शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
2
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
3
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
4
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
5
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
6
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
7
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
8
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
9
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
10
'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
11
IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)
12
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
13
‘हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
14
मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान भोसरीत इमारतीवर आग; स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली आग
15
Nashik Municipal Corporation Election 2026 : "दोन्ही भावांमध्ये राम उरला नाही, जो राम का नहीं वो किसी काम के नहीं"; देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर साधला निशाणा
16
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहितनं रचला नवा इतिहास; असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील तो पहिलाच
18
स्वत: दोन बायका केल्या, पण आपलं लग्न लावून देत नाहीत, संतापलेल्या मुलाने वडिलांची केली हत्या
19
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
20
अमेरिकेने हाय टॅरिफ लादला; भारताने 'या' देशांकडे वळवला मोर्चा, निर्यातीत मोठी वाढ, पाहा आकडेवारी
Daily Top 2Weekly Top 5

बागलाण तालुकावासीयांवर कृत्रिम पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 01:23 IST

वीज महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे बागलाण तालुक्यात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होऊन ग्रामस्थांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून तब्बल ७० रोहित्र जळाले आहेत. त्यामुळे शेकडो कृषिपंप बंद अवस्थेत असून, पाण्याअभावी कृत्रिम संकट निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देशेकडो कृषिपंप बंद : दीड महिन्यात जळाले ७० रोहित्र

नितीन बोरसे ।सटाणा : वीज महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे बागलाण तालुक्यात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होऊन ग्रामस्थांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून तब्बल ७० रोहित्र जळाले आहेत. त्यामुळे शेकडो कृषिपंप बंद अवस्थेत असून, पाण्याअभावी कृत्रिम संकट निर्माण झाले आहे.बागलाण तालुक्यात यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झाले. त्यातच विहिरींना बऱ्यापैकी पाणी असल्यामुळे मका, भुईमूग, बाजरी आदी पिकांचा वेळेवर पेरा झाला आहे. बहुतांश पिकांची कोळपणी-देखील झाली आहे. मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांना आता पाण्याची आवश्यकता असताना विजेअभावी खरीप हंगाम धोक्यात आला आहे. शेतशिवारात राहणाºया शेतकऱ्यांना तसेच जनावरांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विहिरीत पाणी असून, विजेअभावी हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.गेल्या वर्षी बागलाणमधील शेतकºयांना दुष्काळाने आर्थिक अडचणीत आणले होते. यंदा कोरोनाच्या संकटामुळे रब्बी हातात आला खरा; परंतु लॉकडाऊनमुळे कवडीमोल भावाने कांदा, मका, भाजीपाला विकण्याची वेळ आली. या वारंवार येणाºया संकटामुळे शेतकरी बेजार होऊन कर्जबाजारी झाला. मान्सून वेळेवर दाखल झाल्यामुळे खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.डोक्यावर कर्जाचा बोजा असताना बहुतांश शेतकºयांनी खरिपासाठी खासगी कर्जे घेतली आणि खरिपाचा पेरा केला आहे. मात्र अंकुर फुटत असताना वीज महावितरण कंपनीने ‘शॉक ’दिला. वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराने दोन महिन्यांपासून जळालेले रोहित्र बदलून मिळत नाही. यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात तर आलाच; परंतु कृत्रिम पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे.जळालेले रोहित्र चोवीस तासाच्या आत बदलून देणे बंधनकारक आहे; मात्र कंपनीकडून नियमांचे पालन केले जात नाही. बिले तर भरमसाठ दिले जातात. आगामी काळात कृषिपंप चोवीस तासात बदलून मिळण्यासाठी आपण शासन स्तरावर आवाज उठविणार आहोत.- दिलीप बोरसे, आमदारलॉकडाऊनमुळे मजुरांचा प्रश्न निर्माण झाल्यामुळेच रोहित्र दुरु स्तीअभावी पडून आहेत. काही दिवसांपूर्वी आॅइलचा तुटवडा होता. आता मजूर काही प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे सात ते आठ दिवसात सर्वच रोहित्र बदलून देण्यात येतील.- सुनील बोंडे,कार्यकारी अभियंता, सटाणा विभाग

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी