शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यातील आरम नदीपात्रही होणार स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 13:44 IST

सटाणा:निसर्गाशी संबधित पंचतत्वावर आधारित उपाययोजना करुन शाश्वत निसर्गपूरक जीवनपध्दती अवलंबिण्यासाठी शहरात पालिका प्रशासनातर्फे बुधवारपासून माझी वसुंधरा या अभियानास प्रारंभ ...

सटाणा:निसर्गाशी संबधित पंचतत्वावर आधारित उपाययोजना करुन शाश्वत निसर्गपूरक जीवनपध्दती अवलंबिण्यासाठी शहरात पालिका प्रशासनातर्फे बुधवारपासून माझी वसुंधरा या अभियानास प्रारंभ करण्यात आला. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पालिका क्षेत्रात " माझी वसुंधराअभियान राबविण्यात येत आहे . अभियानाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. २३) शहरातील मोकळया जागा , उद्याने स्वच्छ करण्याकरिता विशेष मोहिम हाती घेण्यात आलेली आहे .  निमित्ताने नदीपात्र स्वच्छ करण्याची देखील मोहिम हाती घेण्यात आली असून यात जास्तीत लोकसहभाग घ्यावा असे आवाहन प्रभारी नगराध्यक्ष राकेश खैरनार यांनी केले आहे . • याप्रसंगी प्रशासन अधिकारी विजय देवरे , स्वच्छता निरिक्षक .माणिक वानखेडे , स्थापत्य अभियंता चेतन विसपुते , ग्रंथपाल ज्ञानेश्वर खैरनार , वाहन विभाग प्रमुख .संदिप पवार , सहा.स्वच्छता निरिक्षक किशोर सोनवणे , दिपक सोनवणे , प्रमोद गहिवड , दिनेश कचवे , धनंजय सोनवणे , तसेच उद्यान विभागातील व स्वच्छता विभागातील कर्मचारी उपस्थित होते .---------------------काय आहे माझी वसुंधराअभियानस्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पृथ्वी , वायु , जल , अग्नि आणि आकाश या निर्सगाशी संबधीत पंचतत्वावर आधारीत " माझी वसुंधरा अभियान " दिनांक २ ऑक्टोबर , २०२० ते ३१ मार्च , २०२१ या कालावधीत राबविण्याबाबत निर्देश दिलेले आहेत . या अभियानाचा उद्देश निसर्गाशी असलेली कटिबध्दता निश्चित करण्यासाठी, निर्सगाशी संबधित पृथ्वी , वायु , जल , अग्नि आणि आकाश या पंचतत्वावर पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग कार्य करीत आहे . पृथ्वी तत्वाशी संबधित वनीकरण , वनसंवर्धन , घनकचरा व्यवस्थापन , सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीकडे धुपीकरण इत्यादी बाबींवर कार्य करणे. वायू तत्वाचे संरक्षण करता यावे म्हणून हवेच्या गुणवत्तेसाठी वायूप्रदुषण कमी करुन हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे. निर्सगाच्या या पंचतत्वासोबत जीवन पध्दती अंगिकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही आणि जैव विविधतेचेही अस्तित्व राहणार नाही . म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना सोबत घेवून हे अभियान राबविण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक