शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

वºहाड आलंय प्रचाराला..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 01:25 IST

प्रचारासाठी एक आठवड्यापेक्षाही कमी कालावधी उरला असल्याने सुमारे चार लाखांवर मतदारसंख्या असलेल्या विधानसभा मतदारसंघात कुठे कुठे फिरायचे बाकी आहे, कोणत्या प्रभागात कधी रॅली काढायची, याबाबतच्या नियोजनाची चिंता उमेदवारांना पडली आहे. मतदारांना आपलेसे करण्यासाठी त्या भागातील उमेदवारांनी आपल्या संबंधातील नातेवाइकांनादेखील प्रचारासाठी नाशिकमध्ये पाचारण केले आहे.

ठळक मुद्देरणधुमाळी : खान्देशसह अन्य अनेक भागातून कुटुंब प्रचारासाठी नाशकात

नाशिक : प्रचारासाठी एक आठवड्यापेक्षाही कमी कालावधी उरला असल्याने सुमारे चार लाखांवर मतदारसंख्या असलेल्या विधानसभा मतदारसंघात कुठे कुठे फिरायचे बाकी आहे, कोणत्या प्रभागात कधी रॅली काढायची, याबाबतच्या नियोजनाची चिंता उमेदवारांना पडली आहे. मतदारांना आपलेसे करण्यासाठी त्या भागातील उमेदवारांनी आपल्या संबंधातील नातेवाइकांनादेखील प्रचारासाठी नाशिकमध्ये पाचारण केले आहे.महानगरातील विधानसभा मतदारसंघ सरासरी साडेतीन ते चार लाख लोकसंख्येचे आहेत. हे मतदारसंघ पायी पिंजून काढायचे ठरवून आणि दिवस-रात्र एक करूनही आठवडाभरात ते शक्य नसल्याची जाणीव उमेदवार आणि त्यांच्या प्रचाराच्या नियोजनकर्त्यांना आहे. त्यामुळे या पुढील पाच दिवस आता प्रचार यात्रा काढून धावती भेट देऊन रॅलीद्वारे प्रचारावर भर दिला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रचार हाच एकमेव पर्याय आता उमेदवारांकडे उरला आहे. काही प्रमाणात तरी कार्यकर्त्यांचे जाळे असलेल्या पक्षांना आणि त्या पक्षांच्या उमेदवारांना हे दिव्य पार पाडणे शक्य आहे. मात्र, ज्यांचे महानगराच्या प्रत्येक प्रभागात कार्यकर्त्यांचे जाळे आहे, त्यांनाच हे शक्य आहे. विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात त्या त्या भागातील नातेगोते शोधून प्रचार सुरू आहे. काही उमेदवारांचे नातेसंबंध नाशिकसह खान्देशात अधिक प्रमाणात आहेत. अशा उमेदवारांचे नातेवाईकदेखील कामधंद्यावर आठवडाभराच्या सुट्या टाकून आपल्या दाजींच्या, भाऊंच्या, नानांच्या, चुलत्यांच्या, साडूंच्या प्रचाराच्या निमित्ताने नाशकात दाखल झाले आहेत.नात्यांचा गोतावळा फायद्याचादिवसभरात एकाचवेळी वेगवेगळ्या भागात प्रचार करणे, रॅली काढणे, पदयात्रा काढणे त्याचवेळी संपर्क कार्यालयातून आवश्यक त्या बाबींची पूर्तता करणे अशा सर्व बाबींसाठी हक्काचे आणि भरवशाचे कार्यकर्ते मिळणे सध्याच्या काळात दुरापास्त झाले आहे. अशावेळी ज्या उमेदवारांची नात्यागोत्यांची यादी मोठी आहे, त्यांना या गोतावळ्याचा फायदा मिळत आहे.उमेदवारांच्या घरांमध्ये भट्ट्या दिवसभर सुरूपदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या ऊठबससाठी असलेल्या संपर्क कार्यालयांच्या नजीकच्या एखाद्या हॉटेलमध्ये किंवा हॉलमध्ये त्यांची नास्ता-जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, आता बाहेरगावच्या नात्यागोत्यातील लोकांचाही राबता वाढल्याने उमेदवारांच्या घरांच्या परसदारी किंवा आसपासच्या मोकळ्या जागेत चहा, नास्ता, जेवणाच्या व्यवस्थेसाठी भट्ट्या पेटल्या आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक