शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

ढगाळ वातावरणामुळे बळीराजा धास्तावला

By admin | Updated: January 22, 2016 22:38 IST

ढगाळ वातावरणामुळे बळीराजा धास्तावला

जोरण : वातावरणातील सततच्या बदलांमुळे रब्बी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात मोठी घट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन ते तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे परिसरातील शेतकरी धास्तावला आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून पर्जन्यवृष्टी कमी होत असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यंदाच्या पावसाळ्यात शेवटच्या चरणात समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तब्बल पाच वर्षांनंतर झालेल्या पावसाच्या भरवशावर परिसरात खरिपाच्या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली; मात्र सर्वत्र पिके जोमात असताना सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे खरिपातील सर्वच पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात मोठी घट आली, तर अनेक पिके शेतातच सडल्याने उत्पादनावर केलेल्या खर्चातही तूट आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. असे असतानाही रब्बीच्या पिकांसाठी बळीराजाने पुन्हा कंबर कसली व उन्हाळी कांदा, टमाटे, फ्लॉवर आदि पिकांची लागवड केली आहे. या रोगांपासून पिके वाचवण्यासाठी महागड्या कीटकनाशकांची फवारणी सध्या चालू आहे. २-३ दिवसांपासून निर्माण होणारे ढगाळ वातावरण बळीराजाची काळजी वाढवणारे ठरत आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपूर्वी हवामान खात्याने गारपीट होण्याचा इशारा दिला होता. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे तसेच अवकाळी पाऊस, गारपीट होण्याच्या शक्यतेमुळे कांदा व इतर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते आहे. चिंतेचे हे ढग निवळले तरच रब्बीची पिके या संकटातून वाचतील व हाती चार पैसे येतील अशी बळीराजाला आशा आहे. (वार्ताहर)