत, त्यामुळे खर्च वाढला आहे.हंगामाच्या सुरवातीलाच ३० ते ३५ रु लोकल आणि ५५ ते ६० रुपये निर्यातक्षम द्राक्ष विक्र ी होत असल्याने खर्च वसूल होत नाही. शिवाय वर्षातून एकदा घेतले जाणारे पीक असल्याने पुढील वर्षी फळ येण्यासाठी वर्षभर खर्च करावा लागतो अशा अनेक समस्या असल्याने यंदाचा द्राक्ष हंगाम शेतकºयांना कांद्यासारखाच रडविणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.चौकट....शेतकºयांचे वर्षाचे आर्थिक गणित द्राक्ष पिकावर अवलंबुन असते, आज हंगाम सुरू होऊन महिना झाला नाही तरी लगेच भाव गडगडले आहे. खरा हंगाम मार्च महिन्यात असतो, तेव्हा काय परिस्थिती निर्माण होईल हे सांगता येत नाही. असेच दर राहिल्यास शेतकरी आर्थिक दृष्टीने पुरता भुईसपाट होईल, त्यासाठी भाव वाढीसाठी निर्यातक्षम द्राक्षांना सरकारने विशेष कर सवलत दिली पाहिजे.शहाजी राजोळे, द्राक्ष उत्पादक शेतकरी.चौकट....नैसर्गिक आपत्ती आणि रासायनिक खतांच्या भरमसाठ वाढलेल्या किंमती, बाजारात विक्र ीसाठी उपलब्ध असलेले अनेक फसवी औषधे, मजुरांचा वाढता भाव यामुळे बाग पिकवणे आणि टिकवणे जिकिरीचे झाले आहे. अशा परिस्थितीत निर्यातक्षम द्राक्षाला किमान चांगला भाव मिळाला तर शषतकºयांच्या पदरी चार पैसे शिल्लक रहातील.भाऊसाहेब कमानकर, द्राक्ष उत्पादक शेतकरी.चौकट....आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी मोठ्या प्रमाणावर द्राक्षाचे उत्पादन घेऊ लागला आहे. निर्यातक्षम द्राक्षे अधिक प्रमाणात झाली तर स्थानिक द्राक्षांना भाव मिळतो, मात्र सरकारचे निर्बन्ध व विविध प्रकारची कर आकारणी यामुळे अनेक व्यापाºयांनी काढता पाय घेतला आहे. त्यामुळे बाजार भावात घसरण झाली आहे. याकरीता शेतकºयांना सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे.योगेश रायते, संचालक, द्राक्ष बागायतदार संघ.