शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

८० टक्के रेल्वे प्रवाशांना एसटी बसचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:05 IST

गेल्या बुधवारपासून मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्याने नाशिकहून मुंबईला जाणाºया चाकरमान्यांनी एस.टी. बसचा आधार घेतला आहे. मनमाड, नाशिकहून मुंबईला जाणाºया गाड्या तीन दिवसांपासून रद्द होत असल्याने नियमित रेल्वेने प्रवास करणाºया सुमारे ८० टक्के कामगार, व्यावसायिक वर्गाला मुंबई गाठण्यासाठी बसचा आधार घ्यावा लागला. या प्रवाशांसाठी एस.टी. महामंडळाला दररोज किमान ४० बसेस जादा सोडाव्या लागल्या.

नाशिक : गेल्या बुधवारपासून मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्याने नाशिकहून मुंबईला जाणाºया चाकरमान्यांनी एस.टी. बसचा आधार घेतला आहे. मनमाड, नाशिकहून मुंबईला जाणाºया गाड्या तीन दिवसांपासून रद्द होत असल्याने नियमित रेल्वेने प्रवास करणाºया सुमारे ८० टक्के कामगार, व्यावसायिक वर्गाला मुंबई गाठण्यासाठी बसचा आधार घ्यावा लागला. या प्रवाशांसाठी एस.टी. महामंडळाला दररोज किमान ४० बसेस जादा सोडाव्या लागल्या.गेल्या बुधवारी आसनगाव-वाशिंद रेल्वेस्थानक दरम्यान दुरांतो एक्स्प्रेसला पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास अपघात झाल्यानंतर मुंबईला जाणारी आणि मुंबईहून येणारी रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी पंचवटी आणि गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या इगतपुरीत थांबविण्यात आल्या होत्या, तर राज्यराणी एक्स्प्रेस नाशिकरोड स्थानकातूनच रद्द करण्यात आली होती. अशावेळी इगतपुरीहून रेल्वेच्या प्रवाशांना एस.टी. मुंबईला सोडण्यात आले, तर नाशिकरोडच्या प्रवाशांसाठी महामार्ग बसस्थानक येथून जादा बससेची व्यवस्था करून देण्यात आली. याचदिवशी सायंकाळच्या सुमारास प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याने सायंकाळी २० जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. अपघातानंतर त्याचदिवशी रात्री मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने मध्य रेल्वेच्या सर्वच गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. दुसºया आणि तिसºया दिवशीही प्रवाशांना बसने कसारा आणि कल्याणपर्यंत सोडले. या मार्गावरील रेल्वेसेवा अद्यापही सुरळीत झाली नसल्याने आणि गाड्याच रद्द करण्यात आल्यामुळे रेल्वे वाहतूक सुरळीत होईपर्यंत दररोज मुंबईला ये-जा करणाºया चाकरमान्यांनी एस.टी. बसचा पर्याय निवडला होता. दि. ३० रोजी नियमित गाड्यांव्यतिरिक्त ८६, ३१ रोजी ३६, तर शुक्रवारी म्हणजेच दि. १ सप्टेंबर रोजी ३४ जादा गाड्या मुंबईसाठी सोडण्यात आल्या. महामार्ग स्थानकातून मुंबईसाठी दररोज किमान ६१ गाड्या धावतात. मात्र प्रवाशांची गर्दी लक्षात घेता गेल्या तीन दिवसांत महामंडळाने प्रवाशांच्या मागणीनुसार गाड्या उपलब्ध करून दिल्याने अनेकांची सोय झाली. केवळ नाशिक किंवा इगतपुरीतूनच नव्हे तर मनमाड, नांदगाव येथूनही २६ गाड्यांच्या माध्यमातून प्रवाशांना महामार्ग बसस्थानकापर्यंत आणले गेले. उत्तर भारतातून येणाºया गाड्या मनमाडपर्यंतच, तर काही गाड्या या भुसावळला थांबविण्यात आल्याने मनमाडपर्यंत आलेल्या प्रवाशांना बसने नाशिकला महामार्ग स्थानकात आणून तेथून मुंबईला जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली.