शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कांदा निर्यात प्रोत्साहन योजना बंद झाल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 16:18 IST

शेतकऱ्यांमध्ये असंतोष : फेरविचार करण्याची मागणी

ठळक मुद्देपंतप्रधान पदी नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर १२ दिवसातच कांदा उत्पादक शेतक-यांना झटका

लासलगाव : कांदा घसरणीला ब्रेक लावण्यासाठी केंद्र सरकारने २८ डिसेंबर २०१८ मध्ये कांद्यावरील निर्यात प्रोत्साहन योजना ५ वरु न १० टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. आता सदर प्रोत्साहन योजनाच बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर निघत आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये कांद्याच्या सरासरी दरामध्ये दोनशे रु पयांची वाढ झालेली असतानाच सरकारने ही योजनाच बंद करुन टाकल्याने शेतक-यांचे नुकसान होणार आहे.लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतक-यांची नाराजी दूर करण्यासाठी कांदा निर्यातीला प्रोत्साहन दिले होते. याचा परिणाम म्हणून देशातून समाधानकारक कांद्याची निर्यात सुरु होती. माजी केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभु यांनी २८ डिसेंबरला अर्थ मंत्रालयाकडून १७९.१६ कोटी रु पयांची मागणी केली होती. अर्थ मंत्रालयाने एमईआयएसच्या अंतर्गत निर्यात प्रोत्साहन ५ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर करावा अशी मागणी केली होती आणि त्यास मंजुरी देखील मिळाली होती. मात्र निवडणुकीनंतर ३० मे रोजी पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर १२ दिवसातच कांदा उत्पादक शेतक-यांना झटका देत विदेश व्यापार विभागाचे संचालक आलोक चतुर्वेदी यांनी सदरची योजना थांबवण्यात आल्याची माहिती दिली. हि वार्ता लासलगाव बाजार समितीत येताच शेतक-यांसह व्यापारी आणि बाजार समितीने या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारने शेतकरी हितासाठी फेरविचार करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, बुधवारी (दि .१२) लासलगांव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याची सुमारे १७ हजार क्विंटल आवक आली असून मंगळवारच्या सरासरी बाजार भावाच्या तुलनेत १९० रु पयांची घसरण झाली गुरुवारी (दि.१३) किमान उन्हाळ कांदा भाव ७०० ते १४०५ रुपये व सरासरी १३२० रूपये होते.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा