शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

आराईच्या शेतकर्‍यांचे उपोषण मागे आश्वासन : चर्चा होईपर्यंत उपोषणस्थळी मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 5:37 PM

सटाणा : तालुक्यातील आराई येथील गोरल्या नाला पाझर तलावात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मोबदला न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी येथील तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून (दि.२८) सुरू केलेले आमरण उपोषण शुक्रवारी (दि.१) रात्री उशिरा पेढे भरून मागे घेण्यात आले आहे.मात्र जिल्हाधिकार्‍यांशी सोमवारी (दि.४) चर्चा होईपर्यंत उपोषणकर्त्यांचा मुक्काम उपोषण स्थळीच राहणार आहे.

सटाणा : तालुक्यातील आराई येथील गोरल्या नाला पाझर तलावात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मोबदला न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी येथील तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून (दि.२८) सुरू केलेले आमरण उपोषण शुक्रवारी (दि.१) रात्री उशिरा पेढे भरून मागे घेण्यात आले आहे.मात्र जिल्हाधिकार्‍यांशी सोमवारी (दि.४) चर्चा होईपर्यंत उपोषणकर्त्यांचा मुक्काम उपोषण स्थळीच राहणार आहे.आराई येथील गोरल्या नाल्यावर शासनाने सन १९९५-९६ मध्ये पाझर तलाव बांधला होता. या तलावासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन मात्र संबंधित विभागाने १५ फेब्रुवारी २००० मध्ये केल्याचे आढळून आले आहे. प्रत्यक्षात मात्र या जमिनी पाझर तलाव बांधल्यापासून कसता येत नसल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. शासन नियमानुसार पाच वर्षाच्या आत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला अदा करणे बंधनकारक असताना भूसंपादन करून वीस वर्षांचा कालावधी लोटला आहे. शासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही अद्याप मोबदला मिळालेला नाही. संबधित विभागाने नव्याने मूल्यांकन करून व्याजासह मोबदला द्यावा, अशी मागणी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केली आहे.शुक्रवारी (दि. १) रात्री उशिरा प्रभारी तहसीलदार शुभम गुप्ता ,लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता चौधरी ,शाखा अभियंता अविनाश कापडणीस, संजय भामरे यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चेच्या तीन फेर्‍या केल्या. त्यानंतर आमदार दिलीप बोरसे प्र भारी तहसीलदार गुप्ता सोमवारी जिल्हाधिकार्‍यांशी सकारात्मक चर्चा करून प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचा राहिलेला आर्थिक मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, उपअभियंता चौधरी यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्या शेतकर्‍यांनी उपोषण मागे घेतले. मात्र, सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा होईपर्यंत प्रकल्पग्रस्त शेतकरी नरेंद्र सोनवणे ,अरुण सोनवणे, काकाजी देवरे, दिगंबर सोनवणे, विजय सोनवणे, गोकुळ सोनवणे, सुरेश देवरे, माधव देवरे, बाळासाहेब देवरे, दत्तात्रेय देवरे, नामदेव सोनवणे यांनी आपला मुक्काम उपोषणस्थळीच राहणार असल्याचा निर्णय घेतला आहे.इन्फोआश्वासनानंतरही मोबदला नाहीशेतकऱ्यांनी १६ ऑगस्ट १०१९ रोजी बेमुदत उपोषण सुरू केले होते. २० ऑगस्ट २०१९ रोजी जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांनी ३१ मार्च २०२० अखेरपर्यंत कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र आजपर्यंत शेतकऱ्यांना कुठलाही मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारपासून (दि. २८ ) बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले होते.

टॅग्स :Farmerशेतकरी