शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

‘सर्वोत्तम व्हा, समाज तुम्हाला स्विकारणारच’ : हणमंतराव गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 19:29 IST

आयुष्यात जे कराल ते सर्वोत्तमच करायचे अशी खुनगाठ मनाशी बांधून पुढील वाटचाल करावी, असा मौलिक सल्ला भारत विकास समुहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिला.

ठळक मुद्देआयुष्याचे दुसरे नाव संघर्ष आहेस्वत:ची प्रगती साधण्यासाठी कधीही कोणासोबत स्पर्धा करु नकाजपान, जर्मनीसारख्या देशांमध्ये उज्ज्वल भवितव्याची संधी

नाशिक : स्पर्धेच्या युगात चांगले, उत्तम होऊन चालणार नाही, तर आपण सर्वोत्तम होऊन यशोशिखर सर करण्याचा प्रयत्न करायला हवा. सर्वोत्तम होऊन तुम्ही जेव्हा पुढे याल तेव्हा समाज तुमची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यात जे कराल ते सर्वोत्तमच करायचे अशी खुनगाठ मनाशी बांधून पुढील वाटचाल करावी, असा मौलिक सल्ला भारत विकास समुहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिला.काठेगल्ली येथील नाशिक एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्रजी माध्यमाच्या रंगुबाई जुन्नरे विद्यालयाला गायकवाड यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी हितगुज केले. यावेळी व्यासपिठावर प्रमुख पाहूणे म्हणून आमदार डॉ. सुधीर तांबे, संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप फडके, मुख्याध्यापक नंदा पेठेकर उपस्थित होते. संस्थेच्या वतीने फडके यांनी पाहूण्यांचे स्वागत केले. यावेळी गायकवाड म्हणाले, आपण कोणत्या कुटुंबात जन्माला आलो किंवा आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कशी आहे? यावर आपले यश अजिबात अवलंबून नसते. आयुष्याचे दुसरे नाव संघर्ष आहे, हे आपण लक्षात घेत आपल्या मनाची तयारी करत आपल्यासमोर येणाऱ्या नवनवीन आव्हानांचा सामना करायला शिकले पाहिजे. कारण संघर्ष कधी संपत नसतो आणि आव्हानेदेखील तशीच असतात फरक केवळ आव्हानांच्या स्वरुपामध्ये पडतो, असे गायकवाड यावेळी म्हणाले.भारत जगातील सर्वाधिक तरुण देश आहे. या देशातील तरुणांना जगभरात नोकरीच्या संधी आहेत. गरज आहे ती केवळ उच्चशिक्षणासोबत कौशल्य आत्मसात करण्याची. आयुष्यात स्वत:ची प्रगती साधण्यासाठी कधीही कोणासोबत स्पर्धा किंवा तुलना करु नका. वर्गातदेखील ज्याने प्रथम क्रमांक मिळविला त्या मित्राशी आपली तुलना करायची नाही. आपण कुठे कमी पडलो त्याचा विचार करत जिद्द व क ठोर परिश्रम करावे, असा सल्ला गायकवाड यांनी दिला. प्रास्ताविक फडके यांनी केले. सुत्रसंचालन जयश्री चौधरी यांनी केले.जपानी भाषेचे धडे देण्याचा सल्लाभविष्यात भारतातील तरुणाईला जपान, जर्मनीसारख्या देशांमध्ये उज्ज्वल भवितव्याची संधी आहेत. गरज आहे ती केवळ जपानी भाषा शिकण्याची. जपानी भाषा ज्याला जमली त्याला जपानमध्ये कुठल्याहीप्रकारचा अडथळा येत नाही. त्यामुळे जपानी भाषेचे वर्ग सुरू करण्याचा सल्लाही गायकवाड यांनी यावेळी संस्थेच्या विश्वस्तांना दिला. 

टॅग्स :Educationशिक्षणNashikनाशिकSocialसामाजिकbusinessव्यवसाय