शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पात नेहमी साहित्यावरच कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 01:38 IST

राज्य कोणत्याही पक्षाचे असले तरी अर्थसंकल्पात कपात करायची असेल तर लेखक, वृद्ध कलावंत, ग्रंथालय कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाड कोसळते. ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांसारखे अत्यल्प वेतनावर काम करणारे कर्मचारी, वृद्ध कलावंत, लेखक यांना लक्ष्य केले जाते. हे म्हणजे राजाचा अंगरखा फाटला म्हणून द्वारपालाचे फाटके धोतर ओढणे कितपत योग्य आहे, असेही पाटील यांनी नमूद करीत साहित्यावरच कुऱ्हाड मारणाऱ्या राजकारण्यांवर आसूड ओढला.

ठळक मुद्देविश्वास पाटील : साहित्य संमेलनाच्या उद्घाटकीय भाषणात प्रतिपादन

नाशिक : राज्य कोणत्याही पक्षाचे असले तरी अर्थसंकल्पात कपात करायची असेल तर लेखक, वृद्ध कलावंत, ग्रंथालय कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाड कोसळते. ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांसारखे अत्यल्प वेतनावर काम करणारे कर्मचारी, वृद्ध कलावंत, लेखक यांना लक्ष्य केले जाते. हे म्हणजे राजाचा अंगरखा फाटला म्हणून द्वारपालाचे फाटके धोतर ओढणे कितपत योग्य आहे, असेही पाटील यांनी नमूद करीत साहित्यावरच कुऱ्हाड मारणाऱ्या राजकारण्यांवर आसूड ओढला.

नाशिकमधील ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकाच्या भूमिकेतून केलेल्या भाषणात पाटील बोलत होते. यावेळी विश्वास पाटील यांनी महाराष्ट्राचा इतिहास आणि नाशिकच्या ऐतिहासिक पाऊलखुणांचा धांडोळा घेतला. यावेळी बोलताना पाटील यांनी नाशिकमधील तात्यासाहेब शिरवाडकर आणि वसंत कानेटकर यांची घरे ही माझ्यासाठी अजिंठा-वेरूळ असून, नाशिकशी घट्ट ऋणानुबंध असल्याचे सांगितले. नाशिक जिल्ह्यातील नांदूरशिंगोटे येथील भागोजी नाईक यांनी १८५७ साली केलेले भिल्लांचे बंड इतके मोठे होते की त्या नाईक यांना कपटाने पराभूत करणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्याला ब्रिटनच्या राणीने व्हिक्टोरिया क्रॉस पुरस्कार प्रदान करण्यात आल्याची आठवणदेखील पाटील यांनी सांगितली. शाहीर परशुराम यांच्या नावाने मंदिर बांधणारे वावी हे गाव अशी नाशिकची वेगळी ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिवाजी महाराजांचे राज्य छोटे, मात्र त्यांच्या तत्कालीन न्यायाची, आदर्श राज्याची वाखाणणी त्यावेळच्या ब्रिटिश, फ्रेंच, डच कागदपत्रांमध्ये आढळतात. मात्र, त्या शिवरायांच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या खाणाखुणा यांचे आपण जतन करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

बंगालीत महाश्वेतादेवी, तमिळमध्ये जयकांतन तसेच आपल्या मराठी साहित्यातील प्रख्यात लेखक अण्णा भाऊ साठे यांचे महान साहित्य असूनही त्यांना ज्ञानपीठ न मिळाल्याची खंत वाटते, असेही पाटील यांनी नमूद केले. जर तमिळ किंवा अन्य दाक्षिणात्य भाषांना अभिजाततेचा दर्जा मिळतो, तर २ हजार वर्षांहून अधिक पुरातन भाषा असलेल्या मराठीला तो मिळायलाच हवा, असेही पाटील यांनी नमूद केले.

इन्फो

 

शिवरायांच्या गडकिल्ल्यांच्या स्मृती जपणे हेच कर्तव्य !

शिवरायांच्या स्मारकाचा विचार करताना तो अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवतेपेक्षा मोठा करण्याचा विचार हा आक्रस्ताळेपणा आणि अविचार ठरेल. त्यापेक्षा सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर गडकिल्ल्यांच्या रूपात असलेल्या पाऊलखुणा जपणे, हे आपले कर्तव्य असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक