शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
2
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
3
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
4
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
5
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
6
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
7
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
8
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
9
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
10
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
11
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
12
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
13
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
14
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
15
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
16
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
17
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
18
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
19
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
20
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?

बागलाण तालुकावासीयांवर कृत्रिम पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 01:23 IST

वीज महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे बागलाण तालुक्यात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होऊन ग्रामस्थांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून तब्बल ७० रोहित्र जळाले आहेत. त्यामुळे शेकडो कृषिपंप बंद अवस्थेत असून, पाण्याअभावी कृत्रिम संकट निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देशेकडो कृषिपंप बंद : दीड महिन्यात जळाले ७० रोहित्र

नितीन बोरसे ।सटाणा : वीज महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे बागलाण तालुक्यात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होऊन ग्रामस्थांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून तब्बल ७० रोहित्र जळाले आहेत. त्यामुळे शेकडो कृषिपंप बंद अवस्थेत असून, पाण्याअभावी कृत्रिम संकट निर्माण झाले आहे.बागलाण तालुक्यात यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झाले. त्यातच विहिरींना बऱ्यापैकी पाणी असल्यामुळे मका, भुईमूग, बाजरी आदी पिकांचा वेळेवर पेरा झाला आहे. बहुतांश पिकांची कोळपणी-देखील झाली आहे. मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांना आता पाण्याची आवश्यकता असताना विजेअभावी खरीप हंगाम धोक्यात आला आहे. शेतशिवारात राहणाºया शेतकऱ्यांना तसेच जनावरांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विहिरीत पाणी असून, विजेअभावी हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.गेल्या वर्षी बागलाणमधील शेतकºयांना दुष्काळाने आर्थिक अडचणीत आणले होते. यंदा कोरोनाच्या संकटामुळे रब्बी हातात आला खरा; परंतु लॉकडाऊनमुळे कवडीमोल भावाने कांदा, मका, भाजीपाला विकण्याची वेळ आली. या वारंवार येणाºया संकटामुळे शेतकरी बेजार होऊन कर्जबाजारी झाला. मान्सून वेळेवर दाखल झाल्यामुळे खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.डोक्यावर कर्जाचा बोजा असताना बहुतांश शेतकºयांनी खरिपासाठी खासगी कर्जे घेतली आणि खरिपाचा पेरा केला आहे. मात्र अंकुर फुटत असताना वीज महावितरण कंपनीने ‘शॉक ’दिला. वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराने दोन महिन्यांपासून जळालेले रोहित्र बदलून मिळत नाही. यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात तर आलाच; परंतु कृत्रिम पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे.जळालेले रोहित्र चोवीस तासाच्या आत बदलून देणे बंधनकारक आहे; मात्र कंपनीकडून नियमांचे पालन केले जात नाही. बिले तर भरमसाठ दिले जातात. आगामी काळात कृषिपंप चोवीस तासात बदलून मिळण्यासाठी आपण शासन स्तरावर आवाज उठविणार आहोत.- दिलीप बोरसे, आमदारलॉकडाऊनमुळे मजुरांचा प्रश्न निर्माण झाल्यामुळेच रोहित्र दुरु स्तीअभावी पडून आहेत. काही दिवसांपूर्वी आॅइलचा तुटवडा होता. आता मजूर काही प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे सात ते आठ दिवसात सर्वच रोहित्र बदलून देण्यात येतील.- सुनील बोंडे,कार्यकारी अभियंता, सटाणा विभाग

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी