शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

तताणी येथील राखीव  वनक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:43 IST

गेल्या अनेक वर्षांपासून लोकसहभागातून वनविभागाने राखून ठेवलेले तताणी येथील राखीव वनक्षेत्र काही अज्ञात माथेफीरूंनी पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तताणीच्या डोंगरावर वणवा पेटल्याने वन्य जीवांसह शंभर हेक्टरहून अधीक क्षेत्रावरील वनसंपदा जळून खाक झाली. या आगीत लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे.

सटाणा : गेल्या अनेक वर्षांपासून लोकसहभागातून वनविभागाने राखून ठेवलेले तताणी येथील राखीव वनक्षेत्र काही अज्ञात माथेफीरूंनी पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तताणीच्या डोंगरावर वणवा पेटल्याने वन्य जीवांसह शंभर हेक्टरहून अधीक क्षेत्रावरील वनसंपदा जळून खाक झाली. या आगीत लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे. बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात दरवर्षी वृक्ष लागवड व जंगल संवर्धनावर शासन कोट्यावधी रु पये खर्च करते. शासनाच्या योजनेमधून तताणी गावच्या ग्रामस्थांच्या सहभागातून चराई ,कुºहाड बंदी करून शेकडो हेक्टर वनक्षेत्र विकसीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या माध्यमातून तताणी गावालगत असलेल्या उत्तरेकडील डोंगरावरील राखीव वनक्षेत्राला गेल्या दोन दिवसांपूर्वी काही अज्ञात माथेफीरूंनी आग लावली असल्याचा दावा वनविभागाने केला आहे. रात्रीच्या सुमारास लावलेल्या या आगीच्या भक्षस्थानी शेकडो एकर वनक्षेत्र सापडले. गावातील वन समितीच्या सदस्यांसह ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून ही आग विझविण्यासाठी दोन दिवस शर्थीचे प्रयत्न केले. अखेर त्यांना ही भीषण आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत शंभरहून अधीक क्षेत्रावरील वनक्षेत्र जळून खाक झाले आहे. साग ,शिसव ,बेहडा ,बांबू आदी डेरेदार वृक्षांसह मोर ,ससे ,घोरपड ,लांडगे ,कोल्हे ,रानमांजर तसेच दुर्मिळ पक्षांना आपला जीव गमवावा लागला. आगीत लाखो रु पयांचे नुकसान झाल्याचा प्राथमीक अंदाज आहे. या भीषण आगीतील नुकसानीचा अद्याप संबंधीत अधिकाºयांनी अद्याप पंचनामा न केल्याने उलटसुलट चर्चा होत आहे.आग लागली की लावली ?बागलाण तालुक्यात दर वर्षी वृक्ष लागवड व जंगल संवर्धनासाठी शासन कोट्यावधी रु पये खर्च करत आहे. असे राखीव वनक्षेत्र लोकसहभागातून ठिकठिकाणी विकसीत केले जाते.परंतु चार पाच वर्ष राखून डेरेदार वृक्ष झाल्यांनतर आग लागण्याचे प्रकार दरवर्षी घडतात .यंदा गेल्या पंधरा दिवसांपूर्वी दसाणा येथील राखीव वन क्षेत्राला आग लागून लाखो रु पयांचे नुकसान झाल्याची घटना ताजी असतांना तताणी या राखीव वनक्षेत्राला आग लागली आहे.मात्रआग लावली की लागली याबाबत संबंधीत विभागाच्या अधिकाºयांना अद्याप शोध लागला नाही. हा संशोधनाचा भाग असला तरी या परिसरात कागदोपत्री वृक्ष लागवड लपविण्यासाठी आग लावली की नव्याने त्याठीकाणी वृक्ष लागवड करण्यासाठी आग लावली गेली. याबाबत सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधान आले आहे.

टॅग्स :Fairजत्राforestजंगल