शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

८० टक्के रेल्वे प्रवाशांना एसटी बसचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:05 IST

गेल्या बुधवारपासून मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्याने नाशिकहून मुंबईला जाणाºया चाकरमान्यांनी एस.टी. बसचा आधार घेतला आहे. मनमाड, नाशिकहून मुंबईला जाणाºया गाड्या तीन दिवसांपासून रद्द होत असल्याने नियमित रेल्वेने प्रवास करणाºया सुमारे ८० टक्के कामगार, व्यावसायिक वर्गाला मुंबई गाठण्यासाठी बसचा आधार घ्यावा लागला. या प्रवाशांसाठी एस.टी. महामंडळाला दररोज किमान ४० बसेस जादा सोडाव्या लागल्या.

नाशिक : गेल्या बुधवारपासून मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्याने नाशिकहून मुंबईला जाणाºया चाकरमान्यांनी एस.टी. बसचा आधार घेतला आहे. मनमाड, नाशिकहून मुंबईला जाणाºया गाड्या तीन दिवसांपासून रद्द होत असल्याने नियमित रेल्वेने प्रवास करणाºया सुमारे ८० टक्के कामगार, व्यावसायिक वर्गाला मुंबई गाठण्यासाठी बसचा आधार घ्यावा लागला. या प्रवाशांसाठी एस.टी. महामंडळाला दररोज किमान ४० बसेस जादा सोडाव्या लागल्या.गेल्या बुधवारी आसनगाव-वाशिंद रेल्वेस्थानक दरम्यान दुरांतो एक्स्प्रेसला पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास अपघात झाल्यानंतर मुंबईला जाणारी आणि मुंबईहून येणारी रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी पंचवटी आणि गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या इगतपुरीत थांबविण्यात आल्या होत्या, तर राज्यराणी एक्स्प्रेस नाशिकरोड स्थानकातूनच रद्द करण्यात आली होती. अशावेळी इगतपुरीहून रेल्वेच्या प्रवाशांना एस.टी. मुंबईला सोडण्यात आले, तर नाशिकरोडच्या प्रवाशांसाठी महामार्ग बसस्थानक येथून जादा बससेची व्यवस्था करून देण्यात आली. याचदिवशी सायंकाळच्या सुमारास प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याने सायंकाळी २० जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. अपघातानंतर त्याचदिवशी रात्री मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने मध्य रेल्वेच्या सर्वच गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. दुसºया आणि तिसºया दिवशीही प्रवाशांना बसने कसारा आणि कल्याणपर्यंत सोडले. या मार्गावरील रेल्वेसेवा अद्यापही सुरळीत झाली नसल्याने आणि गाड्याच रद्द करण्यात आल्यामुळे रेल्वे वाहतूक सुरळीत होईपर्यंत दररोज मुंबईला ये-जा करणाºया चाकरमान्यांनी एस.टी. बसचा पर्याय निवडला होता. दि. ३० रोजी नियमित गाड्यांव्यतिरिक्त ८६, ३१ रोजी ३६, तर शुक्रवारी म्हणजेच दि. १ सप्टेंबर रोजी ३४ जादा गाड्या मुंबईसाठी सोडण्यात आल्या. महामार्ग स्थानकातून मुंबईसाठी दररोज किमान ६१ गाड्या धावतात. मात्र प्रवाशांची गर्दी लक्षात घेता गेल्या तीन दिवसांत महामंडळाने प्रवाशांच्या मागणीनुसार गाड्या उपलब्ध करून दिल्याने अनेकांची सोय झाली. केवळ नाशिक किंवा इगतपुरीतूनच नव्हे तर मनमाड, नांदगाव येथूनही २६ गाड्यांच्या माध्यमातून प्रवाशांना महामार्ग बसस्थानकापर्यंत आणले गेले. उत्तर भारतातून येणाºया गाड्या मनमाडपर्यंतच, तर काही गाड्या या भुसावळला थांबविण्यात आल्याने मनमाडपर्यंत आलेल्या प्रवाशांना बसने नाशिकला महामार्ग स्थानकात आणून तेथून मुंबईला जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली.