शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

अर्थसंकल्पात नेहमी साहित्यावरच कुऱ्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 01:38 IST

राज्य कोणत्याही पक्षाचे असले तरी अर्थसंकल्पात कपात करायची असेल तर लेखक, वृद्ध कलावंत, ग्रंथालय कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाड कोसळते. ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांसारखे अत्यल्प वेतनावर काम करणारे कर्मचारी, वृद्ध कलावंत, लेखक यांना लक्ष्य केले जाते. हे म्हणजे राजाचा अंगरखा फाटला म्हणून द्वारपालाचे फाटके धोतर ओढणे कितपत योग्य आहे, असेही पाटील यांनी नमूद करीत साहित्यावरच कुऱ्हाड मारणाऱ्या राजकारण्यांवर आसूड ओढला.

ठळक मुद्देविश्वास पाटील : साहित्य संमेलनाच्या उद्घाटकीय भाषणात प्रतिपादन

नाशिक : राज्य कोणत्याही पक्षाचे असले तरी अर्थसंकल्पात कपात करायची असेल तर लेखक, वृद्ध कलावंत, ग्रंथालय कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाड कोसळते. ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांसारखे अत्यल्प वेतनावर काम करणारे कर्मचारी, वृद्ध कलावंत, लेखक यांना लक्ष्य केले जाते. हे म्हणजे राजाचा अंगरखा फाटला म्हणून द्वारपालाचे फाटके धोतर ओढणे कितपत योग्य आहे, असेही पाटील यांनी नमूद करीत साहित्यावरच कुऱ्हाड मारणाऱ्या राजकारण्यांवर आसूड ओढला.

नाशिकमधील ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकाच्या भूमिकेतून केलेल्या भाषणात पाटील बोलत होते. यावेळी विश्वास पाटील यांनी महाराष्ट्राचा इतिहास आणि नाशिकच्या ऐतिहासिक पाऊलखुणांचा धांडोळा घेतला. यावेळी बोलताना पाटील यांनी नाशिकमधील तात्यासाहेब शिरवाडकर आणि वसंत कानेटकर यांची घरे ही माझ्यासाठी अजिंठा-वेरूळ असून, नाशिकशी घट्ट ऋणानुबंध असल्याचे सांगितले. नाशिक जिल्ह्यातील नांदूरशिंगोटे येथील भागोजी नाईक यांनी १८५७ साली केलेले भिल्लांचे बंड इतके मोठे होते की त्या नाईक यांना कपटाने पराभूत करणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्याला ब्रिटनच्या राणीने व्हिक्टोरिया क्रॉस पुरस्कार प्रदान करण्यात आल्याची आठवणदेखील पाटील यांनी सांगितली. शाहीर परशुराम यांच्या नावाने मंदिर बांधणारे वावी हे गाव अशी नाशिकची वेगळी ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिवाजी महाराजांचे राज्य छोटे, मात्र त्यांच्या तत्कालीन न्यायाची, आदर्श राज्याची वाखाणणी त्यावेळच्या ब्रिटिश, फ्रेंच, डच कागदपत्रांमध्ये आढळतात. मात्र, त्या शिवरायांच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या खाणाखुणा यांचे आपण जतन करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

बंगालीत महाश्वेतादेवी, तमिळमध्ये जयकांतन तसेच आपल्या मराठी साहित्यातील प्रख्यात लेखक अण्णा भाऊ साठे यांचे महान साहित्य असूनही त्यांना ज्ञानपीठ न मिळाल्याची खंत वाटते, असेही पाटील यांनी नमूद केले. जर तमिळ किंवा अन्य दाक्षिणात्य भाषांना अभिजाततेचा दर्जा मिळतो, तर २ हजार वर्षांहून अधिक पुरातन भाषा असलेल्या मराठीला तो मिळायलाच हवा, असेही पाटील यांनी नमूद केले.

इन्फो

 

शिवरायांच्या गडकिल्ल्यांच्या स्मृती जपणे हेच कर्तव्य !

शिवरायांच्या स्मारकाचा विचार करताना तो अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवतेपेक्षा मोठा करण्याचा विचार हा आक्रस्ताळेपणा आणि अविचार ठरेल. त्यापेक्षा सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर गडकिल्ल्यांच्या रूपात असलेल्या पाऊलखुणा जपणे, हे आपले कर्तव्य असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक