पिक विमा भरण्याचे कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 23:29 IST2020-07-27T21:04:43+5:302020-07-27T23:29:32+5:30

मानोरी : नैसर्गिक संकटात पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षक पीक विमा म्हणून सर्वत्र प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू असून शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा पीक विमा काढण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम तारीख असून जास्तीत जास्त शेतकºयांनी पीक विमा काढण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Appeal of agriculture officers to pay crop insurance | पिक विमा भरण्याचे कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

पिक विमा भरण्याचे कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

ठळक मुद्देपेरणीसाठी झालेला खर्च वाया जाऊ नये यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरी : नैसर्गिक संकटात पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षक पीक विमा म्हणून सर्वत्र प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू असून शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा पीक विमा काढण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम तारीख असून जास्तीत जास्त शेतकºयांनी पीक विमा काढण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा सर्वत्र शेतकºयांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना अर्ज भरण्याकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले आहे. यंदा मोठ्या प्रमाणावर मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव असताना दुसरीकडे सोयाबीनच्या बियाणशंमध्ये दोष आढळल्याने दुबार पेरणी करूनही अनेक ठिकाणी बियाणे उगवले नाही तर काही ठिकाणी तुरळक बियाणे उगवलेले आहे. त्यामुळे पेरणीसाठी झालेला खर्च वाया जाऊ नये यासाठी शेतकºयांनी तात्काळ प्रधानमंत्री पीक विम्याचा अर्ज सीएससी सेंटरवर भरून घेण्याचे आवाहन कृषी सहायक रमेश वाडेकर यांनी केले आहे.

Web Title: Appeal of agriculture officers to pay crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.