शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

...अन् नववधू झाली गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:52 IST

नांदगाव : हुंडा घेऊन चांगले लग्न लावून देण्याची बोली करण्याचे दिवस इतिहासजमा होत चालले आहेत. याउलट वयाने वाढत असलेल्या मुलासाठी हवी तेवढी रक्कम देतो; पण नवरी मिळवून दे अशी याचना करण्याची वेळ कुटुंबप्रमुखांवर आली आहे. या परीस्थितीचा गैरफायदा घेणारे महाभागही समाजात उत्पन्न झाले आहेत. आगतिक नवरा, कुणा अनोळखी मुलीबरोबर लग्न करण्यासाठी मजबूर होतो आणि ‘ती लाडाची नवराई’ काही दिवसातच पूर्व नियोजित कटानुसार पळून जाते. याचे प्रत्यंतर देणारी घटना नांदगाव तालुक्यातील पोखरी येथे घडली. अशा प्रकारे काम करणारी ही एक टोळी असावी असा पोलिसांचा कयास आहे.

ठळक मुद्देअशा प्रकारे काम करणारी ही एक टोळी असावी असा पोलिसांचा कयास

नांदगाव : हुंडा घेऊन चांगले लग्न लावून देण्याची बोली करण्याचे दिवस इतिहासजमा होत चालले आहेत. याउलट वयाने वाढत असलेल्या मुलासाठी हवी तेवढी रक्कम देतो; पण नवरी मिळवून दे अशी याचना करण्याची वेळ कुटुंबप्रमुखांवर आली आहे. या परीस्थितीचा गैरफायदा घेणारे महाभागही समाजात उत्पन्न झाले आहेत. आगतिक नवरा, कुणा अनोळखी मुलीबरोबर लग्न करण्यासाठी मजबूर होतो आणि ‘ती लाडाची नवराई’ काही दिवसातच पूर्व नियोजित कटानुसार पळून जाते. याचे प्रत्यंतर देणारी घटना नांदगाव तालुक्यातील पोखरी येथे घडली. अशा प्रकारे काम करणारी ही एक टोळी असावी असा पोलिसांचा कयास आहे.पोखरीचे शेतकरी बाबुराव देवरे त्यांचा मुलगा भगवान याचे साठी पाच वर्षांपासून वधूच्या शोधात होते. पण मुलगी मिळत नव्हती. याच गावातला सोमनाथ भुरक (४५) याने जालना, परभणीकडची मुलगी सुचवीली. मनमाड रेल्वे स्टेशनला दि. ८ एप्रिल २०१८ रोजी मुलगी बघण्याचा कार्यक्र म झाला. अश्विनी या मुलीबरोबर अनिल, मुलीची मावशी व छाया नामे बहीण आले होते. मुलगी पसंत नाही पडली तर मनमाड येथूनच दोन्ही पार्ट्या परत जातील असे ठरले होते.पसंती झाली तर मोठी घसघशीत रक्कम मध्यस्थांना द्यावयाचा सौदा झाला होता. पसंती झाली. लगेच विवाह सोहळा आटोपून टाकू म्हणून संध्याकाळी वºहा पोखरीला पोहोचले. दुसऱ्या दिवशी थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. अश्विनीच्या अंगावर सोनेचांदीचे ६००० रु. किमतीचे दागिने बाबुराव यांनी घातले. त्यानंतर अनिलकाका व मावशीबाई यांना ठरल्याप्रमाणे १,२०,००० रु देण्यात आले. मध्यस्थी सोमनाथ भूरक, बळीराम चव्हाण, बाबुराव देवरे, भाऊसाहेब गागरे यांच्या साक्षीने रक्कम देण्यात आली.दोन दिवसांनी मुलीचा मेव्हणा संजय मोरे नव्या कोºया दुचाकीवरून तिला घेऊन जाण्यासाठी आला. त्याचे यथोचित आदरातिथ्य करून मुलीला त्याच्या बरोबर माहेरी पाठविण्यात आले. जातांना दोन दिवसांनी तिला घेऊनजा असे सांगुन दोघे गेले. औरंगाबादचा पत्ता दिला. आंबेडकर नगर, गल्ली न.४, मुकुंदवाडी. इथपर्यंत सर्व काही सुरळीत होते. ठरल्याप्रमाणे अश्विनीला आणण्यासाठी मुलाचे वडील गेले. पण पत्ता चुकीचा निघाला. गल्ली न. ४ त्या भागात नाहीच. दिलेल्या मोबाईल नंबरवर वारंवार फोन करूनही केवळ आश्वासनेच मिळाली. उलट अनिल काकाने बदल्यात दुसरीच मुलगी आणून देतो असे सांगितले. अश्विनी आता तर फोन घेतच नाही. चुकून लागला तर ती मी इंदोरला असल्याचे सांगते. गावातील भगीरथ जेजुरकर व मनमाडचे स्नेही अमोल कुलकर्णी, शैलेस पठाडे यांनी गोड बोलून दुसरा मुलगा आहे अशी बतावणी केली आणि मनमाडच्या रेल्वे स्टेशनवर आलेल्या सुनीता पाटोळे व तिच्या बरोबर असलेल्या महिलेस पकडून आधी मनमाड पोलीस स्टेशनमध्ये व त्यानंतर नांदगाव पोलिस स्टेशनला आणण्यात आले. अधिक तपास पोलीस निरीक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाNashikनाशिक