अन् पहिल्याच दिवशी चुकला ‘ट्रॅक’...
By Admin | Updated: June 11, 2014 00:39 IST2014-06-11T00:12:34+5:302014-06-11T00:39:09+5:30
अन् पहिल्याच दिवशी चुकला ‘ट्रॅक’...

अन् पहिल्याच दिवशी चुकला ‘ट्रॅक’...
नरेश उमेदवारांनी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला असला पोलीस प्रशासनाकडून सदरचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. हाळणोर
नाशिक
पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांची शारीरिक व मैदानी चाचणी घेतली जात असताना, त्याचाच एक भाग असलेल्या १०० मीटर धावण्याच्या प्रकारात भरतीच्या पहिल्याच दिवशी धावण्याचा ट्रॅकच चुकल्याचा प्रकार घडला आहे. १०० मीटरऐवजी तो ८० मीटरच आखला गेल्याने पहिल्या दिवसाच्या उमेदवारांनी भरघोस गुण प्राप्त केले. त्यामुळे नंतर चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांच्या गुणांमध्ये मोठी तफावत पडणार असून, त्याचा परिणाम गुणवत्ता यादीवर होण्याची शक्यता आहे. याबाबत काही
राज्यभर पोलीस भरतीची प्रक्रिया गेल्या ६ तारखेपासून सुरू झाली आहे. या अंतर्गतच नाशिकच्या कवायत मैदानावर नाशिक शहरसाठी पोलीस भरती सुरू असून, रोज हजार ते बाराशे उमेदवारांची शारीरिक व मैदानी चाचणी घेतली जात आहे. एका उमेदवाराला सदरची चाचणी पार करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागतो. यात मिळणाऱ्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी जाहीर केली जाते आणि जे गुणवत्ता यादीत आहेत त्यांना लेखी परीक्षेला पाचारण केले जाणार आहे.
दरम्यान, भरतीच्या पहिल्या दिवशी शारीरिक चाचणी झाल्यानंतर मैदानी चाचणीमध्ये १०० मीटर धावण्याचा प्रकार आहे. मात्र भरतीच्या पहिल्याच दिवशी सदरचा ट्रॅक चुकला. जेव्हा उमेदवारांना या ट्रॅकवरून धावण्यास सांगण्यात आले तेव्हा अपेक्षेपेक्षा अनेकांनी अत्यंत कमी वेळेत हे अंतर पार केले. सदरची बाब त्याचवेळी संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या लक्षात आली नाही. मात्र उमेदवार निघून गेल्यानंतर गुणांची आकडेवारी व वेळेची नोंद पाहत असताना आंतरराष्ट्रीय दर्जाचेच धावपटू उतरल्याची शंका यावी, अशी वेळ (टायमिंग) नोंदविल्याचे निदर्शनास आले. संबंधित पोलीस अधिकाऱ्याने तत्काळ धावण्याचा ट्रॅक मोजला असता तो १०० ऐवजी ८० मीटर आखण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी तो ट्रॅक पुन्हा १०० मीटर केला आणि दुसऱ्या दिवशी आलेल्या उमेदवारांची त्यावर चाचणी झाली.
धावण्याचा ट्रॅक वाढविण्यात आल्याची बाब पहिल्या दिवशी चाचणी दिलेल्या उमेदवारांच्या लक्षात आली आणि ही चर्चा दुसऱ्या दिवसाच्या उमेदवारांच्या कानोकानी माहीत झाल्यानंतर त्यांनी याबाबत आवाज उठविण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांकडून त्यांच्यावर दबाव आणण्यात आला. तरीही काहींनी संबंधित घटनेची लेखी तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांची तक्रारही घेण्यात आलेली नाही. सदरच्या घटनेमुळे पहिल्या दिवसाचे व नंतरच्या उमेदवारांच्या मैदानी गुणांमध्ये मोठी तफावत पडणार आहे. अर्थातच त्याचा थेट फायदा पहिल्या दिवसाच्या उमेदवारांना होणार आहे. मात्र पोलीस प्रशासनाकडून सदर घटनेबाबत अत्यंत गुप्तता पाळली जात आहे.