शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बँकांच्या विचार मंथन बैठकीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 01:44 IST

भारतीय अर्थव्यस्थेला बळकटी मिळण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी अर्थमंत्रालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय बँकांनी दोन दिवसीय विचार मंथनाला सुरु वात केली आहे.

सातपूर : भारतीय अर्थव्यस्थेला बळकटी मिळण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी अर्थमंत्रालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय बँकांनी दोन दिवसीय विचार मंथनाला सुरु वात केली आहे. पहिल्या दिवशी सरकारी योजनांना गती देण्यासोबतच डिजिटल व्यवहारांमधील वृद्धी, कृषी कर्ज व कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणे यासह विविध विषयांवर मंथन करण्यात येणार आहे.सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने विभागस्तरीय दोन दिवसीय विचार मंथन बैठकीचा शुभारंभ सातपूर येथील हॉटेल बीएलव्हीडी येथे करण्यात आला. या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून सेंट्रल बँकेचे महाप्रबंधक के. सत्यनारायण (झोनल आॅफिस, पुणे), नाशिकचे विभागीय प्रबंधक डी. एस. शालिग्राम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीत नाशिकसह धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील १६१ शाखा प्रबंधक सहभागी झाले आहेत. शाखा स्तरावरून आणि शाखा प्रबंधकांकडून आलेल्या मुद्द्यांवर चर्चा करून त्यासंदर्भात सूचना मागविणे आणि योग्य त्या सूचनांची अंमलबजावणी करणे, तसेच सरकारी योजनांना गती देण्यासोबतच डिजिटल व्यवहारांमधील वृद्धी, मुद्रा योजना, कृषी कर्ज व कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणे अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत शाखा प्रबंधकांचे विविध गट करण्यात आले होते. त्यानंतर विविध विषयांवर गटनिहाय चर्चा झाली. त्यावरील काही उपाययोजनाही शाखा प्रबंधकांनी मांडल्या. ही सर्व माहिती संकलित करून बँकेच्या वरिष्ठ कार्यालयाकडे आणि सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय प्रबंधक डी. एस. शालिग्राम यांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्ह्यातील शाखा व्यवस्थापकांची कार्यशाळाभारतीय स्टेट बँकेच्या सातपूर येथील क्षेत्रीय कार्यालयात दोन दिवसीय कार्यशाळेला क्षेत्रीय महाव्यवस्थापक शहर श्रीकृष्ण रंजन, क्षेत्रीय महाव्यवस्थापक ग्रामीण विनोद कुमार, उपमहाव्यवस्थापक सुनील भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. या कार्यशाळेत जिल्ह्यातील स्टेट बँकेच्या ८१ शाखांचे व्यवस्थापक उपस्थित होते. या सर्व व्यवस्थापकांनी सरकारी योजनांना गती देण्यासोबतच डिजिटल व्यवहारांमधील वृद्धी, कृषी कर्ज व कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करणे यासह विविध १६ योजनांची माहिती,कारणमिमांसा, उपाययोजना यांची सविस्तर माहिती गटागटाने प्रेझेंटेशनद्वारे सादर केली. दुसऱ्या दिवशी सविस्तर अहवाल तयार करून झोन स्तरावरील विचार मंथनसाठी पाठविण्यात येणार आहे. अशीही माहिती स्टेट बँकेचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक शहर श्रीकृष्ण रंजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

टॅग्स :Nashikनाशिकbankबँक