दिगंबर आखाड्यात जागेवरून वाद
By Admin | Updated: August 7, 2015 23:51 IST2015-08-07T23:51:07+5:302015-08-07T23:51:51+5:30
दिगंबर आखाड्यात जागेवरून वाद

दिगंबर आखाड्यात जागेवरून वाद
नाशिक : साधुग्राममध्ये मोठ्या प्रमाणावर साधू-महंत दाखल होत असताना जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शुक्रवारी दुपारी जागेच्या हक्कावरून तेराभाई त्यागी आखाडा आणि दिगंबर आखाड्यात मोठा वाद झाला. दोन्ही आखाड्यांचे साधू-महंत भूखंडावर आमचाच अधिकार असल्याचे सांगत होते.
साधुग्राममध्ये मुख्य रस्त्यालगत सेक्टर-१ बी लेन नंबर २४, प्लॉट क्रमांक २५५ / २५२ मध्ये अखिल भारतीय दिगंबर अनी आखाड्याचे महामंत्री विश्वंभरदास यांच्या शिष्य परिवाराने अन्नछत्र सुरू केले आहे. या ठिकाणी उत्तर भारतातून आलेले काही साधक व भाविक राहत असून, पूजापाठ करतात; परंतु या जागेवर आमचा ताबा असून, भाविकांनी येथून निघून जावे, असे अखिल भारतीय पंच तेराभाई त्यागी आखाड्याचे महंत ब्रिजमोहनदास महाराज आणि त्यांचे शिष्य विष्णुदास, रामसंतोष दास, श्यामसुंदरदास, रामलखनदास आदिंचे म्हणणे आहे. परंतु सदर भाविक बाहेरगावाहून आलेले असल्याने येथून हटणार नाहीत. आम्ही त्यागी आखाड्याला तात्पुरती जागा दिली. त्याच्या आखाडाशेजारी आहे, असे महंत विश्वंभरदास महाराज यांचे म्हणणे आहे. दोघा आखाड्यात वाद होऊन तणाव निर्माण झाला. अखेर काही महंतांच्या मध्यस्थीने हा वाद तूर्तास मिटला आणि येथे एका बाजूला तेराभाई त्यागी यांच्या साधूंनी धुनी पेटविली असून, दुसऱ्या बाजूला दिगंबर आखाड्याचे भाविक बसलेले आहेत. (प्रतिनिधी)