लाभार्थी योजनेपासून दूर
By Admin | Updated: August 1, 2014 01:09 IST2014-07-31T22:07:30+5:302014-08-01T01:09:03+5:30
लाभार्थी योजनेपासून दूर

लाभार्थी योजनेपासून दूर
५हरसूल : सामाजिक अर्थसाह्य योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांखाली अद्यापही अनेक लाभार्थी योजनेपासून दूर आहेत. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करिता १ आॅगस्ट महसूल दिनापासून विशेष मोहीम राबविण्यात येणार
आहे.
ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी यांची संयुक्त बैठक उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी विविध योजनांंची माहिती देण्यात आली. त्यानुसार १ ते १० आॅगस्ट अर्ज स्वीकारण्यÞात येतील. १० ते १४ आॅगस्ट छाननी होईल. दि. १५ आॅगस्ट रोजी समितीची बैठक होऊन त्यात प्रत्यक्ष लाभार्थी निवड करण्यात येईल. तरी या योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. महसूल दिनानिमित्त सुवर्णजयंती राजस्व अभियानांतर्गत दाखले प्रदान करणे, रस्ते मोकळे करणे, फेरफार अदालत घेणे या कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
शिधापत्रिका वाटप तसेच कुळकायदा कलम ४३चा शेरा कमी करणे याकरिताही शिबिरे आयोजित करण्यात येतील. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या
कलम १६५ नुसार निस्तार पत्रक व वाजीब उल अर्जदेखील जाहीर केले जातील.
यावेळी तहसीलदार नरेशकुमार बहिरम, गटविकास अधिकारी श्रीमती प्रमिला जाखलेकर, गटशिक्षण अधिकारी माळवाल, निवासी नायब तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, प्रशासन नायब तहसीलदार बी.बी. शेवाळे, पुरवठा निरीक्षक सूर्यवंशी, पंकज पाटील, लिपीक संगायो आदि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.(वार्ताहर)
’हनुमानवाडी : पंचवटीतील हनुमानवाडी परिसरातील दळवी मार्गावरील खंडेराव मंदिरासमोर बुधवारी दुपारी विद्युत खांब कोसळल्याने नागरिकांना मार्गक्रमण करण्यास अडथळा निर्माण झाला.