शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
8
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
9
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
10
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
12
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
13
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
14
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
15
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
16
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
17
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
18
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
19
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
20
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'

युतीत जागा न मिळाल्याने आठवले नाराज

By श्याम बागुल | Updated: March 2, 2019 18:38 IST

नाशिक : २०१४ च्या निवडणुकीत सेना-भाजपाची युती व्हावी यासाठी आम्हीच प्रयत्न करून कॉँग्रेसच्या विरोधात महायुती उभी केली, दलितांच्या मतांवर ...

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना भेटणार : एनडीए मात्र सोडणार नाहीआम्हीच प्रयत्न करून कॉँग्रेसच्या विरोधात महायुती उभी केली,

नाशिक : २०१४ च्या निवडणुकीत सेना-भाजपाची युती व्हावी यासाठी आम्हीच प्रयत्न करून कॉँग्रेसच्या विरोधात महायुती उभी केली, दलितांच्या मतांवर देशात मोदी यांना, तर राज्यात फडणवीस यांना सत्तेवर आणले; परंतु २०१९ च्या निवडणुकीला सामोरे जाताना सेना-भाजपाने रिपाइंला एकही जागा न सोडल्याचे दु:ख आहे. युती करताना आमचा अनुल्लेखदेखील टाळला जाणार असेल तर निवडणुकीत चांगले दृश्य दिसणार नाही. अशी नाराजी एकीकडे व्यक्त करीत असताना दुसरीकडे मात्र आपण कोणत्याही परिस्थितीत एनडीए सोडणार नाही. रिपाइंला दोन जागा मिळाव्यात यासाठी पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

नाशिक जिल्हा दौऱ्यावर पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी, सेना व भाजपाने प्रत्येकी एकेक जागा लोकसभा निवडणुकीसाठी सोडल्यास यापुढे राज्यसभेची जागा आपण मागणार नाही असे सांगून, रिपाइं ज्या पक्षांच्या सोबत असतो तो पक्ष सत्तेवर येत असतो हे आजवर स्पष्ट झाले आहे, याची जाणीव सर्व पक्षांना असून, त्याच पार्श्वभूमीवर राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपल्याला निरोप पाठविला होता. परंतु आपण वेगळा काही निर्णय घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दहशतवाद्यांवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये कोणतेही राजकारण नसले तरी, मध्यंतरीच्या काळात देशातील वातावरण काहीसे वेगळे होते, परंतु आता सर्जिकल स्ट्राईक केल्यामुळे देशातील वातावरण बदलले असून, तरुण वर्ग भाजपाकडे आकर्षित होत असल्याचे सांगून, आठवले यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणात आणखी दहा टक्क्याने वाढ करावी व त्यात भटके विमुक्तांना सामावून घ्यावे. त्याचप्रमाणे लष्करात दलित समाजासाठी स्वतंत्र आरक्षण ठेवण्यात यावे, अशी मागणीही केली. सवर्णांना दहा टक्के आरक्षण देण्यासाठी आपणच मागणी केली होती व सरकारने ती मान्य करून लागू केली आहे. सर्वोच्च न्यायालयदेखील ते नाकारू शकत नाही, असा दावाही त्यांनी केला. दलितांना घटनेने आरक्षण मिळत गेल्यामुळे ज्या समाजाला आरक्षणाचा लाभ मिळत नव्हता त्यांच्याकडून दलितांवर अत्याचार केला जात होता. आता सर्वच घटकांना आरक्षण मिळणार असल्यामुळे दलितांवर अत्याचार होणार नाही, अशी अपेक्षाही त्यांनी शेवटी व्यक्त केली.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकRamdas Athawaleरामदास आठवले