शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

उन्हाळ्यात लस्सी, ताक, दही ताक, बर्फाचा गोळा टाळाच: वैद्य सावंत

By संजय पाठक | Updated: April 6, 2019 22:03 IST

उन्हाळ्यात थंडावा वाटवा यासाठी सामान्यत: रस्त्यावरील दुकानावरून बर्फाचा गोळा, दही आणि ताक सहजपणे घेत असले तरी हे पेय स्पर्शाला थंड असते प्रत्यक्षात मात्र शरीरात उष्ण असतात. त्यामुळे अशाप्रकारचे पेय टाळावे असे आवाहन नाशिक येथील आयुर्वेद वैद्य राहूल सावंत यांनी केले.

ठळक मुद्देस्पर्शाने थंड वाटणारे पदार्थ प्रत्यक्षात असतात उष्णउन्हामुळे रोगराईबरोबरच वाढते चिडचिडआवश्यक असल्यासच बाहेर पडा

 नाशिक- सर्वत्र उन्हाळा वाढु लागला आहे. पारा चाळीशी पार होत असून त्यामुळे अंगाची काहीली होत असतानाच विविध प्रकारचे आजार देखील होत आहेत. उन्हाळ्यात थंडावा वाटवा यासाठी सामान्यत: रस्त्यावरील दुकानावरून बर्फाचा गोळा, दही आणि ताक सहजपणे घेत असले तरी हे पेय स्पर्शाला थंड असते प्रत्यक्षात मात्र शरीरात उष्ण असतात. त्यामुळे अशाप्रकारचे पेय टाळावे असे आवाहन नाशिक येथील आयुर्वेद वैद्य राहूल सावंत यांनी केले. सध्या जाणवत असलेल्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवाद..प्रश्न- सध्या उन्हाळा वाढू लागला आहेत. त्यामुळे खाण्यापिण्याबरोबरच काय पथ्य पाळली पाहिजेत?सावंत- सध्या प्रखर उन्हाळा आहे. त्यामुळे बाहेर पडताना मुळातच काळजी घ्यायला हवी. बाहेर पडल्यानंतर उन्हाच्या कडाक्याने काहीली झाल्यानंतर लोक सहज लस्सी, ताक घेतात, अनेक युवक आणि लहान मुले बर्फाचा गोळा घेतात. परंतु स्पर्शाने थंड असलेली ही पदार्थ शरीरात मात्र गरम असतात. त्याचा प्रतिकुल परीणाम होत असतो. चक्कर येणे, त्वचेवर पुरळ येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे असे प्रकार होत असतात. त्यामुळे दही, ताक, लस्सी ऐवजी त्याऐवजी दुध, तूप, लोणी अशाप्रकारचे पदार्थ असले पाहिजे. तर ते उपयुक्त ठरेल. याशिवाय थंडच पदार्थ बाहेरही घ्यायचे असतील तर लिंंबु सरबत, कोकम सरबत, कैरी पन्हं, नारळ पाणी घेतले पाहिजे. क्षार वाढविण्यारे पदार्थ प्रामुख्याने घेतले पाहिजेत.प्रश्न- उन्हाळ्यात काय काळजी घेतली पाहिजे?सावंत- नाशिकचे सध्याचे तापमान बघता अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडले पाहिजे अन्यथा बाहेर जाणे टाळले पाहिजे. सुती कपड्यांचा वापर करावा, फळांचा रस जास्तीत जास्त घेतले पाहिजे.प्रश्न - रोगराईच्या दृष्टीने हा काळ अधिक महत्वाचा असतो काय?सावंत- सध्या ऋतुबदलाचा काळ आहे. त्यामुळे एडस, मधुमेह, दीर्घ काळ सोयारीसीस सारखे आजार असलेल्यांना त्याच प्रमाणे लहान मुले आणि वृध्दांना त्रास होत असतो. याकाळात स्वाईन फ्ल्यूसारख्या आजारांना पुरक विषाणू बळावतात. त्यामुळे काळजी घ्यावी. घरी आल्यानंतर उटणे लावून आंघाळ देखील करावी तसेच त्वचेला खोबरेल तेल लाावावे. त्यामुळे त्वचेवर थेट सुर्यकिरण पडण्याआधी आधी तेलावर पडतात. याशिवाय या काळात डोकेदुखी वाढते, स्वभाव चिडचिडा होतो. घामामुळे केसही गळतात एकंदरच परिणामकारक ऋतु असल्याने त्याबाबत काळजी घेण्याची गरज आहे.मुलाखत- संजय पाठक 

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्यSun strokeउष्माघातweatherहवामान