शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

भगूरला पाणीचोरी रोखण्यासाठी लष्कर तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:50 IST

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना फक्त पिण्यासाठी पाणी दारणा धरणातून सोडल्यानंतर काही शेतकरी रात्रीच्या वेळी बेकायदेशीरपणे दादागिरी करून शेतीसाठी मोटारीने पाणी उपसा करीत असल्याने भरारी पथकाने शस्रधारी लष्करी जवान ठिकठिकाणी तैनात केले असून, त्यांच्या धाकामुळे पाणीचोरी रोखण्यास मदत होत आहे.

भगूर : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना फक्त पिण्यासाठी पाणी दारणा धरणातून सोडल्यानंतर काही शेतकरी रात्रीच्या वेळी बेकायदेशीरपणे दादागिरी करून शेतीसाठी मोटारीने पाणी उपसा करीत असल्याने भरारी पथकाने शस्रधारी लष्करी जवान ठिकठिकाणी तैनात केले असून, त्यांच्या धाकामुळे पाणीचोरी रोखण्यास मदत होत आहे.लहवित, भगूर, देवळाली कॅम्प, नाशिकरोड, चेहेडी ते सिन्नर आदी भागात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करता, पिण्यासाठी पंधरा दिवस पुरेल इतके पाणी जलसंपदा विभागाने दारणा धरणातून लष्करी बंधारा, भगूर नदी आणि नाशिकरोड, चेहेडी बंधाऱ्यात सोडले आणि बेकायदेशीर शेतकरी पाणी उपसा करणार नाही यासाठी भरारी पथक नेमण्यात आले. तरीही विशेषत: राहुरी, दोनवाडे परिसरातील काही शेतकरी भरारी पथकाला न जुमानता रात्रीच्या वेळी बेकायदेशीर शेतीसाठी पाणी घेऊन शेतीतील विहिरी भरून घेत असल्याचे निदर्शनास आले. असाच प्रकार चालू राहिला तर जिल्हाधिकारी आदेशानुसार पिण्याच्या पाण्यासाठी १५ दिवस पाणी पुरणार नाही आणि दुसरे रोटेशन लवकर मिळणार नाही व पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या होण्याची शक्यता लक्षात घेऊन भरारी पथकाने पोलिसांची मागणी केली होती. मात्र लोकसभा निवडणुकीमुळे पोलीस संरक्षण मिळाले नाही.दुसरीकडे शेतकरी दादागिरी करून पाण्याचा उपसा करीत असल्याचे पाहून अखेर लष्करी अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेत, शस्रधारी लष्करी जवानांना बंदोबस्तासाठी नेमून पाणी उपसा करणाºया शेतकºयांचे पंप, मोटारी जप्त करून वीज जोडणीचे स्टार्टर तोडून टाकले.शेतक-यांमुळे पाणीसमस्या गंभीरबुधवारी दुपारपासून लष्कराच्या जवानांनी जोरदार कारवाई करीत, काही मोटारी जप्त केल्या. दरम्यान या संदर्भात लष्करी अधिकाºयांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, लष्करी विभागाला शेतकरी त्रासाने गंभीर पाणी समस्या निर्माण झाली तर आर्मी अ‍ॅक्टनुसार शेतकºयांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

टॅग्स :FarmerशेतकरीWaterपाणीIndian Armyभारतीय जवान