शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

...अन् गावकऱ्यांचे डोळे पाणावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:51 IST

बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदर्श गाव किकवारीचे प्रणेते व लोकमत सरपंच पुरस्काराचे यंदाचे मानकरी केदा काकुळते यांच्या पत्नी धनूबाई केदा काकुळते यांचा तसेच गावातील आजी, मुलगी व नातीचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण पंचक्र ोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तळवाडे दिगर : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदर्श गाव किकवारीचे प्रणेते व लोकमत सरपंच पुरस्काराचे यंदाचे मानकरी केदा काकुळते यांच्या पत्नी धनूबाई केदा काकुळते यांचा तसेच गावातील आजी, मुलगी व नातीचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण पंचक्र ोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गावात एकाच वेळी चार अंत्ययात्रा निघाल्यामुळे संपूर्ण गावासह उपस्थितांचे डोळे पाणावले. सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान चारही मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.  किकवारी खुर्द येथील कैलास महादू जगताप यांच्या मुलीच्या विवाहासाठी नाशिक येथे जात असताना शिरवाडे वणी जवळ क्रुझरचे वाहनाचे टायर फुटून अपघात झाला. या अपघातात किकवारी खुर्द येथील आदर्श गावाचे प्रणेते केदा काकुळते यांच्या पत्नी धनूबाई केदा काकुळते (६०), सरस्वतीबाई नथू जगताप (५५), कृष्णाबाई बाळासाहेब शिंदे (६२), तेजेश्री साहेबराव शिंदे (१८), तर मुजवाड येथील शोभा संतोष पगारे (३८), उर्वशी विनायक मोरे (१२), डांगसौंदाणे येथील रत्ना राजेंद्र गांगुर्डे (४०) आणि कळवण येथील चालक अशोक पोपट गांगुर्डे (५७) यांचा मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त कळताच किकवारी गावावर शोककळा पसरली. एकूण आठ जणांच्या मृत्यूमुळे बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यासाठी आजचा शनिवार काळा शनिवार ठरला. मुंबई-आग्रा महामार्गावर शिरवाडे वणी जवळ सकाळी ११ वाजेदरम्यान क्रुझरचे टायर फुटल्याने अपघात होऊन बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्द, मुंजवाड, डांगसौंदाणे व कळवण येथील आठ जणांचा मृत्यू झाला. सायंकाळी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक विविध क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.हलाखीच्या परिस्थितीत उभा केला संसारडांगसौदाणे : शिरवाडे वणी जवळील अपघातात येथील एका गरीब शेतकरी कुटुंबातील महिला रत्नाबाई राजेंद्र गांगुर्डे यांच्या मृत्यूची बातमी गावात येऊन धडकताच गावात सर्वत्र शोककळा पसरली. गावातील व्यापारी वर्गाने आपापली दुकाने बंद करून राजेंद्र गांगुर्डे यांच्या घराकडे धाव घेतली. पती राजेंद्र गांगुर्डे यांच्या खांद्याला खांदा लावून रत्नाबाई गांगुर्डे यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत कष्टाने संसाराचा गाडा ओढून आपल्या दोन मुलींचे थाटामाटात लग्न लावून दिले. हलाखीच्या परिस्थितीमध्येही आपल्या दोघां मुलांचे उच्चशिक्षण त्या पूर्ण करीत होत्या. हलाखीच्या परिस्थितीत अतोनात कष्ट घेऊन आपल्या संसाराचा गाडा ओढून संसाराचे नंदनवन फुलविणाºया रत्नाबाई गांगुर्डे यांच्या घरी ग्रामस्थांनी मोठी गर्दी करून पती व मुलांना धीर दिला. रत्नाबाई गांगुर्डे यांच्यावर येथील आरम नदीतीरी सांयकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पती, दोन मुली, दोन मुले, सासू, सासरे असा परिवार आहे.

टॅग्स :Accidentअपघात