शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

तताणी येथील राखीव  वनक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:43 IST

गेल्या अनेक वर्षांपासून लोकसहभागातून वनविभागाने राखून ठेवलेले तताणी येथील राखीव वनक्षेत्र काही अज्ञात माथेफीरूंनी पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तताणीच्या डोंगरावर वणवा पेटल्याने वन्य जीवांसह शंभर हेक्टरहून अधीक क्षेत्रावरील वनसंपदा जळून खाक झाली. या आगीत लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे.

सटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून लोकसहभागातून वनविभागाने राखून ठेवलेले तताणी येथील राखीव वनक्षेत्र काही अज्ञात माथेफीरूंनी पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तताणीच्या डोंगरावर वणवा पेटल्याने वन्य जीवांसह शंभर हेक्टरहून अधीक क्षेत्रावरील वनसंपदा जळून खाक झाली. या आगीत लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे. बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात दरवर्षी वृक्ष लागवड व जंगल संवर्धनावर शासन कोट्यावधी रु पये खर्च करते. शासनाच्या योजनेमधून तताणी गावच्या ग्रामस्थांच्या सहभागातून चराई ,कुºहाड बंदी करून शेकडो हेक्टर वनक्षेत्र विकसीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या माध्यमातून तताणी गावालगत असलेल्या उत्तरेकडील डोंगरावरील राखीव वनक्षेत्राला गेल्या दोन दिवसांपूर्वी काही अज्ञात माथेफीरूंनी आग लावली असल्याचा दावा वनविभागाने केला आहे. रात्रीच्या सुमारास लावलेल्या या आगीच्या भक्षस्थानी शेकडो एकर वनक्षेत्र सापडले. गावातील वन समितीच्या सदस्यांसह ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून ही आग विझविण्यासाठी दोन दिवस शर्थीचे प्रयत्न केले. अखेर त्यांना ही भीषण आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत शंभरहून अधीक क्षेत्रावरील वनक्षेत्र जळून खाक झाले आहे. साग ,शिसव ,बेहडा ,बांबू आदी डेरेदार वृक्षांसह मोर ,ससे ,घोरपड ,लांडगे ,कोल्हे ,रानमांजर तसेच दुर्मिळ पक्षांना आपला जीव गमवावा लागला. आगीत लाखो रु पयांचे नुकसान झाल्याचा प्राथमीक अंदाज आहे. या भीषण आगीतील नुकसानीचा अद्याप संबंधीत अधिकाºयांनी अद्याप पंचनामा न केल्याने उलटसुलट चर्चा होत आहे.आग लागली की लावली ?बागलाण तालुक्यात दर वर्षी वृक्ष लागवड व जंगल संवर्धनासाठी शासन कोट्यावधी रु पये खर्च करत आहे. असे राखीव वनक्षेत्र लोकसहभागातून ठिकठिकाणी विकसीत केले जाते.परंतु चार पाच वर्ष राखून डेरेदार वृक्ष झाल्यांनतर आग लागण्याचे प्रकार दरवर्षी घडतात .यंदा गेल्या पंधरा दिवसांपूर्वी दसाणा येथील राखीव वन क्षेत्राला आग लागून लाखो रु पयांचे नुकसान झाल्याची घटना ताजी असतांना तताणी या राखीव वनक्षेत्राला आग लागली आहे.मात्रआग लावली की लागली याबाबत संबंधीत विभागाच्या अधिकाºयांना अद्याप शोध लागला नाही. हा संशोधनाचा भाग असला तरी या परिसरात कागदोपत्री वृक्ष लागवड लपविण्यासाठी आग लावली की नव्याने त्याठीकाणी वृक्ष लागवड करण्यासाठी आग लावली गेली. याबाबत सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधान आले आहे.

टॅग्स :Fairजत्राforestजंगल