शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

८० टक्के रेल्वे प्रवाशांना एसटी बसचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:05 IST

गेल्या बुधवारपासून मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्याने नाशिकहून मुंबईला जाणाºया चाकरमान्यांनी एस.टी. बसचा आधार घेतला आहे. मनमाड, नाशिकहून मुंबईला जाणाºया गाड्या तीन दिवसांपासून रद्द होत असल्याने नियमित रेल्वेने प्रवास करणाºया सुमारे ८० टक्के कामगार, व्यावसायिक वर्गाला मुंबई गाठण्यासाठी बसचा आधार घ्यावा लागला. या प्रवाशांसाठी एस.टी. महामंडळाला दररोज किमान ४० बसेस जादा सोडाव्या लागल्या.

नाशिक : गेल्या बुधवारपासून मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्याने नाशिकहून मुंबईला जाणाºया चाकरमान्यांनी एस.टी. बसचा आधार घेतला आहे. मनमाड, नाशिकहून मुंबईला जाणाºया गाड्या तीन दिवसांपासून रद्द होत असल्याने नियमित रेल्वेने प्रवास करणाºया सुमारे ८० टक्के कामगार, व्यावसायिक वर्गाला मुंबई गाठण्यासाठी बसचा आधार घ्यावा लागला. या प्रवाशांसाठी एस.टी. महामंडळाला दररोज किमान ४० बसेस जादा सोडाव्या लागल्या.गेल्या बुधवारी आसनगाव-वाशिंद रेल्वेस्थानक दरम्यान दुरांतो एक्स्प्रेसला पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास अपघात झाल्यानंतर मुंबईला जाणारी आणि मुंबईहून येणारी रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी पंचवटी आणि गोदावरी एक्स्प्रेस या गाड्या इगतपुरीत थांबविण्यात आल्या होत्या, तर राज्यराणी एक्स्प्रेस नाशिकरोड स्थानकातूनच रद्द करण्यात आली होती. अशावेळी इगतपुरीहून रेल्वेच्या प्रवाशांना एस.टी. मुंबईला सोडण्यात आले, तर नाशिकरोडच्या प्रवाशांसाठी महामार्ग बसस्थानक येथून जादा बससेची व्यवस्था करून देण्यात आली. याचदिवशी सायंकाळच्या सुमारास प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याने सायंकाळी २० जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. अपघातानंतर त्याचदिवशी रात्री मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने मध्य रेल्वेच्या सर्वच गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. दुसºया आणि तिसºया दिवशीही प्रवाशांना बसने कसारा आणि कल्याणपर्यंत सोडले. या मार्गावरील रेल्वेसेवा अद्यापही सुरळीत झाली नसल्याने आणि गाड्याच रद्द करण्यात आल्यामुळे रेल्वे वाहतूक सुरळीत होईपर्यंत दररोज मुंबईला ये-जा करणाºया चाकरमान्यांनी एस.टी. बसचा पर्याय निवडला होता. दि. ३० रोजी नियमित गाड्यांव्यतिरिक्त ८६, ३१ रोजी ३६, तर शुक्रवारी म्हणजेच दि. १ सप्टेंबर रोजी ३४ जादा गाड्या मुंबईसाठी सोडण्यात आल्या. महामार्ग स्थानकातून मुंबईसाठी दररोज किमान ६१ गाड्या धावतात. मात्र प्रवाशांची गर्दी लक्षात घेता गेल्या तीन दिवसांत महामंडळाने प्रवाशांच्या मागणीनुसार गाड्या उपलब्ध करून दिल्याने अनेकांची सोय झाली. केवळ नाशिक किंवा इगतपुरीतूनच नव्हे तर मनमाड, नांदगाव येथूनही २६ गाड्यांच्या माध्यमातून प्रवाशांना महामार्ग बसस्थानकापर्यंत आणले गेले. उत्तर भारतातून येणाºया गाड्या मनमाडपर्यंतच, तर काही गाड्या या भुसावळला थांबविण्यात आल्याने मनमाडपर्यंत आलेल्या प्रवाशांना बसने नाशिकला महामार्ग स्थानकात आणून तेथून मुंबईला जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली.