शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

कांदा निर्यात प्रोत्साहन योजना बंद झाल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 16:18 IST

शेतकऱ्यांमध्ये असंतोष : फेरविचार करण्याची मागणी

ठळक मुद्देपंतप्रधान पदी नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर १२ दिवसातच कांदा उत्पादक शेतक-यांना झटका

लासलगाव : कांदा घसरणीला ब्रेक लावण्यासाठी केंद्र सरकारने २८ डिसेंबर २०१८ मध्ये कांद्यावरील निर्यात प्रोत्साहन योजना ५ वरु न १० टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. आता सदर प्रोत्साहन योजनाच बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर निघत आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये कांद्याच्या सरासरी दरामध्ये दोनशे रु पयांची वाढ झालेली असतानाच सरकारने ही योजनाच बंद करुन टाकल्याने शेतक-यांचे नुकसान होणार आहे.लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतक-यांची नाराजी दूर करण्यासाठी कांदा निर्यातीला प्रोत्साहन दिले होते. याचा परिणाम म्हणून देशातून समाधानकारक कांद्याची निर्यात सुरु होती. माजी केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभु यांनी २८ डिसेंबरला अर्थ मंत्रालयाकडून १७९.१६ कोटी रु पयांची मागणी केली होती. अर्थ मंत्रालयाने एमईआयएसच्या अंतर्गत निर्यात प्रोत्साहन ५ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर करावा अशी मागणी केली होती आणि त्यास मंजुरी देखील मिळाली होती. मात्र निवडणुकीनंतर ३० मे रोजी पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर १२ दिवसातच कांदा उत्पादक शेतक-यांना झटका देत विदेश व्यापार विभागाचे संचालक आलोक चतुर्वेदी यांनी सदरची योजना थांबवण्यात आल्याची माहिती दिली. हि वार्ता लासलगाव बाजार समितीत येताच शेतक-यांसह व्यापारी आणि बाजार समितीने या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारने शेतकरी हितासाठी फेरविचार करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, बुधवारी (दि .१२) लासलगांव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याची सुमारे १७ हजार क्विंटल आवक आली असून मंगळवारच्या सरासरी बाजार भावाच्या तुलनेत १९० रु पयांची घसरण झाली गुरुवारी (दि.१३) किमान उन्हाळ कांदा भाव ७०० ते १४०५ रुपये व सरासरी १३२० रूपये होते.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा