शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘अंजनेरी’त हेलिकॉप्टरची घरघर टळली; पर्यावरणप्रेमींमध्ये समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 21:10 IST

यापुढेही हेलिकॉप्टरच्या कुठल्याही प्रयोगाला अंजनेरी राखीव वनक्षेत्र ते त्र्यंबकेश्वरच्या ब्रम्हगिरीपर्यंत परवानगी न देता कायमस्वरुपी ‘रेड सिग्नल’ द्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

ठळक मुद्देगिधाड या दुर्मीळ पक्ष्यासह अन्य प्रजातींना धोका निर्माण होणार होता. बियांचे गोळे तयार करून टाकण्याची मोहीम आखली गेली होती

नाशिक : त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील संरक्षित राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित केलेल्या अंजनेरीसह ब्रह्मगिरी परिसरात हेलिकॉप्टरद्वारे विविध प्रजातींच्या बियांचे गोळे तयार करून टाकण्याची मोहीम आखली गेली होती. यासाठी काही राजकीय, शैक्षणिक, सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला होता; मात्र यामुळे येथील वनक्षेत्रातील नैसर्गिक अधिवासात वास्तव्य करणाऱ्या सूची क्रमांक एकमधील गिधाड या दुर्मीळ पक्ष्यासह अन्य प्रजातींना धोका निर्माण होणार होता. यामुळे वनविभागनाशिक पश्चिम व जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. हेलिकॉप्टरच्या घरघरीचे संकट टळले असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

यापुढेही हेलिकॉप्टरच्या कुठल्याही प्रयोगाला अंजनेरी राखीव वनक्षेत्र ते त्र्यंबकेश्वरच्या ब्रम्हगिरीपर्यंत परवानगी न देता कायमस्वरुपी ‘रेड सिग्नल’ द्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. बीजारोपणाचा जरी प्रथमदर्शनी हेतू दिसत असला तरी त्र्यंबकेश्वर रस्त्यासह शहरातील विविध भागांमध्ये चक्क ‘त्र्यंबके श्वरमध्ये प्रथमच... हेलिकॉप्टर सफरीचा आनंद लुटा...’ अशा व्यावसायिक जाहिरातीचे फलकही संबंधितांच्या नावाने झळकले होते. याबाबत उपवनसंरक्षक टी.ब्यूला एलिल मती यांनी तत्काळ जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेऊन संरक्षित राखीव वनक्षेत्र व तेथील वन्यजिवांना उद्भवणारा धोका याबाबत शनिवारी (दि.१९) सविस्तर चर्चा केली. वनविभागासह जिल्हा प्रशासनानेही तडकाफडकी परवानगी नाकारली. यामुळे शहरातील वन्यजीवप्रेमींसह पर्यावरणप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :anjenriअंजनेरीNashikनाशिकforest departmentवनविभागwildlifeवन्यजीव