शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
3
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
4
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
5
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
6
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
7
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
8
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
9
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
10
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
11
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
12
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
13
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
14
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
15
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
16
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
17
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
18
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
19
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
20
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?

सरकारचे अपयश झाकण्यासाठी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न ; आम अदमी पार्टीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 15:53 IST

देशासमोर आर्थिक संकटासोबतच बेरोजगारी,शिक्षण आणि आरोग्याच्या अनेक समस्या असताना विकासाची स्वप्न दाखविणाऱ्या भाजपा सरकारला विविध पातळयांवर काम करताना सपशेल अपयश आले आहे. हे अपयश झाकण्यासाठीच सकारकडून विविध समाजांमध्ये तेढ निर्माण करून फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीचे उत्तर महाराष्ट्र सचीव अ‍ॅड. प्रभाकर वायचळे व नाशिक शहराध्यक्ष अ‍ॅड. बंडू दशरथ डांगे यांनी शनिवारी (दि. २०) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे. 

ठळक मुद्देआम अादमी पार्टीचा शिवसेना, भाजपा हटाव नारानाशिकमध्ये 24 ऑक्टोबरला जनआक्रोश मोर्चा

नाशिक : देशासमोर आर्थिक संकटासोबतच बेरोजगारी,शिक्षण आणि आरोग्याच्या अनेक समस्या असताना विकासाची स्वप्न दाखविणाऱ्या भाजपा सरकारला विविध पातळयांवर काम करताना सपशेल अपयश आले आहे. हे अपयश झाकण्यासाठीच सकारकडून विविध समाजांमध्ये तेढ निर्माण करून फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीचे उत्तर महाराष्ट्र सचीव अ‍ॅड. प्रभाकर वायचळे व नाशिक शहराध्यक्ष अ‍ॅड. बंडू दशरथ डांगे यांनी शनिवारी (दि. २०) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे. भाजपा सरकारने नोटबंदी, जीएसटी, खासगीकरण, नोकरभरती बंद करून  शिक्षणाचे बाजारीकरण करण्यासोबतच  शेतकऱ्यांच्या जमीनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचे काम केले आहे. परंतु,निवडणुकांपूर्वी देशवासीयांना दाखवलेली स्वप्न पूर्ण करण्यात मात्र सरकारला सपशेल अपयश आल्याने आता सरकार माणसामाणसामध्ये भेद निर्माण करून इंग्रजांप्रमाणे फोडा आणि राज्य करा अशी रणनिती सरकारकरून वापरली जात असल्याचा आरोप करतानाच हा डाव हाणून पाडण्यासाठी तसेच देशासह महाराष्ट्रातील शिवसेना भाजपाचे सरकार हटविण्यासाठी शहरातून बुधवारी (दि.२४)आॅक्टोबरला ‘जनआक्रोश’ मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आम आदमी पार्टीचे नशिक कार्यकारणीने पत्रकार परीषदेतून स्पष्ट केले. यावेळी शहर उपाध्यक्ष जगमेरसिंग खालसा,विकास पाटील, अनील कौशिक, अलताफ शेख, स्वप्नील घिया रवी ननावरे आदी उपस्थित होते.  

टॅग्स :PoliticsराजकारणAAPआपBJPभाजपाShiv Senaशिवसेनाagitationआंदोलन