शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

...अन् गावकऱ्यांचे डोळे पाणावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:51 IST

बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदर्श गाव किकवारीचे प्रणेते व लोकमत सरपंच पुरस्काराचे यंदाचे मानकरी केदा काकुळते यांच्या पत्नी धनूबाई केदा काकुळते यांचा तसेच गावातील आजी, मुलगी व नातीचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण पंचक्र ोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तळवाडे दिगर : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदर्श गाव किकवारीचे प्रणेते व लोकमत सरपंच पुरस्काराचे यंदाचे मानकरी केदा काकुळते यांच्या पत्नी धनूबाई केदा काकुळते यांचा तसेच गावातील आजी, मुलगी व नातीचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण पंचक्र ोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गावात एकाच वेळी चार अंत्ययात्रा निघाल्यामुळे संपूर्ण गावासह उपस्थितांचे डोळे पाणावले. सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान चारही मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.  किकवारी खुर्द येथील कैलास महादू जगताप यांच्या मुलीच्या विवाहासाठी नाशिक येथे जात असताना शिरवाडे वणी जवळ क्रुझरचे वाहनाचे टायर फुटून अपघात झाला. या अपघातात किकवारी खुर्द येथील आदर्श गावाचे प्रणेते केदा काकुळते यांच्या पत्नी धनूबाई केदा काकुळते (६०), सरस्वतीबाई नथू जगताप (५५), कृष्णाबाई बाळासाहेब शिंदे (६२), तेजेश्री साहेबराव शिंदे (१८), तर मुजवाड येथील शोभा संतोष पगारे (३८), उर्वशी विनायक मोरे (१२), डांगसौंदाणे येथील रत्ना राजेंद्र गांगुर्डे (४०) आणि कळवण येथील चालक अशोक पोपट गांगुर्डे (५७) यांचा मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त कळताच किकवारी गावावर शोककळा पसरली. एकूण आठ जणांच्या मृत्यूमुळे बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यासाठी आजचा शनिवार काळा शनिवार ठरला. मुंबई-आग्रा महामार्गावर शिरवाडे वणी जवळ सकाळी ११ वाजेदरम्यान क्रुझरचे टायर फुटल्याने अपघात होऊन बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्द, मुंजवाड, डांगसौंदाणे व कळवण येथील आठ जणांचा मृत्यू झाला. सायंकाळी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक विविध क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.हलाखीच्या परिस्थितीत उभा केला संसारडांगसौदाणे : शिरवाडे वणी जवळील अपघातात येथील एका गरीब शेतकरी कुटुंबातील महिला रत्नाबाई राजेंद्र गांगुर्डे यांच्या मृत्यूची बातमी गावात येऊन धडकताच गावात सर्वत्र शोककळा पसरली. गावातील व्यापारी वर्गाने आपापली दुकाने बंद करून राजेंद्र गांगुर्डे यांच्या घराकडे धाव घेतली. पती राजेंद्र गांगुर्डे यांच्या खांद्याला खांदा लावून रत्नाबाई गांगुर्डे यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत कष्टाने संसाराचा गाडा ओढून आपल्या दोन मुलींचे थाटामाटात लग्न लावून दिले. हलाखीच्या परिस्थितीमध्येही आपल्या दोघां मुलांचे उच्चशिक्षण त्या पूर्ण करीत होत्या. हलाखीच्या परिस्थितीत अतोनात कष्ट घेऊन आपल्या संसाराचा गाडा ओढून संसाराचे नंदनवन फुलविणाºया रत्नाबाई गांगुर्डे यांच्या घरी ग्रामस्थांनी मोठी गर्दी करून पती व मुलांना धीर दिला. रत्नाबाई गांगुर्डे यांच्यावर येथील आरम नदीतीरी सांयकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पती, दोन मुली, दोन मुले, सासू, सासरे असा परिवार आहे.

टॅग्स :Accidentअपघात