शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

बोराळे गावची केळी थेट परदेशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 10:02 PM

साकोरा : नांदगाव तालुक्यात गेल्या दोन तीन वर्षांपासून कोरडवाहू शेतीसाठी दुष्काळी परिस्थिती असतांना, केवळ गिरणा डॅम धरणाच्या भरवशावर बागायती शेती करणारे गिरणा डॅम खोऱ्यातील आमोदे- बोराळे परिसरातील अनेक शेतकरी दरवर्षी नवीन पिके घेत उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्नात असतात. असाच एक नवीन प्रयोग बोराळे येथील शेतकरी भिलासाहेब दगा सोळुंके यांनी केळीची लागवड यशस्वी केली असून, पहिलीच कटाई करत हा माल भारताबाहेर इराण येथे एक्सपोर्ट करत इतर शेतकऱ्यांच्या पुढे एक नवीन आदर्श ठेवला आहे.

ठळक मुद्दे केळीची पहिलीच कटाई इराणला एक्सपोर्ट

साकोरा : नांदगाव तालुक्यात गेल्या दोन तीन वर्षांपासून कोरडवाहू शेतीसाठी दुष्काळी परिस्थिती असतांना, केवळ गिरणा डॅम धरणाच्या भरवशावर बागायती शेती करणारे गिरणा डॅम खोऱ्यातील आमोदे- बोराळे परिसरातील अनेक शेतकरी दरवर्षी नवीन पिके घेत उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्नात असतात. असाच एक नवीन प्रयोग बोराळे येथील शेतकरी भिलासाहेब दगा सोळुंके यांनी केळीची लागवड यशस्वी केली असून, पहिलीच कटाई करत हा माल भारताबाहेर इराण येथे एक्सपोर्ट करत इतर शेतकऱ्यांच्या पुढे एक नवीन आदर्श ठेवला आहे.नाशिक आणि जळगाव जिल्ह्याच्या बॉर्डरवर गिरणा डॅम धरणाच्या पाण्याच्या भरवशावर वसलेले हे एक बोराळे छोटेसे गाव या गावातील उदरनिर्वाहाचे साधन म्हणून शेती हा प्रमुख व्यवसाय मानला जातो. नेहमी वेगवेगळे प्रयोग करत शेती करणारे भिला दगा सोळुंके हे त्याच्याकडे असणाºया चाळीस एकर क्षेत्रात केळी, ऊस, कपाशी, कांदा अशी पिके त्यांचे दोनभाऊ दादाभाऊ सोळुंके, साहेबराव सोळुंके, भाचा सुवर्णसिंग जाधव व पुतण्या नितेंद्र सोळुंके यांच्या मदतीने हा व्यवसाय करतात. शिक्षक झालेले असले तरी शेती कामात याची बरीच मोठी मदत यांना मिळत असते. त्यांचा लहान पुतण्या बलरामिसंग सोळुंके हा बी एस्सी. अ‍ॅग्री करून नंतर ए बी एम करून त्याला विदेशी मार्केटचा अभ्यास करण्यासाठी मागील चार वर्षात आफ्रिका, दुबई, थायलंड, इराण, इराक, सौदी अरेबिया, कुवेत आदी देशात पाठवून अभ्यास करून घेत मग स्वत:ची शेती आदर्श करण्यास त्यास मदत केली.बोराळे शिवारातील गट नंबर २८४ नंबर मधील नऊ एकर क्षेत्रात त्यांनी २५ जून २०१८ रोजी जैन कंपनीच्या केळी पिकाची लागवड केली होती. योग्य खत, पाण्याचे नियोजन केल्याने पीक पूर्णपणे तयार झाले आणि वर्षभरात स्वत:च्या शेतात लागवड केलेली केळीची पहलीच कटाई आपला पुतण्या बलरामिसंग सोळुंके याने सुरू केलेल्या एक्सपोर्ट व्यवसायामुळे हा माल आता इराणला जाण्याचे त्यांचे स्वप्न साकार झाले आहे.आमचा मुख्य व्यवसाय शेती असून या आधी कांदा, कपाशी आदी पिके घेतली आहेत. मात्र त्या पिकांना योग्य बाजारभाव न मिळाल्याने आता केळी पिकाची लागवड केली. केळीची पहिलीच कटाई इराणला एक्सपोर्ट करण्याचा निर्णय पुतण्या बलरामिसंग याने घेतल्याने मी त्यास होकार दिलाय माझा शेतीमाला थेट परदेशवारीला जात असल्याचे समाधान आहे.भिलासाहेब सोळूंके- शेतकरी, आमोदे ता. नांदगाव.