शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

बीकॉमच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन घेतले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 01:00 IST

वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षाच्या (टी.वाय.बी.कॉम.) निकालात एकाच विषयात अनेक विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्यानंतर फेरतपासणीतही विलंब केल्याप्रकरणी नाशिकमधील ८०हून अधिक विद्यार्थ्यांनी पुकारलेले आंदोलन विद्यापीठाने फेरतपासणीचा निकाल जाहिर केल्यानंतर मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देफेरनिकाल जाहीर : अनेक विद्यार्थी उत्तीर्ण

नाशिक : वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षाच्या (टी.वाय.बी.कॉम.) निकालात एकाच विषयात अनेक विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केल्यानंतर फेरतपासणीतही विलंब केल्याप्रकरणी नाशिकमधील ८०हून अधिक विद्यार्थ्यांनी पुकारलेले आंदोलन विद्यापीठाने फेरतपासणीचा निकाल जाहिर केल्यानंतर मागे घेण्यात आले. या निकालात जवळपास निम्मेपेक्षा अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.बीकॉमच्या निकालात मर्कंटाइल लॉ (एम.लॉ) या विषयात अनेक विद्यार्थ्यांना ७ जूनला लागलेल्या निकालात अनुत्तीर्ण करण्यात आले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या पुनर्तपासणीसाठी अर्ज केला. मात्र, त्या प्रक्रियेतही प्रचंड विलंब करण्यात आल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या नंदन भास्करे यांच्या नेतृत्वाखाली पुणे विद्यापीठाच्या नाशिकमधील उपकेंद्राच्या समन्वयकांना घेराव घातला होता. तसेच समन्वयकांना त्यांच्या दालनातच कोंडून ठेवत कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले होते.दोन दिवस आंदोलन केल्यानंतर विद्यापीठाने अखेर फेरतपासणीचा निकाल जाहीर केला यामध्ये अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने आंदोलन थांबविण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला. दरम्यान, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अद्यापही समाधान झाले नसल्याने नाराजी कायम आहे.काठावर उत्तीर्णविषयात उत्तीर्ण होण्यासाठी लेखी परीक्षेत ८० पैकी ३२ गुण मिळणे बंधनकारक आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्यांना ३२ किंवा ३३ असेच गुणदिले आहेत. म्हणजे पुन्हा या फेरतपासणीतही अधिक पुरवण्या जोडलेले उत्तीर्ण आणि कमी पुरवण्या जोडलेले अनुत्तीर्ण असाच अंदाजे ‘निकाल’ लावण्यात आला असल्याचा आक्षेप विद्यार्थ्यांनी घेतला आहे. त्यामुळे निकाला लागला असला तरी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अजूनही समाधान झालेले नसल्याने विद्यार्थ्यांची पुढील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठStudentविद्यार्थीagitationआंदोलन