शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

बागलाण तालुकावासीयांवर कृत्रिम पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 01:23 IST

वीज महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे बागलाण तालुक्यात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होऊन ग्रामस्थांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून तब्बल ७० रोहित्र जळाले आहेत. त्यामुळे शेकडो कृषिपंप बंद अवस्थेत असून, पाण्याअभावी कृत्रिम संकट निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देशेकडो कृषिपंप बंद : दीड महिन्यात जळाले ७० रोहित्र

नितीन बोरसे ।सटाणा : वीज महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे बागलाण तालुक्यात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होऊन ग्रामस्थांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून तब्बल ७० रोहित्र जळाले आहेत. त्यामुळे शेकडो कृषिपंप बंद अवस्थेत असून, पाण्याअभावी कृत्रिम संकट निर्माण झाले आहे.बागलाण तालुक्यात यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झाले. त्यातच विहिरींना बऱ्यापैकी पाणी असल्यामुळे मका, भुईमूग, बाजरी आदी पिकांचा वेळेवर पेरा झाला आहे. बहुतांश पिकांची कोळपणी-देखील झाली आहे. मात्र पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांना आता पाण्याची आवश्यकता असताना विजेअभावी खरीप हंगाम धोक्यात आला आहे. शेतशिवारात राहणाºया शेतकऱ्यांना तसेच जनावरांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विहिरीत पाणी असून, विजेअभावी हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.गेल्या वर्षी बागलाणमधील शेतकºयांना दुष्काळाने आर्थिक अडचणीत आणले होते. यंदा कोरोनाच्या संकटामुळे रब्बी हातात आला खरा; परंतु लॉकडाऊनमुळे कवडीमोल भावाने कांदा, मका, भाजीपाला विकण्याची वेळ आली. या वारंवार येणाºया संकटामुळे शेतकरी बेजार होऊन कर्जबाजारी झाला. मान्सून वेळेवर दाखल झाल्यामुळे खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.डोक्यावर कर्जाचा बोजा असताना बहुतांश शेतकºयांनी खरिपासाठी खासगी कर्जे घेतली आणि खरिपाचा पेरा केला आहे. मात्र अंकुर फुटत असताना वीज महावितरण कंपनीने ‘शॉक ’दिला. वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराने दोन महिन्यांपासून जळालेले रोहित्र बदलून मिळत नाही. यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात तर आलाच; परंतु कृत्रिम पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे.जळालेले रोहित्र चोवीस तासाच्या आत बदलून देणे बंधनकारक आहे; मात्र कंपनीकडून नियमांचे पालन केले जात नाही. बिले तर भरमसाठ दिले जातात. आगामी काळात कृषिपंप चोवीस तासात बदलून मिळण्यासाठी आपण शासन स्तरावर आवाज उठविणार आहोत.- दिलीप बोरसे, आमदारलॉकडाऊनमुळे मजुरांचा प्रश्न निर्माण झाल्यामुळेच रोहित्र दुरु स्तीअभावी पडून आहेत. काही दिवसांपूर्वी आॅइलचा तुटवडा होता. आता मजूर काही प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे सात ते आठ दिवसात सर्वच रोहित्र बदलून देण्यात येतील.- सुनील बोंडे,कार्यकारी अभियंता, सटाणा विभाग

टॅग्स :water shortageपाणीकपातWaterपाणी