शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

बँकांच्या विचार मंथन बैठकीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 01:44 IST

भारतीय अर्थव्यस्थेला बळकटी मिळण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी अर्थमंत्रालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय बँकांनी दोन दिवसीय विचार मंथनाला सुरु वात केली आहे.

सातपूर : भारतीय अर्थव्यस्थेला बळकटी मिळण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी अर्थमंत्रालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय बँकांनी दोन दिवसीय विचार मंथनाला सुरु वात केली आहे. पहिल्या दिवशी सरकारी योजनांना गती देण्यासोबतच डिजिटल व्यवहारांमधील वृद्धी, कृषी कर्ज व कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणे यासह विविध विषयांवर मंथन करण्यात येणार आहे.सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने विभागस्तरीय दोन दिवसीय विचार मंथन बैठकीचा शुभारंभ सातपूर येथील हॉटेल बीएलव्हीडी येथे करण्यात आला. या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून सेंट्रल बँकेचे महाप्रबंधक के. सत्यनारायण (झोनल आॅफिस, पुणे), नाशिकचे विभागीय प्रबंधक डी. एस. शालिग्राम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीत नाशिकसह धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील १६१ शाखा प्रबंधक सहभागी झाले आहेत. शाखा स्तरावरून आणि शाखा प्रबंधकांकडून आलेल्या मुद्द्यांवर चर्चा करून त्यासंदर्भात सूचना मागविणे आणि योग्य त्या सूचनांची अंमलबजावणी करणे, तसेच सरकारी योजनांना गती देण्यासोबतच डिजिटल व्यवहारांमधील वृद्धी, मुद्रा योजना, कृषी कर्ज व कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणे अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत शाखा प्रबंधकांचे विविध गट करण्यात आले होते. त्यानंतर विविध विषयांवर गटनिहाय चर्चा झाली. त्यावरील काही उपाययोजनाही शाखा प्रबंधकांनी मांडल्या. ही सर्व माहिती संकलित करून बँकेच्या वरिष्ठ कार्यालयाकडे आणि सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय प्रबंधक डी. एस. शालिग्राम यांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्ह्यातील शाखा व्यवस्थापकांची कार्यशाळाभारतीय स्टेट बँकेच्या सातपूर येथील क्षेत्रीय कार्यालयात दोन दिवसीय कार्यशाळेला क्षेत्रीय महाव्यवस्थापक शहर श्रीकृष्ण रंजन, क्षेत्रीय महाव्यवस्थापक ग्रामीण विनोद कुमार, उपमहाव्यवस्थापक सुनील भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. या कार्यशाळेत जिल्ह्यातील स्टेट बँकेच्या ८१ शाखांचे व्यवस्थापक उपस्थित होते. या सर्व व्यवस्थापकांनी सरकारी योजनांना गती देण्यासोबतच डिजिटल व्यवहारांमधील वृद्धी, कृषी कर्ज व कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणे यासह विविध १६ योजनांची माहिती,कारणमिमांसा, उपाययोजना यांची सविस्तर माहिती गटागटाने प्रेझेंटेशनद्वारे सादर केली. दुसऱ्या दिवशी सविस्तर अहवाल तयार करून झोन स्तरावरील विचार मंथनसाठी पाठविण्यात येणार आहे. अशीही माहिती स्टेट बँकेचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक शहर श्रीकृष्ण रंजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

टॅग्स :Nashikनाशिकbankबँक