शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

ढगाळ वातावरणामुळे बळीराजा धास्तावला

By admin | Updated: January 22, 2016 22:38 IST

ढगाळ वातावरणामुळे बळीराजा धास्तावला

जोरण : वातावरणातील सततच्या बदलांमुळे रब्बी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात मोठी घट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन ते तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे परिसरातील शेतकरी धास्तावला आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून पर्जन्यवृष्टी कमी होत असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यंदाच्या पावसाळ्यात शेवटच्या चरणात समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तब्बल पाच वर्षांनंतर झालेल्या पावसाच्या भरवशावर परिसरात खरिपाच्या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड झाली; मात्र सर्वत्र पिके जोमात असताना सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे खरिपातील सर्वच पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात मोठी घट आली, तर अनेक पिके शेतातच सडल्याने उत्पादनावर केलेल्या खर्चातही तूट आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला. असे असतानाही रब्बीच्या पिकांसाठी बळीराजाने पुन्हा कंबर कसली व उन्हाळी कांदा, टमाटे, फ्लॉवर आदि पिकांची लागवड केली आहे. या रोगांपासून पिके वाचवण्यासाठी महागड्या कीटकनाशकांची फवारणी सध्या चालू आहे. २-३ दिवसांपासून निर्माण होणारे ढगाळ वातावरण बळीराजाची काळजी वाढवणारे ठरत आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपूर्वी हवामान खात्याने गारपीट होण्याचा इशारा दिला होता. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे तसेच अवकाळी पाऊस, गारपीट होण्याच्या शक्यतेमुळे कांदा व इतर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते आहे. चिंतेचे हे ढग निवळले तरच रब्बीची पिके या संकटातून वाचतील व हाती चार पैसे येतील अशी बळीराजाला आशा आहे. (वार्ताहर)