शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

सुखासाठी लोभाचा त्याग करावा : रुद्धपूरकर बाबा शास्त्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 01:24 IST

सध्याच्या काळात मनुष्याचे जीवन ताणतणावाने भरलेले असून, समाजातही वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष दिसत आहेत. मनुष्याच्या जीवनात सुख-शांती आली तर पर्यायाने समाज आणि देशात सुख-शांती येईल, हाच विश्वशांतीचा खरा मार्ग असेल.

नाशिक : सध्याच्या काळात मनुष्याचे जीवन ताणतणावाने भरलेले असून, समाजातही वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष दिसत आहेत. मनुष्याच्या जीवनात सुख-शांती आली तर पर्यायाने समाज आणि देशात सुख-शांती येईल, हाच विश्वशांतीचा खरा मार्ग असेल. त्याकरिता राग-लोभाचा म्हणजेच द्वेष आणि स्वार्थाचा त्याग करावा लागेल असे विचार अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष आचार्य महंत रुद्धपूरकर बाबा शास्त्री यांनी मांडले.कोणार्कनगर, आडगाव येथील पंचकृष्ण लॉन्स येथे शुक्रवारी (दि.१) महानुपंथीयांच्या वतीने विश्वशांती ज्ञानयज्ञ अर्थात ब्रह्मविद्या निरुपण महावाक्य सोहळ्यास प्रारंभ झाला. याप्रसंगी उद्घाटन सत्रात अध्यक्षस्थानावरून निरुपण करताना महंत शास्त्रीजी बोलत होते. यावेळी शास्त्रीजी म्हणाले की, मनुष्याच्या मनात शांती असेल तर समाजात आणि संपूर्ण विश्वात शांती नांदू शकेल. त्यासाठी आपल्याला षट्रिपूचा म्हणजे काम, क्रोध, मद्, मत्सर, आदी गोष्टींचा जीवनातून त्याग करून सद्विचारांचा अंगीकार करावा लागेल, असेही शास्त्रींनी यांनी यावेळी नमूद केले. याप्रसंगी कार्याध्यक्ष आचार्य महंत खामणीकर बाबा, आचार्य महंत विध्वंस बाबा यांनीदेखील विश्वशांती ज्ञानयज्ञ तसेच ब्रह्मविद्या निरुपण याविषयी सविस्तर विवेचन केले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महंत संतोषमुनी शास्त्री कपाटे यांनी विश्वशांती ज्ञानयज्ञाचा उद्देश स्पष्ट केला. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी याप्रसंगी व्यासपीठावर आचार्य प्रवर महंत नागराजबाबा शास्त्री, आचार्य महंत पुजदेकर बाबा, आचार्यप्रवर महंत सुकेणेकर बाबा शास्त्री, आचार्य महंत राहेरकरबाबा, आचार्य महंत कृष्णराजबाबा, महंत हेमंतराजबाबा बीडकर, महंत युवराज बाबाशास्त्री, आचार्य महंत मचालेबाबा, महंत वैरागीबाबा, महंत भीष्माचार्य बाबा, महंत दत्तराजबाबा, वामनमुनी अंकुळनेकरबाबा, आचार्य महंत डॉ. दत्तराज शास्त्री, महंत तपस्वीनी सुभद्रा शास्त्री कपाटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळकृष्ण अंजनगावकर यांनी केले. उद्घाटन सोहळ्याच्या प्रारंभी देवाला विडा अर्पण करण्यात आला. तसेच संत महंतांचा सत्कार झाला. या ज्ञानयज्ञात आचार्य प्रवर महंत नागराजबाबा शास्त्री महिनाभर ब्रह्मविद्या निरुपण करणार आहेत.दुपारच्या सत्रात निरुपणविश्वशांती ज्ञानयज्ञानिमित्त दुपारच्या सत्रात आचार्यप्रवर महंत नागराज शास्त्री यांनी ब्रह्मविद्या महावाक्य या विषयावर निरुपण केले. यावेळी शास्त्री यांनी सांगितले की, सुमारे ३० वर्षांपूर्वी फैजपूर येथे मोठे बाबाजी यांनी विश्वशांती ज्ञानयज्ञाचा प्रारंभ केला. दरम्यान, शुक्रवारी पहाटे देवपूजा विधी, पारायण, गीतापाठ आदी कार्यक्रम झाले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक