शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
3
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
4
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
5
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
6
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
7
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
8
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
9
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
10
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
11
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
12
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
13
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
14
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
15
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
16
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
17
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
18
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
19
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
20
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न

...अन् गावकऱ्यांचे डोळे पाणावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:51 IST

बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदर्श गाव किकवारीचे प्रणेते व लोकमत सरपंच पुरस्काराचे यंदाचे मानकरी केदा काकुळते यांच्या पत्नी धनूबाई केदा काकुळते यांचा तसेच गावातील आजी, मुलगी व नातीचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण पंचक्र ोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तळवाडे दिगर : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदर्श गाव किकवारीचे प्रणेते व लोकमत सरपंच पुरस्काराचे यंदाचे मानकरी केदा काकुळते यांच्या पत्नी धनूबाई केदा काकुळते यांचा तसेच गावातील आजी, मुलगी व नातीचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण पंचक्र ोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गावात एकाच वेळी चार अंत्ययात्रा निघाल्यामुळे संपूर्ण गावासह उपस्थितांचे डोळे पाणावले. सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान चारही मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.  किकवारी खुर्द येथील कैलास महादू जगताप यांच्या मुलीच्या विवाहासाठी नाशिक येथे जात असताना शिरवाडे वणी जवळ क्रुझरचे वाहनाचे टायर फुटून अपघात झाला. या अपघातात किकवारी खुर्द येथील आदर्श गावाचे प्रणेते केदा काकुळते यांच्या पत्नी धनूबाई केदा काकुळते (६०), सरस्वतीबाई नथू जगताप (५५), कृष्णाबाई बाळासाहेब शिंदे (६२), तेजेश्री साहेबराव शिंदे (१८), तर मुजवाड येथील शोभा संतोष पगारे (३८), उर्वशी विनायक मोरे (१२), डांगसौंदाणे येथील रत्ना राजेंद्र गांगुर्डे (४०) आणि कळवण येथील चालक अशोक पोपट गांगुर्डे (५७) यांचा मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त कळताच किकवारी गावावर शोककळा पसरली. एकूण आठ जणांच्या मृत्यूमुळे बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यासाठी आजचा शनिवार काळा शनिवार ठरला. मुंबई-आग्रा महामार्गावर शिरवाडे वणी जवळ सकाळी ११ वाजेदरम्यान क्रुझरचे टायर फुटल्याने अपघात होऊन बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्द, मुंजवाड, डांगसौंदाणे व कळवण येथील आठ जणांचा मृत्यू झाला. सायंकाळी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक विविध क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.हलाखीच्या परिस्थितीत उभा केला संसारडांगसौदाणे : शिरवाडे वणी जवळील अपघातात येथील एका गरीब शेतकरी कुटुंबातील महिला रत्नाबाई राजेंद्र गांगुर्डे यांच्या मृत्यूची बातमी गावात येऊन धडकताच गावात सर्वत्र शोककळा पसरली. गावातील व्यापारी वर्गाने आपापली दुकाने बंद करून राजेंद्र गांगुर्डे यांच्या घराकडे धाव घेतली. पती राजेंद्र गांगुर्डे यांच्या खांद्याला खांदा लावून रत्नाबाई गांगुर्डे यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत कष्टाने संसाराचा गाडा ओढून आपल्या दोन मुलींचे थाटामाटात लग्न लावून दिले. हलाखीच्या परिस्थितीमध्येही आपल्या दोघां मुलांचे उच्चशिक्षण त्या पूर्ण करीत होत्या. हलाखीच्या परिस्थितीत अतोनात कष्ट घेऊन आपल्या संसाराचा गाडा ओढून संसाराचे नंदनवन फुलविणाºया रत्नाबाई गांगुर्डे यांच्या घरी ग्रामस्थांनी मोठी गर्दी करून पती व मुलांना धीर दिला. रत्नाबाई गांगुर्डे यांच्यावर येथील आरम नदीतीरी सांयकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पती, दोन मुली, दोन मुले, सासू, सासरे असा परिवार आहे.

टॅग्स :Accidentअपघात