शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

पेपर तपासणीचा तिढा सूटण्याची शक्यता, सोमवारच्या बैठकीकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 14:23 IST

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने बारावी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला असून राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. शिक्षकांनी पेपर तपासणीवर टाकलेल्या बहिष्काराचा निकाल लांबण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने शिक्षकांच्या आंदोलनाची दखल घेत सोमवारी (दि.5) दुपारी 2 वाजता मुंबई येथे शिक्षणमंत्री विनोद तावडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक संघटनेची बैठक बोलविली आहे.

ठळक मुद्देबारावीच्या पेपर तपासणीवर शिक्षक संघटनेचा बहिष्कार शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसंबघी सोमवारी बैठक वेतन अनुदानाविषयी सकारात्मक विचार झाल्यास तडजोडीची शक्यता

नाशिक : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने बारावी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला असून राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. शिक्षकांनी पेपर तपासणीवर टाकलेल्या बहिष्काराचा निकाल लांबण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने शिक्षकांच्या आंदोलनाची दखल घेत सोमवारी (दि.5) दुपारी 2 वाजता मुंबई येथे शिक्षणमंत्री विनोद तावडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक संघटनेची बैठक बोलविली आहे.कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांनी मूल्यांकनास पात्र महाविद्यालयांना अनुदान द्यावे, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये, 2012 व 2013 पासूनच्या शिक्षकांना नियुक्त मान्यता व वेतन द्यावे, 2003 ते2011 पर्यंतच्या मंजूर वाढीव पदावरील शिक्षकांना नियुक्ती मान्यता देऊन त्यांच्यासाठी वेतनाची आर्थिक तरतूद करावी, तसेच2011पासूनच्या वाढीव पदांना मंजुरी द्यावी. अशा विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीचे पेपर तपासण्यावर बहिष्कारास्त्र उपसले आहे. बारावीची परीक्षा दि.21 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून पाच प्रमुख विषयांचे पेपर होऊनही शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासण्याचे काम हाती घेतलेले नाही. परिणामी राज्यातील लाखो विद्याथ्र्यांच्या उत्तररपत्रिका मंडळाकडे पडून राहिल्या असून, त्यांच्या सुरक्षेसह निकालाची चिंता वाढीस लागल्याने सराकने शिक्षकांच्या आंदोलनाची गंभीर दखल घेतली आी होती. सरकारने या प्रश्नाकडे लक्ष देत, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे. यातून काही तोडगा निघाल्यास तो विद्यार्थ्यांसह पालकांनाही दिलासा दायक ठरणार आहे.सकारात्मक विचार झाल्यास तडजोडीची भूमिकागेल्या तीन ते चार वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या मागण्या प्रलंबित असून अद्याप कोणत्याही मागणीची सरकारने दखल घेतलेली नाही. शिक्षक रस्त्यावर उतरून आंदोलने करीत असतानाही शासन याची दखल नाही. त्यामुळेच बारावी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिक्षकांना घ्यावा लागला आहे. सरकारने अनुदान आणि वेतनाच्या मुद्यावर सकारात्मक विचार केला तर अन्य मागण्याविषयी शिक्षक तडजोडीची भूमिका घेऊन शकतात. त्यादृष्टीने सोमवारी (दि.5) होणाऱ्या बैठकीत तोडगा काढण्याचा प्रयत्न राहणार आहे. -प्रा. संजय शिंदे, सरचिटणीस, शिक्षक संघटना

टॅग्स :Teacherशिक्षकNashikनाशिकagitationआंदोलनexamपरीक्षा