शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात लस्सी, ताक, दही ताक, बर्फाचा गोळा टाळाच: वैद्य सावंत

By संजय पाठक | Updated: April 6, 2019 22:03 IST

उन्हाळ्यात थंडावा वाटवा यासाठी सामान्यत: रस्त्यावरील दुकानावरून बर्फाचा गोळा, दही आणि ताक सहजपणे घेत असले तरी हे पेय स्पर्शाला थंड असते प्रत्यक्षात मात्र शरीरात उष्ण असतात. त्यामुळे अशाप्रकारचे पेय टाळावे असे आवाहन नाशिक येथील आयुर्वेद वैद्य राहूल सावंत यांनी केले.

ठळक मुद्देस्पर्शाने थंड वाटणारे पदार्थ प्रत्यक्षात असतात उष्णउन्हामुळे रोगराईबरोबरच वाढते चिडचिडआवश्यक असल्यासच बाहेर पडा

 नाशिक- सर्वत्र उन्हाळा वाढु लागला आहे. पारा चाळीशी पार होत असून त्यामुळे अंगाची काहीली होत असतानाच विविध प्रकारचे आजार देखील होत आहेत. उन्हाळ्यात थंडावा वाटवा यासाठी सामान्यत: रस्त्यावरील दुकानावरून बर्फाचा गोळा, दही आणि ताक सहजपणे घेत असले तरी हे पेय स्पर्शाला थंड असते प्रत्यक्षात मात्र शरीरात उष्ण असतात. त्यामुळे अशाप्रकारचे पेय टाळावे असे आवाहन नाशिक येथील आयुर्वेद वैद्य राहूल सावंत यांनी केले. सध्या जाणवत असलेल्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवाद..प्रश्न- सध्या उन्हाळा वाढू लागला आहेत. त्यामुळे खाण्यापिण्याबरोबरच काय पथ्य पाळली पाहिजेत?सावंत- सध्या प्रखर उन्हाळा आहे. त्यामुळे बाहेर पडताना मुळातच काळजी घ्यायला हवी. बाहेर पडल्यानंतर उन्हाच्या कडाक्याने काहीली झाल्यानंतर लोक सहज लस्सी, ताक घेतात, अनेक युवक आणि लहान मुले बर्फाचा गोळा घेतात. परंतु स्पर्शाने थंड असलेली ही पदार्थ शरीरात मात्र गरम असतात. त्याचा प्रतिकुल परीणाम होत असतो. चक्कर येणे, त्वचेवर पुरळ येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे असे प्रकार होत असतात. त्यामुळे दही, ताक, लस्सी ऐवजी त्याऐवजी दुध, तूप, लोणी अशाप्रकारचे पदार्थ असले पाहिजे. तर ते उपयुक्त ठरेल. याशिवाय थंडच पदार्थ बाहेरही घ्यायचे असतील तर लिंंबु सरबत, कोकम सरबत, कैरी पन्हं, नारळ पाणी घेतले पाहिजे. क्षार वाढविण्यारे पदार्थ प्रामुख्याने घेतले पाहिजेत.प्रश्न- उन्हाळ्यात काय काळजी घेतली पाहिजे?सावंत- नाशिकचे सध्याचे तापमान बघता अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडले पाहिजे अन्यथा बाहेर जाणे टाळले पाहिजे. सुती कपड्यांचा वापर करावा, फळांचा रस जास्तीत जास्त घेतले पाहिजे.प्रश्न - रोगराईच्या दृष्टीने हा काळ अधिक महत्वाचा असतो काय?सावंत- सध्या ऋतुबदलाचा काळ आहे. त्यामुळे एडस, मधुमेह, दीर्घ काळ सोयारीसीस सारखे आजार असलेल्यांना त्याच प्रमाणे लहान मुले आणि वृध्दांना त्रास होत असतो. याकाळात स्वाईन फ्ल्यूसारख्या आजारांना पुरक विषाणू बळावतात. त्यामुळे काळजी घ्यावी. घरी आल्यानंतर उटणे लावून आंघाळ देखील करावी तसेच त्वचेला खोबरेल तेल लाावावे. त्यामुळे त्वचेवर थेट सुर्यकिरण पडण्याआधी आधी तेलावर पडतात. याशिवाय या काळात डोकेदुखी वाढते, स्वभाव चिडचिडा होतो. घामामुळे केसही गळतात एकंदरच परिणामकारक ऋतु असल्याने त्याबाबत काळजी घेण्याची गरज आहे.मुलाखत- संजय पाठक 

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्यSun strokeउष्माघातweatherहवामान