शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

सुखासाठी लोभाचा त्याग करावा : रुद्धपूरकर बाबा शास्त्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 01:24 IST

सध्याच्या काळात मनुष्याचे जीवन ताणतणावाने भरलेले असून, समाजातही वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष दिसत आहेत. मनुष्याच्या जीवनात सुख-शांती आली तर पर्यायाने समाज आणि देशात सुख-शांती येईल, हाच विश्वशांतीचा खरा मार्ग असेल.

नाशिक : सध्याच्या काळात मनुष्याचे जीवन ताणतणावाने भरलेले असून, समाजातही वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष दिसत आहेत. मनुष्याच्या जीवनात सुख-शांती आली तर पर्यायाने समाज आणि देशात सुख-शांती येईल, हाच विश्वशांतीचा खरा मार्ग असेल. त्याकरिता राग-लोभाचा म्हणजेच द्वेष आणि स्वार्थाचा त्याग करावा लागेल असे विचार अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष आचार्य महंत रुद्धपूरकर बाबा शास्त्री यांनी मांडले.कोणार्कनगर, आडगाव येथील पंचकृष्ण लॉन्स येथे शुक्रवारी (दि.१) महानुपंथीयांच्या वतीने विश्वशांती ज्ञानयज्ञ अर्थात ब्रह्मविद्या निरुपण महावाक्य सोहळ्यास प्रारंभ झाला. याप्रसंगी उद्घाटन सत्रात अध्यक्षस्थानावरून निरुपण करताना महंत शास्त्रीजी बोलत होते. यावेळी शास्त्रीजी म्हणाले की, मनुष्याच्या मनात शांती असेल तर समाजात आणि संपूर्ण विश्वात शांती नांदू शकेल. त्यासाठी आपल्याला षट्रिपूचा म्हणजे काम, क्रोध, मद्, मत्सर, आदी गोष्टींचा जीवनातून त्याग करून सद्विचारांचा अंगीकार करावा लागेल, असेही शास्त्रींनी यांनी यावेळी नमूद केले. याप्रसंगी कार्याध्यक्ष आचार्य महंत खामणीकर बाबा, आचार्य महंत विध्वंस बाबा यांनीदेखील विश्वशांती ज्ञानयज्ञ तसेच ब्रह्मविद्या निरुपण याविषयी सविस्तर विवेचन केले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महंत संतोषमुनी शास्त्री कपाटे यांनी विश्वशांती ज्ञानयज्ञाचा उद्देश स्पष्ट केला. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी याप्रसंगी व्यासपीठावर आचार्य प्रवर महंत नागराजबाबा शास्त्री, आचार्य महंत पुजदेकर बाबा, आचार्यप्रवर महंत सुकेणेकर बाबा शास्त्री, आचार्य महंत राहेरकरबाबा, आचार्य महंत कृष्णराजबाबा, महंत हेमंतराजबाबा बीडकर, महंत युवराज बाबाशास्त्री, आचार्य महंत मचालेबाबा, महंत वैरागीबाबा, महंत भीष्माचार्य बाबा, महंत दत्तराजबाबा, वामनमुनी अंकुळनेकरबाबा, आचार्य महंत डॉ. दत्तराज शास्त्री, महंत तपस्वीनी सुभद्रा शास्त्री कपाटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बाळकृष्ण अंजनगावकर यांनी केले. उद्घाटन सोहळ्याच्या प्रारंभी देवाला विडा अर्पण करण्यात आला. तसेच संत महंतांचा सत्कार झाला. या ज्ञानयज्ञात आचार्य प्रवर महंत नागराजबाबा शास्त्री महिनाभर ब्रह्मविद्या निरुपण करणार आहेत.दुपारच्या सत्रात निरुपणविश्वशांती ज्ञानयज्ञानिमित्त दुपारच्या सत्रात आचार्यप्रवर महंत नागराज शास्त्री यांनी ब्रह्मविद्या महावाक्य या विषयावर निरुपण केले. यावेळी शास्त्री यांनी सांगितले की, सुमारे ३० वर्षांपूर्वी फैजपूर येथे मोठे बाबाजी यांनी विश्वशांती ज्ञानयज्ञाचा प्रारंभ केला. दरम्यान, शुक्रवारी पहाटे देवपूजा विधी, पारायण, गीतापाठ आदी कार्यक्रम झाले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक